शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

डहाणूत तुलसीविवाहाची लगीनघाई ; सोहळ्यात सेल्फीचा डिमांड, भटजींचाही मान मोठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 03:25 IST

कार्तिक शुद्ध एकादशीपासून तुलसी विवाहाला प्रारंभ झाला असून पौर्णिमेपर्यंत विवाहाचा सोहळा रंगणार आहे. दरम्यान या निमित्ताने हळदीकुंकवाचे कार्यक्रम पार पडत असल्याने महिलावर्ग पारंपरिक पद्धतीने सोहळ्याचा आनंद द्विगुणित करीत आहेत.

बोर्डी : कार्तिक शुद्ध एकादशीपासून तुलसी विवाहाला प्रारंभ झाला असून पौर्णिमेपर्यंत विवाहाचा सोहळा रंगणार आहे. दरम्यान या निमित्ताने हळदीकुंकवाचे कार्यक्रम पार पडत असल्याने महिलावर्ग पारंपरिक पद्धतीने सोहळ्याचा आनंद द्विगुणित करीत आहेत. गतवर्षी नुकताच जाहीर झालेल्या नोटबंदीच्या निर्णयाने तुलसी विवाह कार्यक्र मावर निरु त्साहाचे वातावरण होते.कार्तिक शुद्ध एकादशी ते पौर्णिमा या कालावधीत समाजरीतीनुसार तुलसी विवाह लावण्याची पद्धत वेगवेगळी आहे. ग्रामीण भागात तिन्ही सांजेनंतर तुलसी विवाह लावला जातो. त्यामुळे या वेळी पंत्या आणि आकाशकंदिलाच्या रोषणाईने परिसर प्रकाशित झालेला दिसतो. तुलसी वृंदावना भोवती गेरू किंवा शेणाचा सडा घोलून रांगोळी काढली जाते. ऊसाच्या कांड्यांच्या मंडपाला फुलांच्या माळांनी सजविण्यात येते. बहुतेक ठिकाणी सुवाशींनीकडून विवाह लावण्याची प्रथा आहे. या करीता तुळशीला फुलं वा मोत्यांच्या मुंडावळ्या घालून ओटी भरली जाते. बाळकृष्णाची मूर्ती किंवा कृष्ण म्हणून उसाचे कांडे प्रतिकात्मक उभे ठेऊन आंतरपाट धरला जातो. पूर्वी तोंडाने तर हल्ली इंटरनेटवरून डाऊनलोड केलेली मंगलाष्टके मोबाईलद्वारे या वेळी वाजविली जात आहेत. या वेळी कार्यक्र मानंतर शिरा, फराळ तसेच आवळा, शिंगाडा, नारळ आदि. फळांचा प्रसाद वाटला जातो.दरम्यान या विवाह सोहळ्यानिमित्त महिलांप्रमाणेच बच्चेकंपनी सेल्फी आणि ग्रुप फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड करीत असल्याने सद्या तुलसी विवाहाची चर्चा रंगताना दिसत आहे. गतवर्षी तुलसी विवाह काळात नोटाबंदीच्या निर्णयाचे गालबोट सोहळ्याला लागल्याने उत्साहाचा आनंद लुटता आला नव्हता. पैशांची चणचण आणि व्यवहारातून बाद झालेल्या नोटा बदलण्यासाठी दिवसभर उभे राहणे या सर्व गोष्टीचा परिणाम तुलसी विवाह या सणावर झाल्याच्या कटू आठवणी लोकमतकडे बोलून दाखवल्या.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार