शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

पारंपरिक समुद्र मत्स्यशेतीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 00:50 IST

तालुक्यातील डहाणू आणि घोलवड समुद्रकिनारी दगडाचा बांध घालून पारंपरिक शेतीद्वारे ऑक्टोबर ते मे या आठ महिन्यांच्या काळात मासेमारी केली जाते.

अनिरुद्ध पाटील डहाणू/बोर्डी : तालुक्यातील डहाणू आणि घोलवड समुद्रकिनारी दगडाचा बांध घालून पारंपरिक शेतीद्वारे ऑक्टोबर ते मे या आठ महिन्यांच्या काळात मासेमारी केली जाते. मात्र चक्रीवादळादरम्यान लाटांची तीव्रता वाढल्याने बांध आणि उभारलेले बांबू जाळींसह जमीनदोस्त झाल्याने मत्स्य शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.उत्तर कोकणातील महाराष्ट्र, गुजरात सीमा भागात वसलेल्या या तालुक्यातील चिखले आणि घोलवड या गावांना विशिष्ट भौगोलिक रचनेचा समुद्रकिनारा लाभला आहे. येथे किनाºयापासून खोल समुद्राच्या दिशेने सुमारे शंभर एकर क्षेत्रावर खडकाळ भाग पसरला आहे. जमिनीचा समुद्रात शिरलेला चिंचोळा भाग आणि खडक यामुळे भरतीच्या पाण्यासह खोल समुद्रातील मासे किनाºयापर्यंत येतात. त्यांना पकडण्यासाठी ज्याप्रमाणे भात शेतीला बांधबंधिस्ती केली जाते, त्याप्रमाणे एक मच्छीमार समुद्रात एक-एक दगड रचून तीन ते चार एकरचे क्षेत्र मासेमारीसाठी तयार करतो. ओहोटीच्यावेळी पाणी ओसरू लागताच, या बांधांमुळे मासे शेती बाहेर पडू न शकल्याने छोट्या-छोट्या खड्ड्यांमध्ये राहतात. त्यानंतर वीत-दीडवीत पाणी पातळी झाल्यावर मासे जाळ्याच्या सहाय्याने पकडले जातात. शेकडो वर्षांपासून येथे सापळा पद्धतीची पारंपरिक मत्स्यशेती केली जाते.भात शेतीप्रमाणेच समुद्रातील ही शेती कुटुंबातील एका पिढीकडून दुसºया पिढीकडे हस्तांतरित होते. गावात अशी मोजकीच कुटुंबे असून त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळते. तर वर्षभर ओली आणि सुकी मासळी घरगुती स्वयंपाक आणि विक्रीकरिता उपलब्ध होत असल्याने कुटुंबाचे अर्थकारण चांगले चालते.या प्रकारच्या शेतीच्या बांधबंधीस्तीचे काम गणेशोत्सवानंतर हाती घेतले जाते. अनंतचतुर्दशी ते सर्वपित्री अमावस्येपर्यंतच्या या काळात समुद्रातील ओहटीचे गणित सांभाळून दिवसातील चार-पाच तासात दगडावर-दगड रचून बांध घातला जातो. याकरिता प्रतिवर्षी २५ ते ३० हजारांचा मजुरीचा खर्च येतो. तर तेवढाच खर्च बांबू, जाळी यांना येत असून ही साधनसामुग्री पुढील चार-पाच वर्ष वापरता येते. भांगाची भरती वगळता आॅक्टोबर ते मे या आठ महिन्यात प्रतिदिन येणाºया दोन ओहटीच्यावेळी मासेमारी केली जाते.>हिवाळ्यातील मासेमारीपासूनही वंचितगेल्या दशकापासून या बांधालगत बांबू उभारून त्यावर सहा ते आठ फूट उंचीचे जाळे लावले जाते. त्यामुळे छोट्या आकारातील मासेमारी करणेही सोपे झाले आहे. या पद्धतीमुळे बांधबंधीस्तीकरिता वेळ कमी लागतो. मात्र मोठ्या माशांचे प्रमाण कमी होत असल्याची माहिती चिखले गावच्या वडकतीपाडा येथील मत्स्य शेतकरी सुजय मोठे यांनी दिली. दरम्यान, दोन चक्रीवादळामुळे लाटांची तीव्रता वाढल्याने बांधावर रचून ठेवलेले दगड खाली पडले आहेत. तर बांबू आणि जाळी जमीनदोस्त झाली. त्यामुळे पुन्हा हे काम हाती घ्यावे लागणार असून मजुरीवर खर्च होणार आहेत. तर हिवाळ्याच्या पहिल्या हंगामात येणाºया मासेमारीपासून वंचित राहावे लागून आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे.>जिल्ह्यातील110कि.मी. लांबीच्या समुद्रकिनारी अनेक भागात खडक आहेत. मात्र चिखले, घोलवड गावात या पद्धतीची मत्स्यशेती शेकडो वर्षांपासून केली जाते. पावसाळ्यातील भात शेती व्यतिरिक्त आठ महिन्यातील हा जोडधंद्यामुळे एका कुटुंबाची गुजराण चांगल्या प्रकारे होते. कोळंबी, खेकडे, भामट, मागन, जिताडे, माकली, बोय अशा नानाविविध शेकडो जातींचे मासे हे ऋतू आणि समुद्री परिसंस्थेनुसार मिळतात. त्यामुळे या कुटुंबासह पंचक्र ोशीत ताज्या माशांची गरज भागवली जाते.>‘‘चक्र ीवादळामुळे समुद्रात लाटांची तीव्रता वाढून चिखले आणि घोलवड गावातील सुमारे ४० ते ५० पारंपरिक मत्स्य शेतकऱ्यांचे सरासरी २५ ते ३० हजारांचे नुकसान झाल्याने कुटुंबाचे अर्थकारण बिघडणार आहे. ही आगळी-वेगळी मत्स्यशेती शेकडो वर्षांपासून आमचे कुटुंबीय करीत असून हा ठेवा पुढच्या पिढीपर्यंत टिकवायचा असल्यास आम्हालाही नुकसान भरपाई मिळायला हवी.’’- कमलेश जोंधलेकर, पारंपरिक मत्स्य शेतकरी, चिखले गाव