शहरं
Join us  
Trending Stories
1
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
2
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
3
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
4
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
5
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
6
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
7
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
8
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
9
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
10
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
11
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
12
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
13
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
14
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
15
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
16
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
17
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
18
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
19
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
20
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव

वसई तालुक्यात दुष्काळी स्थिती

By admin | Updated: July 10, 2015 22:23 IST

वसई तालुक्यात १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला असून रखरखत्या उन्हात भात व भाजीपाल्याची रोपे करपली आहेत.

पारोळ : वसई तालुक्यात १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला असून रखरखत्या उन्हात भात व भाजीपाल्याची रोपे करपली आहेत. या पार्श्वभूमीवर वसई परिसरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असतानाही कृषी विभागाने या भागातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करून त्यांना वाऱ्यावर सोडल्याच पाहायला मिळत आहे.तालुक्यात पश्चिम व पूर्व भागात मोठ्या प्रमाणात भातशेती व पावसाळी भाजीपाल्यांची शेती केली जाते. या वर्षाचा विचार केला तर अवकाळी पडलेल्या पावसाने या भागातील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर असतानाही त्यांनी महागडी भातबियाणे खरेदी करून पेरणी केली, पण सुरुवातीला पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी भराभर पेरण्या उरकून घेतल्या. पण, १५ दिवसांपासून वरुणराजाने पाठ फिरविल्याने भातपिके करपून गेली आहेत. तसेच पावसाळ्यात भातशेतीला जोड असणाऱ्या भाजीपाल्याची रोपेही करपून गेल्याने या भागातील शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. पाऊस लांबल्याने हळवे, निमगरवे पिकांच्या भातलावणीचा हंगामही निघून जात असल्यामुळे या भागातील शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. वसई तालुक्यात अशी परिस्थिती निर्माण झाली असतानाही कृषी विभागाने कोणतीही पाहणी केली नसून शेतकऱ्यांच्या मतांचा जोगवा मागणारी राजकीय मंडळीही मूग गिळून गप्प आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाली कोण, अशी व्यथा शेतकरी प्रसाद पाटील यांनी लोकमतकडे मांडली. (वार्ताहर)