शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

डेमूला प्रवाशांचा भावपूर्ण निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 23:52 IST

पालघर : मागील दहा वर्षांपासून उपनगरीय प्रवाशांना अविरत सेवा देणारी बोईसर-दिवा डीएमयू गाडी सर्वांपासून बंद करण्यात येत असून प्रवाश्यांना ...

पालघर : मागील दहा वर्षांपासून उपनगरीय प्रवाशांना अविरत सेवा देणारी बोईसर-दिवा डीएमयू गाडी सर्वांपासून बंद करण्यात येत असून प्रवाश्यांना आनंददायी व सुखरूप सेवा देणाऱ्या या गाडीला प्रवाशांनी माठ्या जड अंत:करणाने निरोप दिला. या गाडी ऐवजी आता मेमु गाडी धावणार आहे.

२००८ पासून सेवा देत असलेली बोइसर दिवा डीएमयू ७१००१ च्या जागी सोमवारपासून मेमू गाडी धावणार आहे. सलग १० वर्षे बोईसर ते दिवा या दरम्यान प्रवाशांना आरामदायी आणि सुखरूप आपल्या वेळेवर पोहचवणाऱ्या लाल परी उद्या आपल्यातून विलुप्त होणार आहे. इतके वर्ष चांगली सेवा देणारी ही परी आपल्या स्मरणात सदैव राहावी म्हणून आज डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थे तर्फेबोइसर ते वैतरणापर्यंत विविध स्थानकात हार, फुलांनी सजवून गुच्छ देवून शेवटचा निरोप देण्यात आला.

तत्कालीन खासदार दामू शिंगडा यांच्या शुभहस्ते २००८ मध्ये शुभारंभ करण्यात आलेली ही सेवा डिझेल मल्टिपल युनिट (डीएमयू) चा रेक वापरुन सुरु होती. सुरुवातीला मध्ये इंजिन असलेली आणि दोन्ही बाजूला चार चार डब्बे असलेली गाडी धावत असे.

१२ आँक्टोबर २०१८ रोजी मध्य रेल्वे च्या कोचिंग डिपार्टमेंटने काढलेल्या नोटिफीकेशन प्रमाणे १५ आॅक्टोबर २०१८ पासून ही गाडी मेमु (मेनलाईन इलेक्ट्रिकल मिल्टपल युनिट) मध्ये रुपांतरीत करण्यात येणार आहे.

टॅग्स :railwayरेल्वेVasai Virarवसई विरार