शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
3
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
4
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
5
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
6
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
7
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
8
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
9
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
10
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
11
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
12
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
13
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
14
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
15
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
16
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
17
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
18
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
19
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
20
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स

काहिली वाढल्याने थंड पेयांची मागणी वाढली,लिंबू व कोकम सरबतचे आकर्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 00:39 IST

प्रचंड उकाडा व घशाला सतत पडणारी कोरड यामुळे वसईमध्ये जागोजागी थंड पेयाची मागणी वाढली आहे.

नालासोपारा : प्रचंड उकाडा व घशाला सतत पडणारी कोरड यामुळे वसईमध्ये जागोजागी थंड पेयाची मागणी वाढली आहे. लोकलमधुन उतरणाऱ्या प्रवाशांचे पाय आता रेल्वे स्टॉल कडे तर बस, खाजगी वाहनातील प्रवासी थंड पेयाकडे वळू लागले आहेत. त्यामुळे स्टॉल धारकांनी ही खादयपदार्थ पेक्षा थंड पेय विक्र ी वर विशेष भर दिल्याचे दिसून येत आहे.सामान्य प्रवाशांची लिंबूपाणी व कोकम सरबतला पसंती असल्यामुळे सर्व स्टॉलवर दोन्ही पेय हमखास मिळत आहे. कामानिमित्त येणारे बहुतांश नागरिक रेल्वेच्या उपनगरीय गाडीने प्रवास करतात विशेषत: सकाळी वसई, नालासोपारा, विरार, नायगाव या भागातून लाखो प्रवासी मुंबई, ठाणे, दिवा, डहाणू साठी प्रवास करतात दीड ते दोन तासांच्या प्रवासात उकाड्यामुळे प्रवासी अक्षरश: हैराण होत आहेत.लोकलमधुन उतरल्यानंतर पहिल्यांदा स्टेशनवरील स्टॉल गाठतात तर बस व अन्य वाहनातील प्रवासी थंड पेयाची गाडी शोधत चार ते पाच रु पयात मिळणाºया लिंबू पाणी, कोकम सरबतला पसंती देत आहेत. अनेक जण एका स्टॉलवर दररोज सुमारे २० ते ३० लीटर लिंबु पाण्याची विक्र ी होत असल्याचे विरार, नालासोपारा येथील स्टॉलधारकांचे म्हणणे आहे. मिनरल पाणी, कोल्ड्रिक व अन्य पेयाची मागणी नेहमीपेक्षा १५ ते २० टक्क्यांनी वाढली आहे.मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात खाद्यपदार्था पेक्षा थंडपेयांना जास्त मागणी असते. काही महत्वाच्या रेल्वे स्टॉलवर मोसंबी, गाजर, अननस आदी फळांचे ज्यूस स्टॉलवरही प्रवासांची गर्दी दिसून येते. बच्चे कंपनी काला खट्टा, कच्ची कैरी, मिल्क शेक तसेच बर्फाचा गोळा खाण्यात मग्न झाले असल्याचे दिसून येते. उकाडा व त्यामुळे त्वचेला होणारा त्रास लक्षात घेत महिला वर्ग तोंडाला स्कार्फ बांधून प्रवास करीत आहेत.कुर्ला रेल्वे स्थानकात लिंबू सरबत बनविण्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर बाहेरील खाद्य पदार्थ, ज्यूस, सरबत व शीतपेयांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मार्च मिहन्याच्या अखेरीला तापमान ४० डिग्रीच्या आसपास पोहचले असून अजून एप्रिल व मे महिना बाकी आहे. तापमान वाढीमुळे शरीरातील पाणी कमी होते व आपणास तहान जास्त लागते, कामावर जाणाºया चाकरमान्यांनी ग्लुकोज पाणालाही पसंती दिली आहे.>उन्हामुळे शरीरातील पाणी कमी होते. परिणाम थेट शरीरावर होतो. यासाठी नारळ पाणी, आवळा, लिंबूपाणी जास्त सेवन करावे, यात सी जीवनसत्व तसेच मूलद्रव्ये असतात. लहान मुले व वयोवृध्द नागरिकांस जास्तीत जास्त पाणी पिण्याचा आग्रह करावा. ज्यामुळे पाण्याचे प्रमाण समतोल राहण्यास मदत होईल. फ्रीज मधील पाणी घातक असून यामुळे घशाचे विकार होवू शकतात. बाहेरील अशुध्द पाणी शक्यतो टाळावे. अन्यथा काविळ, पोटाचे विकार डोके वर काढू शकतात.- डॉ. सचिन पाटील