शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
2
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
3
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; थोड्याच वेळात पत्रकार परिषद
4
Stock Market Today: आधी घसरण मग तेजी, Sensex १०० अंकांनी वधारला; ऑटो-बँकिंग स्टॉक्समध्ये मोठी खरेदी
5
“आगे बढ़ते रहो, ऐसाही बदला लेते रहो”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर शहीद नरवाल कुटुंबाने व्यक्त केला आनंद
6
Operation Sindoor: 'जय हिंद', राहुल गांधींची पाकिस्तानातील एअर स्ट्राईकनंतर पहिली पोस्ट; काय म्हणाले? 
7
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
8
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य अलर्ट; 'कारगिलचा हिरो' पुन्हा सीमेवर सज्ज
9
"जय हिंद की सेना...!", 'ऑपरेशन सिंदूर'वर रितेश देशमुखचं रात्री ३ वाजून २ मिनिटांनी ट्विट
10
"अब मिट्टी में मिल जाओगे...", भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर'चं देवोलिनानं केलं कौतुक
11
'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकमधील 'या' ९ ठिकाणी एअर स्ट्राईक; २६/११, पुलवामाशी होता संबंध
12
"पाकपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीनं कारवाई होणार, हा संदेश देण्यात आपण यशस्वी"
13
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
14
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
15
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
16
Mumbai Rains: ढगांच्या गडगडाटासह कांदिवली, बोरिवली भागात मुसळधार पाऊस; चाकरमान्यांची तारांबळ
17
Operation Sindoor: "माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
18
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
19
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
20
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा

पूरस्थिती उदभवल्याने नागरिकांचे पुन्हा हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 23:11 IST

वस्तू भिजल्याने रहिवाशांवर उपाशी राहण्याची वेळ

विरार : गेल्याच महिन्यात पूरिस्थती निर्माण झाली असताना नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्या नुकसानाची अद्यापही भरपाई मिळालेली नसताना पुन्हा घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले आहेत.२३ जुलैला अतिवृष्टी होऊन वसई- विरार शहरात पूरिस्थती निर्माण झाली होती व नागरिकांचे हाल झाले होते. रविवारी पहाटे पाच वाजता घरांमध्ये पाणी भरण्यास सुरूवात झाली. चाणक्य चौक, विराटनगर, तुळींज, अचोले, एव्हरशाइन सारख्या परिसरात असलेल्या सखल भागातील इमारतींमध्ये पाणी शिरू लागले. बऱ्याच नागरिकांना राहण्यासाठी आसरा नसल्याने पाणी भरलेले असतानाही नागरिक आपल्या कुंटुंबासोबत घरात बसून होते. बºयाच परिसरात पलिका, अग्निशमन दल व इतर खासगी संस्थांचा मदतीचा हात न पोहचल्याने नागरिकांना उपाशी रहावे लागले. घरात पाणी असल्यामुळे नागरिकांना जेवण बनवण्याची सुद्धा सोय नव्हती. त्यांच्यावर उपाशी राहून दिवस काढण्याची वेळ आली. मीटर बॉक्सला पाणी लागत असल्याने वीजपुरवठाही खंडित झाला होता. लोकांचे फार हाल झाले.लाटांच्या भडिमाराने किनाºयाची झीजडहाणू/बोर्डी : पावसामुळे समुद्राला लाटांचा तडाखा बसून त्याच्या भडिमाराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. लाटांनी किनाºयाची प्रचंड धूप होऊन झाडे उन्मळून गेली आहेत. चौपट्यांचेही नुकसान झाले आहे. रविवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास ५.७१ मीटरच्या लाटा किनाºयावर आदळल्या त्यामुळे चिंचणीपासून ते झाईपर्यंतच्या सुमारे ३५ किमी लांबीच्या किनाºयाची धूप होऊन माती वाहून गेल्याने सुरूची अनेक झाडे उन्मळून गेली. सलग चार दिवस भरतीच्या पाण्याचा शिरकाव होऊन घरांचे नुकसान झाले. येथील पारनाका, आगर, नरपड, चिखले, घोलवड आणि बार्डीतील प्रसिद्ध चौपट्यांना लाटांचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. चिखले गावात रिठी किनारी भरतीचे पाणी डहाणू बोर्डी या प्रमुख राज्य मार्गापर्यंत पोहचले. लाटांमुळे किनाºयावर कचरा जमा झाला असून पाऊस आणि दमट वातावरणामुळे दुर्गंधी आणि रोग पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.वालीव पोलिसांनी तिघांना वाचवलेनालासोपारा : मुंबई- अहमदाबाद महामार्गावरून शनिवारी सायंकाळच्या सुमारास वसई फाटा येथे असलेल्या नाल्याने पावसाच्या पाण्यामुळे रौद्ररूप धारण करून वाहत होता. पाण्याच्या जास्त प्रवाहाच्या नाल्यातून मालाचा ट्रक नेताना वाहून जात होता. पण वालीव पोलिसांनी माहिती मिळाल्यावर घटनास्थळी पोहचून चालकासह तिघांचा जीव पोलिसांनी वाचवला. वसई पूर्वेकडील खान कंपाऊंड येथे असलेल्या कंपनीमधून प्लास्टिकचा मुद्देमाल घेऊन मध्य प्रदेश येथील कंपनीमध्ये माल नेण्यासाठी ट्रक शनिवारी संध्याकाळी आला होता. ट्रक मध्ये २० टन प्लास्टिकचे दाणे होते. नाल्यावरून ट्रक घेऊन तिघे जण निघाले पण पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने ट्रक वाहून जात होता, पण मालाचा लोड असल्याने तो अडकला. वालीव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांना माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाला बोलवले. ट्रकमधील तिघांना वाचवण्यासाठी पोलीस, अग्निशमन दल कर्मचाऱ्यांचे प्रयत्न सुरू होते. अखेर हायड्रो मशीनच्या मदतीने ट्रकचालक जाफर मोहम्मद, इम्रान सलीम शहा आणि बाळू माहिरा या तिघांचे प्राण वाचवले.नद्यांना आला पूरवाडा : तालुक्यातील वैतरणा, तानसा, पिंजाळ, देहर्जे व गारगावी या पाचही नद्यांना महापूर आला आहे. या महापूराचे पाणी गावात शिरल्याने त्यांचा संपर्क तुटला आहे. मलवाडा येथील पूल वाहून गेल्याने वाहतूक बंद झाली. वैतरणा नदीच्या पुराचा तडखा अनेक गावांना बसला असून वाडा पूर्व विभागातील अनेक गावे पुराच्या पाण्याने वेढली आहेत. कंळभे, निशेत, जोशीपाडा, दादरे, शेले, सोनाळे, बिलघर, मोज आदी गावात पुराचे पाणी शिरले आहे. तानसा नदीलाही महापूर आला असून अनेक गावात पुराचे पाणी शिरले आहे. निंबवली येथील आरोग्य केंद्रात पाणी गेल्याने औषधे वाचवण्यासाठी येथील आरोग्य कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.तानसा नदीला महापूरपारोळ : तानसा नदीला महापूर आल्याने नदीकाठच्या गावात पुराचे पाणी आले आहे. तर अंबाडी- शिरसाड मार्ग पाण्याखाली गेल्याने या भागातील वाहतूक बंद होत शहराचा ग्रामीण भागाशी संपर्कतुटला आहे., तर पारोळ येथे रविवारी सकाळी पुराचा अंदाज न आल्याने वाहन पुरात वाहून गेले असून चालकाचा मृत्यू झाला. चालकाचे नाव समजले नसून तो भिवंडी येथे टेम्पो घेऊन जात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Rainपाऊस