शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

रेशनपासून अंत्योदयी वंचित, केशरीवाल्यांनाही फटका : राज्य सरकारच्या नव्या धोरणामुळे फरफट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 01:46 IST

राज्य सरकारच्या निर्णयानुसार दारिद्य रेषेखालील, अंत्योदय योजनेतील ९७,०८५ व केशरी कार्डधारकांमधील ७० टक्के कुटुंबांचा समावेश उत्पन्नाच्या आधारे प्राधान्य यादीत करण्यात येणार असल्याने हे लाभार्थी दिवाळीच्या तोंडावरच रास्त

वसई : राज्य सरकारच्या निर्णयानुसार दारिद्य रेषेखालील, अंत्योदय योजनेतील ९७,०८५ व केशरी कार्डधारकांमधील ७० टक्के कुटुंबांचा समावेश उत्पन्नाच्या आधारे प्राधान्य यादीत करण्यात येणार असल्याने हे लाभार्थी दिवाळीच्या तोंडावरच रास्त धान्य दुकानातून मिळणाºया अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंपासून वंचित राहिले असल्याचा आरोप विवेक पंडित यांनी केला आहे.अंत्योदय लाभार्थ्यांमधील १ ते २ व्यक्ती असलेल्या कुटुंबाचे रेशन कार्ड अंत्योदय मधून प्राधान्य यादीत समाविष्ट केले जाणार आहे. मात्र, गावपातळीवर याची अंमलबजावणी करण्यात अडचणी येत असल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर लोकांना रेशनमधून अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू मिळेनाशा झाल्या असल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.अंत्योदयमधील काही कुटुंबांमध्ये १ ते २ व्यक्ती आहेत. परंतु, त्या वृद्ध, अपंग, निराधार, विधवा परित्यक्ता आहेत. अशांना योजनेतून वगळल्याने त्यांचे नुकसान होत आहे. या निर्णयाचा पुनर्विचार करून वृद्ध (६० वर्षांवरील व्यक्ती), अपंग, निराधार, विधवा व परित्यक्ता यांना अंत्योदय योजनेमधून वगळू नये. तसेच कातकरी ही आदिम व मागास आदिवासी असल्याने सर्व कातकरींचा अंत्योदय योजनेत समावेश असावा. त्यांना कोणत्याही कारणास्तव अंत्योदय योजनेतून वगळण्यात येऊ नये, अशी मागणी पंडित यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.प्राधान्य लाभार्थ्यांची यादी शासनस्तरावर करा!-केशरी कार्डधारकांमधील उत्पन्नाच्या आधारे ७० टक्के रेशन कार्डधारकांना प्राधान्य यादीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्या तरी अंतिम प्राधान्य यादी गावपातळीवर तयार केली जाते. त्यामुळे प्राधान्य यादीसाठी आलेले धान्य सर्व रेशन कार्डधारकांमध्ये वितरित केले जाते. परिणामी यादीतील पात्र लाभ धारकांना आवश्यक ते पूर्ण शंभर टक्के धान्य मिळत नाही, अशीही पंडित यांची तक्रार आहे. गोरगरीबांना त्यांचे हक्काचे धान्य मिळायला हवे. त्यासाठी प्राधान्यक्रमातील लाभार्थ्यांची यादी शासन स्तरावरून निश्चित करण्यात यावी, अशी पंडित यांची मागणी आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार