शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

निसर्गाच्या ‘दाना’ला कोरोनाच्या ग्रहणामुळे आदिवासी बांधवांमध्ये निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 23:35 IST

बाजारात रानमेवा दाखल, पण ग्राहकच नाहीत 

- राहुल वाडेकरलोकमत न्यूज नेटवर्कविक्रमगड : बदलत्या हवामानाचा फटका बसूनही हिरव्यागार आंबट कैऱ्या विक्रमगड, जव्हार तसेच मोखाड्यातील बाजारांत दाखल झाल्या आहेत. मात्र, निसर्गाने दिलेल्या ‘दाना’ला कोरोनाचे ग्रहण लागल्याने संचारबंदीमुळे बाजारात ग्राहकच येत नसल्याने रानमेवा विक्रीसाठी घेऊन आलेल्या आदिवासींमध्ये निराशा पसरली आहे.

आंबा तसेच काजूगर या पिकांवर हवामानाचा मोठा परिणाम होत असल्याने गेल्या दोन-चार वर्षांत आंबा पूर्वीप्रमाणे मोठ्या प्रमाणात बाजारात येणे कठीण झाले आहे. त्यामुळे बाजारपेठेत १०० रुपये किलो दराने मोठी कैरी तर छोटी कैरी साठ रुपये दराने विकण्यात येत आहे, तर काही दिवसांपासून ओले काजूगरही बाजारात दिसू लागले आहेत. त्यामुळे आदिवासींना थोड्याफार प्रमाणात का होईना रोजगार उपलब्ध होऊन अर्थार्जनाचा लाभ होत आहे. परंतु, संचारबंदीमुळे त्यांचाही हिरमोड होत आहे.

विक्रमगड, जव्हार, मोखाडा हे तीन तालुके आदिवासीबहुल असल्याने येथे फक्त शेती हेच उपजीविकेचे साधन आहे. एमआयडीसी नसल्याने कारखानदारी व मोठा उद्योगधंदा वा रोजगार देणारे कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने येथीन आदिवासींना निसर्गावरच अवलंबून राहावे लागते. त्याप्रमाणे जंगल संपत्तीवर आपली उपजीविका करत कुंटुंबाची गुजराण करावी लागते. त्यामुळे उन्हाळ्यात आंबा, काजू, करवंद, जांभळे, फणस तर पावसाळ्यात कर्टुली, रानभाजी, शेवळे यांची बाजारात विक्री करून उदरनिर्वाह करावा लागतो. मात्र, सध्या कोरोनामुळे त्यांच्यावर मोठे संकट ओढवले आहे. बाजारात आंब्यांच्या कैऱ्यांना बाहेरील चाकरमान्यांकडून जास्त प्रमाणात मागणी असते. शिवाय स्थानिक नागरिकही खरेदी करण्यासाठी गर्दी करतात. आंबा कैरीचे लोणचे तयार करण्यासाठी अनेक गृहिणी कैऱ्या खरेदी करतात, मात्र यंदा पुन्हा कोरोनाने आदिवासींना निराश केले आहे.

नैसर्गिक पिकांवर उपजीविकाnजव्हार, मोखाडा, विक्रमगड तालुक्यातील प्रत्येक आदिवासींच्या घरासमोर दोन-चार आंब्यांची व काजूची झाडे हमखास असतातच, तर या फळांच्या बागाही या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत.  nजव्हारच्या धाब्यांवर स्पेशल थाळीत काजूगरांची भाजी ऑर्डरनुसार तयार करून दिली जाते. या नैसर्गिक पिकांवर आदिवासी मात्र आपली उपजीविका करत रोजगार मिळवत आहेत. nभेळ विक्रेतेही कैरीची खरेदी करतात. कैरीबरोबर ओले काजूगर बाजारात येत आहेत. २५० ते ३०० रुपये किलो दराने काजूगरांची विक्री होत आहे.