शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

डहाणूत तुलसीविवाहाची लगीनघाई ; सोहळ्यात सेल्फीचा डिमांड, भटजींचाही मान मोठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 03:25 IST

कार्तिक शुद्ध एकादशीपासून तुलसी विवाहाला प्रारंभ झाला असून पौर्णिमेपर्यंत विवाहाचा सोहळा रंगणार आहे. दरम्यान या निमित्ताने हळदीकुंकवाचे कार्यक्रम पार पडत असल्याने महिलावर्ग पारंपरिक पद्धतीने सोहळ्याचा आनंद द्विगुणित करीत आहेत.

बोर्डी : कार्तिक शुद्ध एकादशीपासून तुलसी विवाहाला प्रारंभ झाला असून पौर्णिमेपर्यंत विवाहाचा सोहळा रंगणार आहे. दरम्यान या निमित्ताने हळदीकुंकवाचे कार्यक्रम पार पडत असल्याने महिलावर्ग पारंपरिक पद्धतीने सोहळ्याचा आनंद द्विगुणित करीत आहेत. गतवर्षी नुकताच जाहीर झालेल्या नोटबंदीच्या निर्णयाने तुलसी विवाह कार्यक्र मावर निरु त्साहाचे वातावरण होते.कार्तिक शुद्ध एकादशी ते पौर्णिमा या कालावधीत समाजरीतीनुसार तुलसी विवाह लावण्याची पद्धत वेगवेगळी आहे. ग्रामीण भागात तिन्ही सांजेनंतर तुलसी विवाह लावला जातो. त्यामुळे या वेळी पंत्या आणि आकाशकंदिलाच्या रोषणाईने परिसर प्रकाशित झालेला दिसतो. तुलसी वृंदावना भोवती गेरू किंवा शेणाचा सडा घोलून रांगोळी काढली जाते. ऊसाच्या कांड्यांच्या मंडपाला फुलांच्या माळांनी सजविण्यात येते. बहुतेक ठिकाणी सुवाशींनीकडून विवाह लावण्याची प्रथा आहे. या करीता तुळशीला फुलं वा मोत्यांच्या मुंडावळ्या घालून ओटी भरली जाते. बाळकृष्णाची मूर्ती किंवा कृष्ण म्हणून उसाचे कांडे प्रतिकात्मक उभे ठेऊन आंतरपाट धरला जातो. पूर्वी तोंडाने तर हल्ली इंटरनेटवरून डाऊनलोड केलेली मंगलाष्टके मोबाईलद्वारे या वेळी वाजविली जात आहेत. या वेळी कार्यक्र मानंतर शिरा, फराळ तसेच आवळा, शिंगाडा, नारळ आदि. फळांचा प्रसाद वाटला जातो.दरम्यान या विवाह सोहळ्यानिमित्त महिलांप्रमाणेच बच्चेकंपनी सेल्फी आणि ग्रुप फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड करीत असल्याने सद्या तुलसी विवाहाची चर्चा रंगताना दिसत आहे. गतवर्षी तुलसी विवाह काळात नोटाबंदीच्या निर्णयाचे गालबोट सोहळ्याला लागल्याने उत्साहाचा आनंद लुटता आला नव्हता. पैशांची चणचण आणि व्यवहारातून बाद झालेल्या नोटा बदलण्यासाठी दिवसभर उभे राहणे या सर्व गोष्टीचा परिणाम तुलसी विवाह या सणावर झाल्याच्या कटू आठवणी लोकमतकडे बोलून दाखवल्या.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार