शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

लोकलचा प्रवास नको रे बाप्पा

By admin | Updated: December 18, 2014 23:51 IST

गेल्या काही दिवसांपासून ठिकठिकाणी स्वच्छता मोहिमा सुरु आहेत सुरू झाल्या. नागरिकांमध्येही स्वच्छतेबाबत बऱ्यापैकी जाणीव निर्माण झाल्याचे चित्र दिसले.

डोंबिवली - गेल्या काही दिवसांपासून ठिकठिकाणी स्वच्छता मोहिमा सुरु आहेत सुरू झाल्या. नागरिकांमध्येही स्वच्छतेबाबत बऱ्यापैकी जाणीव निर्माण झाल्याचे चित्र दिसले. मात्र पश्चिम रेल्वेच्या ट्रेनमध्ये लागलेले स्टीकर अजूनही तसेच असून ट्रेनची स्वच्छता कधी होणार, स्टीकर लागणे थांबणार कधी असा सवाल वसईतील रेल्वे प्रवासी करत आहेत. एरव्ही रेल्वेच्या निष्क्रियतेबाबत आवाज उठवून प्रसिद्धी घेणाऱ्या प्रवासी संघटना कुठे आहेत ? असा सवाल प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.ठिकठिकाणी हौसिंग सोसायट्या, सेवाभावी संस्था व नागरिकांनी स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला. तर मग प्रवाशांच्या समस्यांसाठी पुढाकार घेतलेल्या संघटनांनी एकही स्थानक - लोकल का स्वच्छ केली नाही,असा सवाल सागर गिलाणकर या प्रवाशाने केला. रेल्वेच्या स्वच्छता विभागानेही सुरुवातीला स्वच्छतेबाबत सतर्कता दाखवली असली तरी स्वच्छतेत विशेष फरक पडलेला दिसत नाही. एकीकडे या सार्वजनिक स्वच्छतेबाबत चर्चा होत असतानाच रेल्वेमध्ये लागलेल्या स्टीकरबद्दलही प्रवाशांची ओरड आहे.झटपट नोकरी लावणार, चित्रपट क्षेत्रात काम मिळणार, बाबा बंगाली, कमी किंमतीत घरे-जमीन प्लॉट अशा जाहिराती करणारे स्टीकर सर्रास लागलेले आढळून येत आहेत. या स्टीकरमुळे ट्रेनचे विद्रुपीकरण होत असून रेल्वे पोलीस निद्रेत आहे का ? असा सवालही व्यक्त होत आहे. विशेषत: रात्रीच्या वेळेस ही स्टीकर ट्रेनमध्ये लावली जातात़ त्यावेळेस रेल्वे पोलिस काय करत असतात, असा प्रवाशांचा सवाल आहे. स्टीकर लावताना ते जप्त करून संबंधितांवर कारवाई केल्याचे रेल्वे पोलिसांचे म्हणणे असले तरी ही कारवाई नाममात्र असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. सध्या अस्वच्छतेबाबत चर्चा होत असतानाच लोकलसह लांबपल्याच्या गाड्याही चांगल्या स्वच्छ झाल्या पाहिजेत, अशी रेल्वे प्रवाशांची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे रेल्वे स्टेशन परिसरात थुंकणाऱ्या, अस्वच्छता करणाऱ्यांवरही कारवाई होत नाही. स्वच्छता अभियान सुरू झाल्यानंतर रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी रेल्वे स्थानकात पाहणी करण्यासाठी येणार असल्याने त्यावेळी एक-दोन दिवस स्टेशन स्वच्छ होतांना दिसतात, मात्र आता पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती असल्याने प्रवासी हैराण आहेत. (प्रतिनिधी)