शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
2
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
3
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
4
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
5
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
6
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
7
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
8
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
9
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
10
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
11
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
12
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
13
Video - मेलेलं झुरळ, वर कीटकांची पावडर... कॉकरोच कॉफी तुफान व्हायरल, जाणून घ्या किंमत
14
जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं ट्रॅविस हेडची ‘तोडफोड’ सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला जगतातील पहिला फलंदाज
15
टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल
16
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
17
सामुद्रिक शास्त्र: शरीराच्या कुठल्या भागावर 'तिळ' आहे, त्यानुसार समुद्र शास्त्र सांगते तुमचे भाकीत!
18
​​​​​​​Kotak Mahindra Bank Success Story: २ खोल्यांपासून झाली सुरुवात, आज ४ लाख कोटींचा टर्नओव्हर; वाचा कोटक महिंद्रा बँकेची अनटोल्ड स्टोरी
19
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये चीनने पाकिस्तानला शस्त्रे पुरवली, राफेलचीही बदनामी केली; अहवालात खुलासा
20
VIDEO : तिकडं स्टार्कचा अप्रतिम फ्लाइंग कॅच; इकडं नेटकऱ्यांनी KL राहुलची उडवली खिल्ली; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गाच्या ‘दाना’ला कोरोनाच्या ग्रहणामुळे आदिवासी बांधवांमध्ये निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 23:35 IST

बाजारात रानमेवा दाखल, पण ग्राहकच नाहीत 

- राहुल वाडेकरलोकमत न्यूज नेटवर्कविक्रमगड : बदलत्या हवामानाचा फटका बसूनही हिरव्यागार आंबट कैऱ्या विक्रमगड, जव्हार तसेच मोखाड्यातील बाजारांत दाखल झाल्या आहेत. मात्र, निसर्गाने दिलेल्या ‘दाना’ला कोरोनाचे ग्रहण लागल्याने संचारबंदीमुळे बाजारात ग्राहकच येत नसल्याने रानमेवा विक्रीसाठी घेऊन आलेल्या आदिवासींमध्ये निराशा पसरली आहे.

आंबा तसेच काजूगर या पिकांवर हवामानाचा मोठा परिणाम होत असल्याने गेल्या दोन-चार वर्षांत आंबा पूर्वीप्रमाणे मोठ्या प्रमाणात बाजारात येणे कठीण झाले आहे. त्यामुळे बाजारपेठेत १०० रुपये किलो दराने मोठी कैरी तर छोटी कैरी साठ रुपये दराने विकण्यात येत आहे, तर काही दिवसांपासून ओले काजूगरही बाजारात दिसू लागले आहेत. त्यामुळे आदिवासींना थोड्याफार प्रमाणात का होईना रोजगार उपलब्ध होऊन अर्थार्जनाचा लाभ होत आहे. परंतु, संचारबंदीमुळे त्यांचाही हिरमोड होत आहे.

विक्रमगड, जव्हार, मोखाडा हे तीन तालुके आदिवासीबहुल असल्याने येथे फक्त शेती हेच उपजीविकेचे साधन आहे. एमआयडीसी नसल्याने कारखानदारी व मोठा उद्योगधंदा वा रोजगार देणारे कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने येथीन आदिवासींना निसर्गावरच अवलंबून राहावे लागते. त्याप्रमाणे जंगल संपत्तीवर आपली उपजीविका करत कुंटुंबाची गुजराण करावी लागते. त्यामुळे उन्हाळ्यात आंबा, काजू, करवंद, जांभळे, फणस तर पावसाळ्यात कर्टुली, रानभाजी, शेवळे यांची बाजारात विक्री करून उदरनिर्वाह करावा लागतो. मात्र, सध्या कोरोनामुळे त्यांच्यावर मोठे संकट ओढवले आहे. बाजारात आंब्यांच्या कैऱ्यांना बाहेरील चाकरमान्यांकडून जास्त प्रमाणात मागणी असते. शिवाय स्थानिक नागरिकही खरेदी करण्यासाठी गर्दी करतात. आंबा कैरीचे लोणचे तयार करण्यासाठी अनेक गृहिणी कैऱ्या खरेदी करतात, मात्र यंदा पुन्हा कोरोनाने आदिवासींना निराश केले आहे.

नैसर्गिक पिकांवर उपजीविकाnजव्हार, मोखाडा, विक्रमगड तालुक्यातील प्रत्येक आदिवासींच्या घरासमोर दोन-चार आंब्यांची व काजूची झाडे हमखास असतातच, तर या फळांच्या बागाही या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत.  nजव्हारच्या धाब्यांवर स्पेशल थाळीत काजूगरांची भाजी ऑर्डरनुसार तयार करून दिली जाते. या नैसर्गिक पिकांवर आदिवासी मात्र आपली उपजीविका करत रोजगार मिळवत आहेत. nभेळ विक्रेतेही कैरीची खरेदी करतात. कैरीबरोबर ओले काजूगर बाजारात येत आहेत. २५० ते ३०० रुपये किलो दराने काजूगरांची विक्री होत आहे.