शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
3
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
6
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
7
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
8
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
9
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
10
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
11
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
12
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
13
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
14
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
15
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
16
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
17
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
18
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
19
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
20
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाड्यांतच रोजगार, पोषण आहारासाठी जि.प.चे प्रतिलाभार्थी १० रू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 06:17 IST

पोषण आहारासाठी प्रतिलाभार्थी अतिरिक्त १० रूपये जि. प. स्वनिधीतून देणार, अंगणवाड्यात गोधडी शिवण्याचा रोजगार सॅम आणि मॅम बालकांच्या मातांना उपलब्ध करून देणार, रोजगारासाठी स्थलांतरण रोखण्यासाठी कृषीपूरक व्यवसाय सुरू करणार आदी महत्वपूर्ण घोषणा आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा यांनी शुक्रवारी केल्यात.

पालघर : पोषण आहारासाठी प्रतिलाभार्थी अतिरिक्त १० रूपये जि. प. स्वनिधीतून देणार, अंगणवाड्यात गोधडी शिवण्याचा रोजगार सॅम आणि मॅम बालकांच्या मातांना उपलब्ध करून देणार, रोजगारासाठी स्थलांतरण रोखण्यासाठी कृषीपूरक व्यवसाय सुरू करणार आदी महत्वपूर्ण घोषणा आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा यांनी शुक्रवारी केल्यात.भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६८ व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ दुग्धविकास प्रकल्प, पोलीस परेड मैदान कोळगाव येथे पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय खरपडे, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर,पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ नवनाथ जरे, उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, संभाजी अडकुणे, जिल्हा पुरवठा अधिकारी उमेश बिरारी यांसह जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, नगरपरिषदेचे पदाधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक विविध विभागांचे अधिकारी व स्थानिक नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.‘भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना’’ अधिक परिणामकारकरित्या राबविता यावी यासाठी पालघर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने एक वेळ आहाराच्या खर्चासाठी देण्यात येणार्या प्रति लाभार्थी रु . २५/- व्यतिरिक्त रु . १०/- इतका निधी जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून देण्याचा निर्णय घेतला आहे.राज्य शासनाने आपल्या या उपक्र माची विशेष दखल घेऊन आपल्या प्रमाणेच इतर जिल्हा परिषदांनीही निधी उपलब्ध करु न देण्यासंदर्भाचा शासन निर्णय निर्गिमत केला आहे. ही आपल्या जिल्हयाच्या दृष्टिने अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी पोलीस दलाचे संचलन झाले. त्याचे नेतृत्व उपविभागीय पोलीस अधिकारी निमति गोयल यांनी केले.यावेळी जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, दंगल नियंत्रण पथक यांची माहिती देणारे चित्ररथ सहभागी झाले होते.अधिकाºयांचा सत्कारबोईसरचे पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार यांना राष्ट्रपती पदक सफाळे पोलीस ठाण्याचे सपोनि. जितेंद्र ठाकूर यांना महासंचालक पदक, गडचिरोली येथे विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या स.पो.नि चव्हाण यांच्यासह नैपुण्य संपादन केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचाही सत्कार झाला.जिल्हा विकास निधीतून आपण नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत गोधडी शिवण्याचा उपक्र म राबविणार आहोत. ज्यामुळे सॅम व मॅम मधील बालकांच्या मातांना अंगणवाडीतच रोजगार उपलब्ध होईल. या उपक्र मासाठी १ कोटी रु पयांचा निधी दिला आहे. आदिवासी बांधवांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे. कुक्कुट पालन, शेळी पालन याबरोबरच स्वयंरोजगार स्थानिक गावातच निर्माण करु न देण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यात प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना अंतर्गत प्रशिक्षण वर्ग सुरु आहेत. तसेच जिल्ह्यात कृषी, कुक्कुटपालन, गारमेंट क्षेत्रात कम्युनिटी गट तयार करु न रोजगार प्रशिक्षण सुरु आहेत.शासनाच्या निकषाप्रमाणे आपला जिल्हा २ आॅक्टोबर, २०१७ रोजी हागणदारी मुक्त घोषित झाला आहे. ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. जिल्ह्यातील कुपोषण व बाल मृत्यू कमी करण्यासाठी विशेष टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. त्याला चांगले यश प्राप्त झाले आहे. या माध्यमातून कुपोषणाचे प्रमाण कमी होत असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्था हा लोकशाहीचा अविभाज्य घटक आहे. खेडी समृद्ध बनविण्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार