शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
2
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
3
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
4
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
5
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
6
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
7
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
8
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
9
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
10
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
11
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
12
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
13
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
14
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
15
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
16
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
17
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
18
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
19
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
20
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला मृत्यूच्या दारात नेण्यात मधुमेह, उच्च रक्तदाब आजार सर्वात पुढे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 00:44 IST

आता ‘डेथ ऑडिट’ होणार, डाॅक्टर जबाबदार ठरणार!

जगदीश भोवड

पालघर : जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढण्याबरोबरच मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. त्यात प्रामुख्याने मधुमेह, उच्च रक्तदाब असणाऱ्यांना याचा जास्त त्रास होत असल्याचेही सांगितले जात आहे. दरम्यान, जिल्ह्यात होणाऱ्या मृत्यूंचे परीक्षण (डेथ ऑडिट) होणार असून ग्रामीण भागातील डॉक्टर्सकडून कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांवर योग्य उपचार न केल्याने त्यांच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी खालावून त्यांचा मृत्यू होत असल्याने त्याला प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरीत्या खाजगी डॉक्टरांना जबाबदार धरून कारवाईचे आदेशवजा पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहे.

पालघर जिल्ह्यात आजवर कोरोनामुळे बाधित झालेल्यांची संख्या ८९ हजारांवर गेली असून मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या दीड हजारच्या पुढे गेली आहे. कोरोना काळात पहिल्या लाटेत मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या जास्त नव्हती, मात्र आता दुसऱ्या लाटेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यात इतर आजार असलेल्यांची प्रतिकार शक्ती कमी असल्याने ते कोरोनाचे बळी ठरत असल्याचेही दिसून आले आहे. 

या पार्श्वभूमीवर पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे तसेच पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या स्वाक्षरीने नुकतेच खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना एक पत्र जारी करण्यात आलेले असून, या पत्रात कोरोना रुग्णांची योग्य तपासणी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. हे पत्र तालुका प्रशासनाच्या माध्यमातून सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांपर्यंत पोहचविण्यात आले आहे.कोरोनाची लक्षणे असलेले रुग्ण खाजगी डॉक्टरांकडे उपचारासाठी आल्यानंतर त्यांची आवश्यक तपासणी न करता काही डॉक्टर ताप, सर्दी, खोकला आजारावर उपचार करीत असल्याने त्या रुग्णांच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी खालावत जाते. पुढे त्या रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो. त्यामुळे रुग्णांच्या मृत्यू होण्याच्या घटना अलीकडच्या काळात वाढू लागल्या आहेत. ही बाब जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर चाचणी न करता उपचार करणाऱ्या खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना अशा मृत्यूस जबाबदार धरले जाणार आहे. दरम्यान, इतर आजारांमुळे जिल्ह्यात किती रुग्णांचा मृत्यू झाला त्याची निश्चित आकडेवारी मिळू शकली नाही.

प्राणवायू पातळी खालावल्यास रुग्णालयात दाखल व्हावे

ताप, सर्दी, खोकला व इतर करोनाची लक्षणे असलेले रुग्ण खाजगी डॉक्टरकडे आल्यास त्यांना आरोग्य केंद्रांमधून अँटिजन टेस्ट करण्यास सांगावे. या चाचणीचे नकारात्मक निकाल आल्यास त्यांना आरटीपीसीआर चाचणी करण्याच्या सूचना देण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. चाचणी अहवालात आजाराचा संसर्ग झाल्याचे निदान झाल्यास जवळच्या कोरोना काळजी केंद्रामध्ये दाखल करण्याची वैद्यकीय व्यावसायिकांनी रुग्णाला सूचना द्यावी, तसेच गृह विलगीकरणात राहत असणाऱ्या रुग्णांनी आपल्या शरीरातील प्राणवायूची पातळी नियमित तपासावी. प्राणवायू पातळी खालावल्यास त्यांनी रुग्णालयात दाखल व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याVasai Virarवसई विरारpalgharपालघर