शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

भाताबरोबर रब्बी हंगामही हातून गेल्याने बळीराजावर दुहेरी संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 01:00 IST

शेतकरी भयभीत : सोसायट्यांचे भूत मानगुटीवर बसणार

वाडा : पालघर जिल्ह्यातील वाडा तालुका भाताचे कोठार म्हणून पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. येथील जमीन पाणी धरून ठेवणारी असल्याने इथे भाताच्या जोरावर शेतकरी आपला उदरनिर्वाह करतो. यावर्षी मात्र ऐन हंगामात पाऊस निघून गेल्याने भात पिकाबरोबर रब्बी हंगामही शेतकऱ्याच्या हातून निसटून गेल्याने शेतीसाठी घेतलेले सोसायट्यांचे कर्ज फेडायचे कसे या चिंतेने तो ग्रस्त झाला आहे.

भाता खालोखाल सुमारे १००० हेक्टर क्षेत्रात कडधान्याचे उत्पादन घेतले जाते. यामध्ये हरभरा, वाल, तूर, चवळी, तील, धने, मोहरी, उडीद, राई आदी पिके दरवर्षी घेतली जातात. यावर्षी मात्र पाऊस गेल्याने कडधान्याचा हंगाम वाया गेला आहे. त्यामुळे येथील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. तालुक्यातील शेती पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे.

शिवाय येथे बारमाही वाहणाºया पाच नद्या आहेत. मात्र सिंचनाच्या कुठल्याही प्रकारच्या सोयीसुविधा नसल्याने येथील शेतकºयाला आधुनिक शेती करता येत नाही. आजही तो पारंपरिक पद्धतीनेच शेती करतो.

यावर्षी पाऊस गेल्याने भात शेती मोठ्या प्रमाणात करपून गेली आहे. त्यामुळे येथील शेतकºयांनी उभी पिके स्वत:च्या हाताने पेटवून दिलीत. तरी आणे वारी साठी प्लॉट निवडतांना जिथे पाण्याचे प्रमाण जास्त आहे. उत्पन्न चांगले आहे. त्याचीच निवड केली. मात्र नियमाप्रमाणे हळवे, निमगरवे, गरवे अशा भाताच्या जाती घेणे बंधनकारक असतांना तसे न करता एकाच प्रकारचे उत्तम पिक येणारे भात घेऊन विमा कंपनीच्या फायद्यासाठी शेतकºयांची दिशाभूल करून फसवी आणेवारी जाहीर केल्याने. वाडा तालुका दुष्काळग्रस्त तालुक्यात समाविष्ट होऊ न शकल्याची खंत देवघर येथील शेतकरी किशोर पाटील यांनी व्यक्त केली.विमा कंपन्यांसाठी दिला शेतकºयांचा बळीयासंदर्भात शेतकरी नेते प्रफुल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता. विमा कंपनीच्या फायद्यासाठीच प्रशासनाने शेतकºयांचा बळी दिला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी लोकमतशी बोलतांना दिली तर तालुका कृषी अधिकारी माधव हासे यांच्याशी संपर्क साधला असता यावर्षी पाऊस लवकर गेल्याने रब्बी पिकांमध्ये पंचवीस ते तीस टक्क्यांनी घट झाली असल्याचे सांगून रब्बीची एकूण किती पिके घेण्यात आल्याची माहिती देण्यास त्यांनी टाळाटाळ केली. तसेच फोनवर घेतलेली प्रतिक्रि या प्रसिद्ध करू नये असे सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरी