शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

धरणांच्या गावांची पाण्यासाठी वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 01:48 IST

मुंबईत पाण्याची उधळपट्टी होत असतांना या महानगरीला पाणी पुरवठा करणारा पालघर

विक्रमगड : मुंबईत पाण्याची उधळपट्टी होत असतांना या महानगरीला पाणी पुरवठा करणारा पालघर जिल्हयाचा ग्रामीण भाग व याचा ग्रामीण तालुक्यातील स्थानिक मात्र घोटभर पाण्यासाठी असुसला आहेत. मात्र या कडे कुणालाही लक्ष देण्यास वेळ नाही धामणी व कवडास धरण विक्रमगड तालुक्यात आहेत मात्र, त्याचा एक थेंबही येथील स्थानिकांना मिळत नाही. तलवाडा, धामणी, कवडास व आता देहेर्जे प्रकल्प साकारत आहे. मात्र, या बुडीत क्षेत्र असलेल्या सावा व धरण परीसरातील लोकांना पाण्यासाठी आजही वणवण करावी लागत आहे.येथील नागरीकांना मैलंमैल पाण्यासाठी भटकावे लागत आहे. अनेक वेळा स्थानिकांना या धरणांचे पाणी मिळावे या करीता सत्ता नसतांनाही दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांनी आंदोलने केली होती. पाणी परिषदा घेतल्या मात्र, आत भाजपाची सत्ता असतांनाही आदिवासी विकास मंत्रीपद असुनही परिस्थिती बदललेली नाही. त्यामुळे त्यावेळी केलेली आंदोलने फार्स होती का असा प्रश्न पडत आहे. दरम्यान, या लोकांना न्याय मिळावा या करीता निलेश सांबरे यांनी कोकण विकास मंचांच्या नेतृत्वाखाली येत्या ५ एप्रिल रोजी मोर्चाचे आयोजन केले आहे़विक्रमगड तालुक्यातील आदिवासी व शेतकरी वर्गाच्या सर्र्वांगीन विकासासाठी आदिवासी उपाययोजनेतून धामणी व कवडास ही धरणे उभारण्यात आली आहेत. ती फक्त विक्रमगड तालुक्यात आहेत. मात्र त्याची पाणी प्रत्यक्षात शेतीसाठी कमी व औद्योगिक क्षेत्रसाठी राखिव ठेवून वसई-विरार या भागांना पुरविले जात आहे तसेच, मुंबई व इतर शहरी भागासाठी आरक्षित करुन शेतकऱ्यांच्या तोडाला पाने पूसली आहेत. हे पाणी पळविण्याचा हा घाटच आहे़ सूर्या प्रकल्पातील धामणी धरणाचे पाणी शेतीला पुरविण्यासाठी शेवटच्या टोकापर्यत पाणी उपलब्ध करुन न देता अन्यत्र वळवून येथील स्थानिक आदिवासींवर अन्याय केला जात असल्याचा आरोप होत आहे़ तर नुकतेच पालघर येथे सुर्या पाणी बचत संघर्ष समितीतर्फे बेमुदत उपाषण देखील करण्यांत आले होते़