शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

पावसाचा मच्छीलाही फटका, मच्छीमारांवर उपासमारीची पाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 03:19 IST

पालघर : जिल्ह्यात अवकाळी अतिवृष्टीने शेतक-यांसोबत मच्छीमार व्यवसायाचे अतोनात नुकसान झाले असून बांबूवर( वलांदी)वर वाळत टाकलेले मासे सततच्या पावसामुळे कुजून गेले आहेत.

हितेन नाईक पालघर : जिल्ह्यात अवकाळी अतिवृष्टीने शेतक-यांसोबत मच्छीमार व्यवसायाचे अतोनात नुकसान झाले असून बांबूवर( वलांदी)वर वाळत टाकलेले मासे सततच्या पावसामुळे कुजून गेले आहेत. त्यामुळे शेतक-यांसोबत मच्छीमाराना ही नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी मार्क्सवादी पक्षाने जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.जिल्ह्याला ११० कि.मी.चा सागरी किनारा लाभला असून वसई,अर्नाळा,नायगाव,कोरे,दातीवरे एडवन , केळवे, वडराई, सातपाटी, मुरबे, नवापूर, उच्छेली-दांडी, तारापूर,घिवली, डहाणू, बोर्डी इ.गावातून मोठ्या प्रमाणात बोंबील, मांदेली, करंदी,जवळा इ. मच्छीची डोल पद्धतीने मासेमारी केली जाते. सप्टेंबर ते फेब्रुवारीपर्यंत या मच्छीची आवक समाधानकारक असल्याने या किनारपट्टीवर बांबूवर,मचाण लावून मासे सुकविले जातात. ह्या सुकवलेल्या मच्छीला स्थानिक बाजारपेठेसह नाशिक ,धुळे, जळगाव, पुणे इ. भागात मोठी मागणी असते.सध्या मासेमारी व्यवसायावर अनेक संकटे ओढावली असून हा व्यवसायच देशोधडीला लागण्याची चिन्हे दिसत आहेत.त्यातच ७ आॅक्टोबर पासून अधून मधून ८ दिवस पडणाºया पावसाने किनारपट्टीवर सुकविण्यासाठी ठेवलेले मासे कुजून गेल्याने मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन सणासुदीत त्यांच्यावर ही आपत्ती ओढावली आहे.>मच्छीमारांनाही नुकसानभरपाई देण्याची शासनानकडे मागणीमागील अनेक वर्षांपासून मत्स्य उत्पादनात दिवसेंदिवस घट होत असतांनाही आलेल्या संकटांचा मच्छीमार सामना करीत आला आहे. परंतु अशीच परिस्थिती राहिल्यास मच्छीमारांवर उपासमारी ओढवून त्यांच्यात आत्महत्येचे लोण पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.त्यामुळे शासनाने शेतकºयांप्रमाणेच मच्छीमारांना ही नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी भारताचा क्र ांतिकारी मार्क्सवादी पक्षाचे सचिव कॉ. राजेश दवणे, साईनाथ तामोरे, संतोष तामोरे,शाम नाईक,सुखदेव आरेकर ह्यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.