शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

रेतीवाला नवरा फेम, धर्मेंद्र तरे काळाच्या पडद्याआड  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2018 17:17 IST

 'रेतीवाला नवरा पाहिजे', या लोकप्रिय कोळी गीताच्या अफाट लोकप्रियतेमुळे घराघरात पोहचलेल्या पालघर तालुक्यातील सातपाटी गावाचे सुपुत्र धर्मेंद्र तरे यांचे अल्पशा आजाराने, 57 व्या वर्षी मंगळवारी दि.24 जुलै रोजी निधन झाले.

पालघर -  'रेतीवाला नवरा पाहिजे', या लोकप्रिय  कोळी गीताच्या अल्बम आणि गाण्याने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले. या गाण्यातील कलाकारांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. या अफाट लोकप्रियतेमुळे घराघरात पोहचलेल्या पालघर तालुक्यातील सातपाटी गावाचे सुपुत्र धर्मेंद्र तरे यांचे अल्पशा आजाराने, 57 व्या वर्षी मंगळवारी दि.24 जुलै रोजी निधन झाले. ही बातमी समजल्यावर त्यांच्या चाहत्यां मध्ये दुःखाची लाट पसरली असून, त्यांच्या अशा जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

  पालघरच्या सातपाटी येथील रहिवासी असलेल्या धर्मेंद्र च्या घरचा मूळ व्यवसाय मासेमारी.मात्र शाळेत आणि घरात ही त्याला संगीता व्यतिरिक्त काही दुसरे सुचायचे नाही.ही संगीतातील भूक शमविण्याच्या प्रयत्नात त्याने प्रथम आपला सहकारी विदेश म्हात्रे ह्यांला सोबत घेऊन "नवरा निघाला सातपाटीचा,त्यानंतर गोरी गोरी पान सातपाटीची शान ह्या दोन कॅसेट काढल्या. त्या बऱ्यापैकी चालल्या असल्यातरी त्याचे समाधान झाले नाही. वेसावे गावातुन अनेक कोळी गाणी गाजत असल्याने आपल्या गावाचे नाव ही गाजायला पाहिजे म्हणून तो नेहमीच अस्वस्थ रहात असे. मध्यंतरीच्या काळात डान्स क्लास,सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, गणपती,नवरात्रोत्सवात चलचित्र डेकोरेशन ह्या व्यवसायात तो व्यग्र असताना त्याने लिहिलेले आणि संगीत दिलेले "रेतीवाला नवरा पाहिजे" हे गाणे जवळपास सर्वच लग्नमंडपात वाजू लागले.आणि सातपाटीचा हा गीतकार प्रसिद्ध झाला. सुप्रसिद्ध नट विक्रम गोखले ह्यांच्या भूमिकेतून त्याला नित्यानंद बाबा च्या जीवनावर सिनेमा काढायचे त्याचे स्वप्न त्याच्या अकाली मृत्यूमुळे अपूर्ण राहिले. कट्टर शिवसैनिक म्हणून जिल्ह्यात परिचित असलेल्या धर्मेंद्र यांनी निवडणुकीत पक्षाच्या प्रचारासाठी गाणीही लिहिली होती.त्याच्या मृत्यूने तो शरीराने ह्या जगातून निघून गेला असला तरी रेतीवाला नवरा पाहिजे ह्या गाण्या द्वारे तो लोकांच्या मनात घर करून राहिल्याचे त्याचे शिक्षक टी एम नाईक सरांनी लोकमत ला सांगितले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारmarathiमराठी