शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

जिल्हा परिषदेच्या नळ योजनेच्या विहिरीची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 00:08 IST

जिल्हा पाणी पुरवठा विभागाचे दुर्लक्ष

विक्रमगड : तालुक्यातील माण मार्गावर उल्हासराव भोईर आश्रमशाळा असून येथे जवळजवळ ४५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या आश्रमशाळेत पाणीपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र नळ योजना असून या योजनेची पूर्ण दुरवस्था झालेली आहे. विहिरीचा कठडा तुटलेला आहे. आतमधील पायटिंग तुटलेली आहे व ही विहीर जमिनीलगत असल्याने पावसाळ्यात विहिरीत खराब पाणी जाते. तसेच विहीर विद्यार्थ्यांसाठी धोकादायक झालेली आहे. यासाठी या आश्रमशाळेने चार ते पाच महिन्यांपूर्वी ग्रामीण नळपाणी पुरवठा विभाग पालघर व विक्रमगड या कार्यालयात दुरुस्तीसंदर्भात पत्र दिले आहे, परंतु या पत्राची आजपर्यंत काहीच दखल घेतलेली दिसत नाही.

पाणी पुरवठ्यावर प्रशासन लाखो रुपये खर्च करीत असताना या आदिवासी मुलांच्या आश्रमशाळेतील नळ योजनेकडे केव्हा लक्ष देणार, असा सवाल पालकांनी केला आहे. ही योजना जिल्हा परिषद ठाणे २००३-०४ मध्ये झालेली आहे. आजपर्यंत या योजनेची कोणत्याही प्रकारची दुरुस्ती केलेली नाही. जवळजवळ १९ वर्ष जुन्या योजनेवर खर्च करण्यासाठी पाणीपुरवठा विभाग दुर्लक्ष करीत आहे. या नळ योजना दुरुस्तीसाठी संबंधित पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी पाहून आलेले आहेत. तरीही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या योजनेची दुरुस्तीची जबाबदारी पाणीपुरवठा विभागाची असताना ते जबाबदारी झटकत आहेत, असा आरोप पालकांकडून केला जात आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारWaterपाणी