शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

रेशनपासून अंत्योदयी वंचित, केशरीवाल्यांनाही फटका : राज्य सरकारच्या नव्या धोरणामुळे फरफट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 01:46 IST

राज्य सरकारच्या निर्णयानुसार दारिद्य रेषेखालील, अंत्योदय योजनेतील ९७,०८५ व केशरी कार्डधारकांमधील ७० टक्के कुटुंबांचा समावेश उत्पन्नाच्या आधारे प्राधान्य यादीत करण्यात येणार असल्याने हे लाभार्थी दिवाळीच्या तोंडावरच रास्त

वसई : राज्य सरकारच्या निर्णयानुसार दारिद्य रेषेखालील, अंत्योदय योजनेतील ९७,०८५ व केशरी कार्डधारकांमधील ७० टक्के कुटुंबांचा समावेश उत्पन्नाच्या आधारे प्राधान्य यादीत करण्यात येणार असल्याने हे लाभार्थी दिवाळीच्या तोंडावरच रास्त धान्य दुकानातून मिळणाºया अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंपासून वंचित राहिले असल्याचा आरोप विवेक पंडित यांनी केला आहे.अंत्योदय लाभार्थ्यांमधील १ ते २ व्यक्ती असलेल्या कुटुंबाचे रेशन कार्ड अंत्योदय मधून प्राधान्य यादीत समाविष्ट केले जाणार आहे. मात्र, गावपातळीवर याची अंमलबजावणी करण्यात अडचणी येत असल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर लोकांना रेशनमधून अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू मिळेनाशा झाल्या असल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.अंत्योदयमधील काही कुटुंबांमध्ये १ ते २ व्यक्ती आहेत. परंतु, त्या वृद्ध, अपंग, निराधार, विधवा परित्यक्ता आहेत. अशांना योजनेतून वगळल्याने त्यांचे नुकसान होत आहे. या निर्णयाचा पुनर्विचार करून वृद्ध (६० वर्षांवरील व्यक्ती), अपंग, निराधार, विधवा व परित्यक्ता यांना अंत्योदय योजनेमधून वगळू नये. तसेच कातकरी ही आदिम व मागास आदिवासी असल्याने सर्व कातकरींचा अंत्योदय योजनेत समावेश असावा. त्यांना कोणत्याही कारणास्तव अंत्योदय योजनेतून वगळण्यात येऊ नये, अशी मागणी पंडित यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.प्राधान्य लाभार्थ्यांची यादी शासनस्तरावर करा!-केशरी कार्डधारकांमधील उत्पन्नाच्या आधारे ७० टक्के रेशन कार्डधारकांना प्राधान्य यादीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्या तरी अंतिम प्राधान्य यादी गावपातळीवर तयार केली जाते. त्यामुळे प्राधान्य यादीसाठी आलेले धान्य सर्व रेशन कार्डधारकांमध्ये वितरित केले जाते. परिणामी यादीतील पात्र लाभ धारकांना आवश्यक ते पूर्ण शंभर टक्के धान्य मिळत नाही, अशीही पंडित यांची तक्रार आहे. गोरगरीबांना त्यांचे हक्काचे धान्य मिळायला हवे. त्यासाठी प्राधान्यक्रमातील लाभार्थ्यांची यादी शासन स्तरावरून निश्चित करण्यात यावी, अशी पंडित यांची मागणी आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार