शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

रेशनपासून अंत्योदयी वंचित, केशरीवाल्यांनाही फटका : राज्य सरकारच्या नव्या धोरणामुळे फरफट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 01:46 IST

राज्य सरकारच्या निर्णयानुसार दारिद्य रेषेखालील, अंत्योदय योजनेतील ९७,०८५ व केशरी कार्डधारकांमधील ७० टक्के कुटुंबांचा समावेश उत्पन्नाच्या आधारे प्राधान्य यादीत करण्यात येणार असल्याने हे लाभार्थी दिवाळीच्या तोंडावरच रास्त

वसई : राज्य सरकारच्या निर्णयानुसार दारिद्य रेषेखालील, अंत्योदय योजनेतील ९७,०८५ व केशरी कार्डधारकांमधील ७० टक्के कुटुंबांचा समावेश उत्पन्नाच्या आधारे प्राधान्य यादीत करण्यात येणार असल्याने हे लाभार्थी दिवाळीच्या तोंडावरच रास्त धान्य दुकानातून मिळणाºया अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंपासून वंचित राहिले असल्याचा आरोप विवेक पंडित यांनी केला आहे.अंत्योदय लाभार्थ्यांमधील १ ते २ व्यक्ती असलेल्या कुटुंबाचे रेशन कार्ड अंत्योदय मधून प्राधान्य यादीत समाविष्ट केले जाणार आहे. मात्र, गावपातळीवर याची अंमलबजावणी करण्यात अडचणी येत असल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर लोकांना रेशनमधून अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू मिळेनाशा झाल्या असल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.अंत्योदयमधील काही कुटुंबांमध्ये १ ते २ व्यक्ती आहेत. परंतु, त्या वृद्ध, अपंग, निराधार, विधवा परित्यक्ता आहेत. अशांना योजनेतून वगळल्याने त्यांचे नुकसान होत आहे. या निर्णयाचा पुनर्विचार करून वृद्ध (६० वर्षांवरील व्यक्ती), अपंग, निराधार, विधवा व परित्यक्ता यांना अंत्योदय योजनेमधून वगळू नये. तसेच कातकरी ही आदिम व मागास आदिवासी असल्याने सर्व कातकरींचा अंत्योदय योजनेत समावेश असावा. त्यांना कोणत्याही कारणास्तव अंत्योदय योजनेतून वगळण्यात येऊ नये, अशी मागणी पंडित यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.प्राधान्य लाभार्थ्यांची यादी शासनस्तरावर करा!-केशरी कार्डधारकांमधील उत्पन्नाच्या आधारे ७० टक्के रेशन कार्डधारकांना प्राधान्य यादीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्या तरी अंतिम प्राधान्य यादी गावपातळीवर तयार केली जाते. त्यामुळे प्राधान्य यादीसाठी आलेले धान्य सर्व रेशन कार्डधारकांमध्ये वितरित केले जाते. परिणामी यादीतील पात्र लाभ धारकांना आवश्यक ते पूर्ण शंभर टक्के धान्य मिळत नाही, अशीही पंडित यांची तक्रार आहे. गोरगरीबांना त्यांचे हक्काचे धान्य मिळायला हवे. त्यासाठी प्राधान्यक्रमातील लाभार्थ्यांची यादी शासन स्तरावरून निश्चित करण्यात यावी, अशी पंडित यांची मागणी आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार