शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
3
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
4
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
5
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
6
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
7
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
8
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
9
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
10
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
11
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
12
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
13
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
14
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
15
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
16
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
17
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
18
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
19
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
20
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप

पावसाचा मच्छीलाही फटका, मच्छीमारांवर उपासमारीची पाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 03:19 IST

पालघर : जिल्ह्यात अवकाळी अतिवृष्टीने शेतक-यांसोबत मच्छीमार व्यवसायाचे अतोनात नुकसान झाले असून बांबूवर( वलांदी)वर वाळत टाकलेले मासे सततच्या पावसामुळे कुजून गेले आहेत.

हितेन नाईक पालघर : जिल्ह्यात अवकाळी अतिवृष्टीने शेतक-यांसोबत मच्छीमार व्यवसायाचे अतोनात नुकसान झाले असून बांबूवर( वलांदी)वर वाळत टाकलेले मासे सततच्या पावसामुळे कुजून गेले आहेत. त्यामुळे शेतक-यांसोबत मच्छीमाराना ही नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी मार्क्सवादी पक्षाने जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.जिल्ह्याला ११० कि.मी.चा सागरी किनारा लाभला असून वसई,अर्नाळा,नायगाव,कोरे,दातीवरे एडवन , केळवे, वडराई, सातपाटी, मुरबे, नवापूर, उच्छेली-दांडी, तारापूर,घिवली, डहाणू, बोर्डी इ.गावातून मोठ्या प्रमाणात बोंबील, मांदेली, करंदी,जवळा इ. मच्छीची डोल पद्धतीने मासेमारी केली जाते. सप्टेंबर ते फेब्रुवारीपर्यंत या मच्छीची आवक समाधानकारक असल्याने या किनारपट्टीवर बांबूवर,मचाण लावून मासे सुकविले जातात. ह्या सुकवलेल्या मच्छीला स्थानिक बाजारपेठेसह नाशिक ,धुळे, जळगाव, पुणे इ. भागात मोठी मागणी असते.सध्या मासेमारी व्यवसायावर अनेक संकटे ओढावली असून हा व्यवसायच देशोधडीला लागण्याची चिन्हे दिसत आहेत.त्यातच ७ आॅक्टोबर पासून अधून मधून ८ दिवस पडणाºया पावसाने किनारपट्टीवर सुकविण्यासाठी ठेवलेले मासे कुजून गेल्याने मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन सणासुदीत त्यांच्यावर ही आपत्ती ओढावली आहे.>मच्छीमारांनाही नुकसानभरपाई देण्याची शासनानकडे मागणीमागील अनेक वर्षांपासून मत्स्य उत्पादनात दिवसेंदिवस घट होत असतांनाही आलेल्या संकटांचा मच्छीमार सामना करीत आला आहे. परंतु अशीच परिस्थिती राहिल्यास मच्छीमारांवर उपासमारी ओढवून त्यांच्यात आत्महत्येचे लोण पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.त्यामुळे शासनाने शेतकºयांप्रमाणेच मच्छीमारांना ही नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी भारताचा क्र ांतिकारी मार्क्सवादी पक्षाचे सचिव कॉ. राजेश दवणे, साईनाथ तामोरे, संतोष तामोरे,शाम नाईक,सुखदेव आरेकर ह्यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.