शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

पालघरमध्ये दिव्यांगांचे सबलीकरण; वंदे मातरम संस्था एक आधारस्तंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 02:23 IST

राज्यातील दिव्यांग (अपंग) व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध व्हावे, समाजातील दुर्बल, दुर्लक्षित अपंगांच्या जीवनातील अंध:कार दूर करून त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सफाळ्यातील वंदे मातरम अंध, अपंग सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून मागील सहा वर्षा पासून केला जात आहे.

पालघर : राज्यातील दिव्यांग (अपंग) व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध व्हावे, समाजातील दुर्बल, दुर्लक्षित अपंगांच्या जीवनातील अंध:कार दूर करून त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सफाळ्यातील वंदे मातरम अंध, अपंग सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून मागील सहा वर्षा पासून केला जात आहे. जिल्ह्यातील हजारो दिव्यांगाचा ही संस्था एक आधारस्तंभ आहे.आजही कुटुंबात, समाजात दिव्यागांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळत असल्याचे दिसून येते. त्यामुळे समाजातील दुर्बल व दुर्लक्षित अशा दिव्यागाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाने अपंग वित्त व विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून अपंगांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत असल्यातरी अपंगांचे प्रमाणपत्रा सह योजनांचा लाभ मिळविण्यासाठी त्यांना अनेक दिव्यातून जावे लागते. त्यामुळे वंदे मातरम संस्था अपंगांसाठी आधार बनली आहे. ३० मार्च २०११ रोजी ह्या संस्थेची स्थापना करण्यात येऊन दिव्यांगाना आवश्यक शैक्षणकि, आरोग्य विषयक सुविधा व व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम बनविण्याचे स्तुत्य कार्य ही संस्था करीत आहे. महत्वाचे म्हणजे जिल्ह्यातील गावागावात ह्या संस्थेचे कार्य सुरू आहे. त्यांच्या संस्थेला शासन पातळीवरून आर्थिक पाठिंबा मिळत नसले तरी नाउमेद न होता आपल्या व्यवसायातून आणि देणग्या द्वारे त्यांनी आपली मार्गक्रमण सुरू ठेवली आहे. जिल्हा निर्मिती पूर्वी दिव्यागांना लागणाºया प्रमाणपत्रासाठी ठाणे येथे अनेक चकरा माराव्या लागत असताना शारीरिक, मानिसक आणि आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत होते. ह्या संस्थेने डहाणू कॉटेज रुग्णालयात शिबीर भरवून प्रथम ४५० दिव्यागांना प्रमाणपत्र मिळवून दिले. आज पर्यंत २ हजाराच्या वर दिव्यागांना प्रमाणपत्रे मिळवून दिल्याने त्यांना शासनाच्या अनेक योजनांचा लाभ मिळत आहे. ह्या संस्थेचे अध्यक्ष विनोद राऊत सह त्यांचे सहकारी मोठ्या जिद्दीने हा लढा चालवला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार