शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
4
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
5
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
6
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
7
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
8
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
9
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
10
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
11
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
12
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
13
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
14
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
15
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
16
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
17
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
18
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
19
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
20
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...

काहिली वाढल्याने थंड पेयांची मागणी वाढली,लिंबू व कोकम सरबतचे आकर्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 00:39 IST

प्रचंड उकाडा व घशाला सतत पडणारी कोरड यामुळे वसईमध्ये जागोजागी थंड पेयाची मागणी वाढली आहे.

नालासोपारा : प्रचंड उकाडा व घशाला सतत पडणारी कोरड यामुळे वसईमध्ये जागोजागी थंड पेयाची मागणी वाढली आहे. लोकलमधुन उतरणाऱ्या प्रवाशांचे पाय आता रेल्वे स्टॉल कडे तर बस, खाजगी वाहनातील प्रवासी थंड पेयाकडे वळू लागले आहेत. त्यामुळे स्टॉल धारकांनी ही खादयपदार्थ पेक्षा थंड पेय विक्र ी वर विशेष भर दिल्याचे दिसून येत आहे.सामान्य प्रवाशांची लिंबूपाणी व कोकम सरबतला पसंती असल्यामुळे सर्व स्टॉलवर दोन्ही पेय हमखास मिळत आहे. कामानिमित्त येणारे बहुतांश नागरिक रेल्वेच्या उपनगरीय गाडीने प्रवास करतात विशेषत: सकाळी वसई, नालासोपारा, विरार, नायगाव या भागातून लाखो प्रवासी मुंबई, ठाणे, दिवा, डहाणू साठी प्रवास करतात दीड ते दोन तासांच्या प्रवासात उकाड्यामुळे प्रवासी अक्षरश: हैराण होत आहेत.लोकलमधुन उतरल्यानंतर पहिल्यांदा स्टेशनवरील स्टॉल गाठतात तर बस व अन्य वाहनातील प्रवासी थंड पेयाची गाडी शोधत चार ते पाच रु पयात मिळणाºया लिंबू पाणी, कोकम सरबतला पसंती देत आहेत. अनेक जण एका स्टॉलवर दररोज सुमारे २० ते ३० लीटर लिंबु पाण्याची विक्र ी होत असल्याचे विरार, नालासोपारा येथील स्टॉलधारकांचे म्हणणे आहे. मिनरल पाणी, कोल्ड्रिक व अन्य पेयाची मागणी नेहमीपेक्षा १५ ते २० टक्क्यांनी वाढली आहे.मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात खाद्यपदार्था पेक्षा थंडपेयांना जास्त मागणी असते. काही महत्वाच्या रेल्वे स्टॉलवर मोसंबी, गाजर, अननस आदी फळांचे ज्यूस स्टॉलवरही प्रवासांची गर्दी दिसून येते. बच्चे कंपनी काला खट्टा, कच्ची कैरी, मिल्क शेक तसेच बर्फाचा गोळा खाण्यात मग्न झाले असल्याचे दिसून येते. उकाडा व त्यामुळे त्वचेला होणारा त्रास लक्षात घेत महिला वर्ग तोंडाला स्कार्फ बांधून प्रवास करीत आहेत.कुर्ला रेल्वे स्थानकात लिंबू सरबत बनविण्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर बाहेरील खाद्य पदार्थ, ज्यूस, सरबत व शीतपेयांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मार्च मिहन्याच्या अखेरीला तापमान ४० डिग्रीच्या आसपास पोहचले असून अजून एप्रिल व मे महिना बाकी आहे. तापमान वाढीमुळे शरीरातील पाणी कमी होते व आपणास तहान जास्त लागते, कामावर जाणाºया चाकरमान्यांनी ग्लुकोज पाणालाही पसंती दिली आहे.>उन्हामुळे शरीरातील पाणी कमी होते. परिणाम थेट शरीरावर होतो. यासाठी नारळ पाणी, आवळा, लिंबूपाणी जास्त सेवन करावे, यात सी जीवनसत्व तसेच मूलद्रव्ये असतात. लहान मुले व वयोवृध्द नागरिकांस जास्तीत जास्त पाणी पिण्याचा आग्रह करावा. ज्यामुळे पाण्याचे प्रमाण समतोल राहण्यास मदत होईल. फ्रीज मधील पाणी घातक असून यामुळे घशाचे विकार होवू शकतात. बाहेरील अशुध्द पाणी शक्यतो टाळावे. अन्यथा काविळ, पोटाचे विकार डोके वर काढू शकतात.- डॉ. सचिन पाटील