शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

बळीराजाच्या खात्यात छदामही नाही, पालकमंत्र्यांची घोषणा हवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 06:32 IST

१८ आॅक्टोबर रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी विशेष गाजावाजा करुन आयोजित केलेल्या कार्यक्रमात जिल्ह्यातील २३ हजार ७३४ शेतक-यांना ९४.९९ कोटी कर्जमाफी झाल्याच्या घोषणेला महिना उलटून गेल्यानंतरही

पालघर : १८ आॅक्टोबर रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी विशेष गाजावाजा करुन आयोजित केलेल्या कार्यक्रमात जिल्ह्यातील २३ हजार ७३४ शेतक-यांना ९४.९९ कोटी कर्जमाफी झाल्याच्या घोषणेला महिना उलटून गेल्यानंतरही यातील एकाही शेतक-याच्या बॅक खात्यावर एक दमडीही जमा झाली नसल्याचे वास्तव पालघर मधील सहकारी संस्थांच्या उपनिबंधक कार्यालयातील अधिकाºयांच्या बोलण्यातून स्पष्ट होते. त्यामुळे पालकमंत्र्यांची घोषणा हवेत विरल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.पालघर येथे १८ आॅक्टोबर रोजी झालेल्या कर्जमुक्त शेतकºयांचा सन्मान सोहळा व प्रारंभ कर्जमुक्ती कार्यक्र म आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्र मात जिल्ह्यातील विविध तालुक्यातील ३३ शेतकºयांची निवड करून या थकबाकीदार शेतकºयांना त्यांच्या पत्नीसह कर्जमाफीची प्रमाणपत्रे पालकमंत्र्यांच्या हस्ते देऊन त्यांचा सन्मान ही करण्यात आला होता. जिल्ह्यातील २३ हजार ७३४ शेतकरी कर्जमुक्त झाले असून तुम्हाला नवीन कर्ज घेता येणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी वर्गा मध्ये समाधान व आनंदाचे वातावरण पसरले होते.मात्र कालांतराने २३ हजार शेतकºयांचे जाऊ द्या परंतु प्राथमिक तत्वावर ज्या ३३ थकबाकीदार शेतकºयांना कर्जमुक्त केल्याची प्रमाणपत्रे वाटली होती त्यांच्या खात्यात आजतागायत या कर्जमुक्तीचा एक रुपयाही जमा झालेला नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांनी शेतकºयांना कर्जमुक्तीचे दाखवलेले स्वप्न प्रत्यक्षात दिवास्वप्न ठरले आहे.ही कर्जमुक्ती न झाल्याने शेतकºयांचा सातबारा आजही गहाणच आहे. यामुळे कर्जमुक्त झालेल्या किंवा असलेल्या शेतकºयांना रब्बीचे पिककर्जही मिळू शकत नाही.जिल्ह्यातील शेतकरी वर्गामध्ये नाराजीचा सुर आहे. ह्या कर्जमाफी बाबत पालघरच्या उपनिबंधक सहकारी संस्थांच्या कार्यालयाशी अनेक वेळा संपर्क करूनही माहिती दिली जात नाही. शासनस्तरावरून कर्जमुक्ती अर्जावर प्रोसेस सुरू आहे, कर्जमाफी दिली की नाही ह्या बाबत आम्ही कुठलेही भाष्य करू इच्छित नाहीत असे एका अधिकाºयांनी लोकमतला सांगितले.मुख्यमंत्र्यांनी कर्जमात्रीचे प्रमाणपत्र देऊनही त्यांची खाती रितीचमागे मुंबईत झालेल्या राजा शिवाजी महाराज कर्जमुक्ती सन्मान योजनेअंतर्गतच्या कार्यक्र मात वाडा तालुक्यातील दोन शेतकºयांना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्रे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाटप करण्यात आली. मात्र, त्यानंतर आजपर्यंत या दोन्ही शेतकºयांच्या खात्यावरही कर्जाची रक्कम जमा झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.गल्ली ते दिल्ली पर्यंतच्या शेतकºयांची कर्जमाफीच्या मुद्यावर सरकारने क्रु र चेष्टा चालविली असून ह्या विरोधात जिल्ह्यात आंदोलन उभारण्याचे पत्र आम्ही जिल्हाधिकाºयांना दिले आहे, असे राष्ट्रवादी पार्टी जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा यांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीVasai Virarवसई विरार