शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

लोकलचा प्रवास नको रे बाप्पा

By admin | Updated: December 18, 2014 23:51 IST

गेल्या काही दिवसांपासून ठिकठिकाणी स्वच्छता मोहिमा सुरु आहेत सुरू झाल्या. नागरिकांमध्येही स्वच्छतेबाबत बऱ्यापैकी जाणीव निर्माण झाल्याचे चित्र दिसले.

डोंबिवली - गेल्या काही दिवसांपासून ठिकठिकाणी स्वच्छता मोहिमा सुरु आहेत सुरू झाल्या. नागरिकांमध्येही स्वच्छतेबाबत बऱ्यापैकी जाणीव निर्माण झाल्याचे चित्र दिसले. मात्र पश्चिम रेल्वेच्या ट्रेनमध्ये लागलेले स्टीकर अजूनही तसेच असून ट्रेनची स्वच्छता कधी होणार, स्टीकर लागणे थांबणार कधी असा सवाल वसईतील रेल्वे प्रवासी करत आहेत. एरव्ही रेल्वेच्या निष्क्रियतेबाबत आवाज उठवून प्रसिद्धी घेणाऱ्या प्रवासी संघटना कुठे आहेत ? असा सवाल प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.ठिकठिकाणी हौसिंग सोसायट्या, सेवाभावी संस्था व नागरिकांनी स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला. तर मग प्रवाशांच्या समस्यांसाठी पुढाकार घेतलेल्या संघटनांनी एकही स्थानक - लोकल का स्वच्छ केली नाही,असा सवाल सागर गिलाणकर या प्रवाशाने केला. रेल्वेच्या स्वच्छता विभागानेही सुरुवातीला स्वच्छतेबाबत सतर्कता दाखवली असली तरी स्वच्छतेत विशेष फरक पडलेला दिसत नाही. एकीकडे या सार्वजनिक स्वच्छतेबाबत चर्चा होत असतानाच रेल्वेमध्ये लागलेल्या स्टीकरबद्दलही प्रवाशांची ओरड आहे.झटपट नोकरी लावणार, चित्रपट क्षेत्रात काम मिळणार, बाबा बंगाली, कमी किंमतीत घरे-जमीन प्लॉट अशा जाहिराती करणारे स्टीकर सर्रास लागलेले आढळून येत आहेत. या स्टीकरमुळे ट्रेनचे विद्रुपीकरण होत असून रेल्वे पोलीस निद्रेत आहे का ? असा सवालही व्यक्त होत आहे. विशेषत: रात्रीच्या वेळेस ही स्टीकर ट्रेनमध्ये लावली जातात़ त्यावेळेस रेल्वे पोलिस काय करत असतात, असा प्रवाशांचा सवाल आहे. स्टीकर लावताना ते जप्त करून संबंधितांवर कारवाई केल्याचे रेल्वे पोलिसांचे म्हणणे असले तरी ही कारवाई नाममात्र असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. सध्या अस्वच्छतेबाबत चर्चा होत असतानाच लोकलसह लांबपल्याच्या गाड्याही चांगल्या स्वच्छ झाल्या पाहिजेत, अशी रेल्वे प्रवाशांची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे रेल्वे स्टेशन परिसरात थुंकणाऱ्या, अस्वच्छता करणाऱ्यांवरही कारवाई होत नाही. स्वच्छता अभियान सुरू झाल्यानंतर रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी रेल्वे स्थानकात पाहणी करण्यासाठी येणार असल्याने त्यावेळी एक-दोन दिवस स्टेशन स्वच्छ होतांना दिसतात, मात्र आता पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती असल्याने प्रवासी हैराण आहेत. (प्रतिनिधी)