शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

महा ई सेवा केंद्रातूनच मिळाले बनावट दाखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:19 IST

महा ई सेवा केंद्र चालवणा-या एका व्यक्तीने नायब तहसिलदारांच्या खोट्या सह्या करून बोगस दाखले विकल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे

शशी करपेवसई : महा ई सेवा केंद्र चालवणाºया एका व्यक्तीने नायब तहसिलदारांच्या खोट्या सह्या करून बोगस दाखले विकल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी एकाला अटक केली असून त्याने आठ बोगस दाखले विकल्याची लेखी कबुली दिली आहे. हे महा ई सेवा केंंद्र बंद करण्याची शिफारस तहसिल कार्यालयातून करण्यात आली आहे.

सेतू कार्यालयातून अधिवास, उत्पन्न, जात प्रमाणपत्र यासह विविध दाखले दिले जातात. त्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला, निवासी दाखला, आधार कार्डासह कागदपत्रांची पूर्तता करण्याची गरज असते. मात्र, नालासोपाºयातील महा ई सेवा केंद्र चालवणाºया विपुल राऊत याने कोणतीही कागदपत्रे न घेता निवासी नायब तहसिलदार स्मिता गुरव यांच्या खोट्या सह्या करून दाखले विकल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. त्याने आतापर्यत आठ दाखले दिल्याची कबुली दिली आहे. मात्र त्याने नक्की कोणते दाखले दिले याची माहिती दिलेली नाही. त्याने रिक्षा परमीटसाठी परप्रांतियांना अधिवास दाखले विकल्याचा संशय आहे. तो पंचवीस हजारात कागदपत्रे नसतांनाही बोगस दाखले विकत असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. तक्रार आल्यानंतर सर्व महा ई सेवा केंद्र चालकांना बोलावून चौकशी करण्यात आली असता राऊतने माहिती देण्यास टाळाटाळ केली होती.