शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

वसई तालुक्यात दुष्काळी स्थिती

By admin | Updated: July 10, 2015 22:23 IST

वसई तालुक्यात १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला असून रखरखत्या उन्हात भात व भाजीपाल्याची रोपे करपली आहेत.

पारोळ : वसई तालुक्यात १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला असून रखरखत्या उन्हात भात व भाजीपाल्याची रोपे करपली आहेत. या पार्श्वभूमीवर वसई परिसरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असतानाही कृषी विभागाने या भागातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करून त्यांना वाऱ्यावर सोडल्याच पाहायला मिळत आहे.तालुक्यात पश्चिम व पूर्व भागात मोठ्या प्रमाणात भातशेती व पावसाळी भाजीपाल्यांची शेती केली जाते. या वर्षाचा विचार केला तर अवकाळी पडलेल्या पावसाने या भागातील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर असतानाही त्यांनी महागडी भातबियाणे खरेदी करून पेरणी केली, पण सुरुवातीला पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी भराभर पेरण्या उरकून घेतल्या. पण, १५ दिवसांपासून वरुणराजाने पाठ फिरविल्याने भातपिके करपून गेली आहेत. तसेच पावसाळ्यात भातशेतीला जोड असणाऱ्या भाजीपाल्याची रोपेही करपून गेल्याने या भागातील शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. पाऊस लांबल्याने हळवे, निमगरवे पिकांच्या भातलावणीचा हंगामही निघून जात असल्यामुळे या भागातील शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. वसई तालुक्यात अशी परिस्थिती निर्माण झाली असतानाही कृषी विभागाने कोणतीही पाहणी केली नसून शेतकऱ्यांच्या मतांचा जोगवा मागणारी राजकीय मंडळीही मूग गिळून गप्प आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाली कोण, अशी व्यथा शेतकरी प्रसाद पाटील यांनी लोकमतकडे मांडली. (वार्ताहर)