शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

निराधार योजनेतील लाभार्थी अनुदानापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 01:06 IST

चार महिन्यांपासूनची परिस्थिती : दररोज मारतात बँकेत हेलपाटे

डहाणू : गरिबी हटवण्यासाठी, तळागाळातील गरीब लोकांसाठी असलेल्या योजनांची जाहिरातबाजी केली जात असली तरी लाभार्थी मात्र प्रत्यक्ष लाभापासून वंचित आहेत.डहाणू तालुक्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी निराधार, वृद्धापकाळ, श्रावणबाळ, तसेच राष्ट्रीय कुटुंब सहाय्य योजने अंतर्गत, वृद्ध, अपंग, दिव्यांग, अविवाहित महिला, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, कुष्ठरोगी, निराधार, अशा दारिद्र रेषेखालील १२ हजार लाभार्थ्यांचे अनुदान चार महिन्यांपासून त्यांच्या बँक खात्यावर जमा झालेले नाही. यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.समाजातील दीनदुबळे, मागासवर्गीय, विमुक्त आणि भटक्या जाती, जमाती, इतर मागासवर्गीय, तसेच वृद्ध, अपंग, दिव्यांग, अविवाहित, क्षयरोगी, घटस्फोटीत, परित्यक्ता, कुष्ठरोगी, एड्सग्रस्त व्यक्तींना केंद्र आणि राज्य सरकारकडून दरमहा चारशे, आणि सहाशे रुपये अर्थसहाय्य दिले जात होते. सरकारने गाजावाजा करून त्यात वाढ करत ते सरसकट १००० रुपये केले. मात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर जून महिन्यापासून अनुदानच जमा झाले नाही.लाभार्थ्यांच्या म्हणण्याप्रमाणे, काही लाभार्थ्यांना अर्थसहाय्य मंजूर होऊन दोन दोन वर्षे झाली, तरीही नियोजनाच्या आणि कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे, लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर अनुदान वेळेवर जमा केले गेले नाही.डहाणूच्या आदिवासी भागातील शेवटच्या टोकावर असलेल्या दिवशी, दाभाडी, चळणी, सुखड आंबा, चिंचले, निंबापुर, गांगोडी, वांगर्जे, शेनसरी, कोसेसरी, मोडगाव, वंकास, महालक्ष्मी, तर किनारपट्टी भागातील चिंचणी, वाणगाव, वाढवण, वरोर, धाकटी डहाणू, अशा लांबवरच्या गावांतील गरजवंत लाभार्थी रोज बँकेच्या दारात येऊन हेलपाटे मारीत आहेत.निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे जून, जुलै महिन्याचे अनुदान बँक खात्यात भरणा करण्याचे काम सुरू असून, आॅगस्ट, सप्टेंबर महिन्याच्या अनुदानाची मागणी करण्यात आली आहे.- राहुल सारंग, तहसीलदार, डहाणू