शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

दहागावमधील बंधारा कोरडा, विहिरींनी गाठला तळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 01:22 IST

शहापूर तालुक्यातील दहागाव येथे लघूपाटबंधारे उपविभागामार्फत बांधण्यात आलेल्या या बंधाऱ्यात पाण्याचा थेंबही नसल्याने विहिरींना पाणी नसल्याचे दिसते आहे.

- जनार्दन भेरे भातसानगर : शहापूर तालुक्यातील दहागाव येथे लघूपाटबंधारे उपविभागामार्फत बांधण्यात आलेल्या या बंधाऱ्यात पाण्याचा थेंबही नसल्याने विहिरींना पाणी नसल्याचे दिसते आहे. तालुक्यातील पाणी टंचाईग्रस्त १९६ गावपाड्यांना ३२ टँकरने पाणी पुरवठा सुरू असला तरी अजूनही २० ते २५ गावपाडे टँकरने पाणी मिळण्याच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती मिळाली आहे. या टंचाईग्रस्त गावांपैकी एक म्हणजे दहागाव.ठाणे जिल्हा परिषद यांच्या अंतर्गत लघू पाटबंधारे उपविभाग शहापूर यांच्या वार्षिक योजनेअंतर्गत दहागाव येथे ९.२५ लाख रुपये खर्च करून बंधारा बांधण्यात आला. या बंधाºयाजवळच गावातील विहिरी आहेत. बंधाºयात साठणाºया पाण्यात त्या विहिरींमध्ये पाणी राहील, आणि गावाचा पाण्याचा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा होती. मात्र, या परिसरात ओहोळाच्या आजूबाजूला शेतकरी भाजीपाला, पीके घेत असल्याने आज या बंधाºयात पाण्याचा थेंबही नाही. त्यामुळे विहिरींमध्येही पाणीच राहिलेले नाही. यातच पाऊस लांबल्यास गावातील पाणी टंचाई मोठे रूप धारण करणार असल्याचे ग्रामस्थ सांगतात.यापूर्वी कधीही अशी परिस्थिती उद्भवली नव्हती. मात्र, यंदा पाऊस लवकर गेल्याचे परिणाम जसे इतर गावांना सहन करावे लागत आहेत, तसेच ते दहागावला देखील भोगावे लागत आहेत. भूजल पातळी कमालीची खालावल्याने ज्या विहिरी, तलाव कधीही आटले नव्हते, त्यातही आज थेंबभर पाणी नसल्याने पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकण्याची वेळ आली आहे.या गावाला नळाद्वारे दोन दिवसांनी पुरवठा होतो मात्र तो अपुरा असल्याने नागरिकांना दूरवरून पाणी आणावे लागते. दहागाव पाड्यातील लोकांना एक किलोमीटरवरून पाणी आणावे लागते.