शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

काहिली वाढल्याने थंड पेयांची मागणी वाढली,लिंबू व कोकम सरबतचे आकर्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 00:39 IST

प्रचंड उकाडा व घशाला सतत पडणारी कोरड यामुळे वसईमध्ये जागोजागी थंड पेयाची मागणी वाढली आहे.

नालासोपारा : प्रचंड उकाडा व घशाला सतत पडणारी कोरड यामुळे वसईमध्ये जागोजागी थंड पेयाची मागणी वाढली आहे. लोकलमधुन उतरणाऱ्या प्रवाशांचे पाय आता रेल्वे स्टॉल कडे तर बस, खाजगी वाहनातील प्रवासी थंड पेयाकडे वळू लागले आहेत. त्यामुळे स्टॉल धारकांनी ही खादयपदार्थ पेक्षा थंड पेय विक्र ी वर विशेष भर दिल्याचे दिसून येत आहे.सामान्य प्रवाशांची लिंबूपाणी व कोकम सरबतला पसंती असल्यामुळे सर्व स्टॉलवर दोन्ही पेय हमखास मिळत आहे. कामानिमित्त येणारे बहुतांश नागरिक रेल्वेच्या उपनगरीय गाडीने प्रवास करतात विशेषत: सकाळी वसई, नालासोपारा, विरार, नायगाव या भागातून लाखो प्रवासी मुंबई, ठाणे, दिवा, डहाणू साठी प्रवास करतात दीड ते दोन तासांच्या प्रवासात उकाड्यामुळे प्रवासी अक्षरश: हैराण होत आहेत.लोकलमधुन उतरल्यानंतर पहिल्यांदा स्टेशनवरील स्टॉल गाठतात तर बस व अन्य वाहनातील प्रवासी थंड पेयाची गाडी शोधत चार ते पाच रु पयात मिळणाºया लिंबू पाणी, कोकम सरबतला पसंती देत आहेत. अनेक जण एका स्टॉलवर दररोज सुमारे २० ते ३० लीटर लिंबु पाण्याची विक्र ी होत असल्याचे विरार, नालासोपारा येथील स्टॉलधारकांचे म्हणणे आहे. मिनरल पाणी, कोल्ड्रिक व अन्य पेयाची मागणी नेहमीपेक्षा १५ ते २० टक्क्यांनी वाढली आहे.मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात खाद्यपदार्था पेक्षा थंडपेयांना जास्त मागणी असते. काही महत्वाच्या रेल्वे स्टॉलवर मोसंबी, गाजर, अननस आदी फळांचे ज्यूस स्टॉलवरही प्रवासांची गर्दी दिसून येते. बच्चे कंपनी काला खट्टा, कच्ची कैरी, मिल्क शेक तसेच बर्फाचा गोळा खाण्यात मग्न झाले असल्याचे दिसून येते. उकाडा व त्यामुळे त्वचेला होणारा त्रास लक्षात घेत महिला वर्ग तोंडाला स्कार्फ बांधून प्रवास करीत आहेत.कुर्ला रेल्वे स्थानकात लिंबू सरबत बनविण्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर बाहेरील खाद्य पदार्थ, ज्यूस, सरबत व शीतपेयांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मार्च मिहन्याच्या अखेरीला तापमान ४० डिग्रीच्या आसपास पोहचले असून अजून एप्रिल व मे महिना बाकी आहे. तापमान वाढीमुळे शरीरातील पाणी कमी होते व आपणास तहान जास्त लागते, कामावर जाणाºया चाकरमान्यांनी ग्लुकोज पाणालाही पसंती दिली आहे.>उन्हामुळे शरीरातील पाणी कमी होते. परिणाम थेट शरीरावर होतो. यासाठी नारळ पाणी, आवळा, लिंबूपाणी जास्त सेवन करावे, यात सी जीवनसत्व तसेच मूलद्रव्ये असतात. लहान मुले व वयोवृध्द नागरिकांस जास्तीत जास्त पाणी पिण्याचा आग्रह करावा. ज्यामुळे पाण्याचे प्रमाण समतोल राहण्यास मदत होईल. फ्रीज मधील पाणी घातक असून यामुळे घशाचे विकार होवू शकतात. बाहेरील अशुध्द पाणी शक्यतो टाळावे. अन्यथा काविळ, पोटाचे विकार डोके वर काढू शकतात.- डॉ. सचिन पाटील