शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

पालघरमध्ये दिव्यांगांचे सबलीकरण; वंदे मातरम संस्था एक आधारस्तंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 02:23 IST

राज्यातील दिव्यांग (अपंग) व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध व्हावे, समाजातील दुर्बल, दुर्लक्षित अपंगांच्या जीवनातील अंध:कार दूर करून त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सफाळ्यातील वंदे मातरम अंध, अपंग सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून मागील सहा वर्षा पासून केला जात आहे.

पालघर : राज्यातील दिव्यांग (अपंग) व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध व्हावे, समाजातील दुर्बल, दुर्लक्षित अपंगांच्या जीवनातील अंध:कार दूर करून त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सफाळ्यातील वंदे मातरम अंध, अपंग सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून मागील सहा वर्षा पासून केला जात आहे. जिल्ह्यातील हजारो दिव्यांगाचा ही संस्था एक आधारस्तंभ आहे.आजही कुटुंबात, समाजात दिव्यागांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळत असल्याचे दिसून येते. त्यामुळे समाजातील दुर्बल व दुर्लक्षित अशा दिव्यागाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाने अपंग वित्त व विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून अपंगांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत असल्यातरी अपंगांचे प्रमाणपत्रा सह योजनांचा लाभ मिळविण्यासाठी त्यांना अनेक दिव्यातून जावे लागते. त्यामुळे वंदे मातरम संस्था अपंगांसाठी आधार बनली आहे. ३० मार्च २०११ रोजी ह्या संस्थेची स्थापना करण्यात येऊन दिव्यांगाना आवश्यक शैक्षणकि, आरोग्य विषयक सुविधा व व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम बनविण्याचे स्तुत्य कार्य ही संस्था करीत आहे. महत्वाचे म्हणजे जिल्ह्यातील गावागावात ह्या संस्थेचे कार्य सुरू आहे. त्यांच्या संस्थेला शासन पातळीवरून आर्थिक पाठिंबा मिळत नसले तरी नाउमेद न होता आपल्या व्यवसायातून आणि देणग्या द्वारे त्यांनी आपली मार्गक्रमण सुरू ठेवली आहे. जिल्हा निर्मिती पूर्वी दिव्यागांना लागणाºया प्रमाणपत्रासाठी ठाणे येथे अनेक चकरा माराव्या लागत असताना शारीरिक, मानिसक आणि आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत होते. ह्या संस्थेने डहाणू कॉटेज रुग्णालयात शिबीर भरवून प्रथम ४५० दिव्यागांना प्रमाणपत्र मिळवून दिले. आज पर्यंत २ हजाराच्या वर दिव्यागांना प्रमाणपत्रे मिळवून दिल्याने त्यांना शासनाच्या अनेक योजनांचा लाभ मिळत आहे. ह्या संस्थेचे अध्यक्ष विनोद राऊत सह त्यांचे सहकारी मोठ्या जिद्दीने हा लढा चालवला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार