शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

सूर्याच्या पाण्यासाठी आंदोलकांचे उपोषणास्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 03:04 IST

सूर्या प्रकल्पाचे ८० टक्क्याहून अधिक पाणी वसई-विरार, मिरा-भार्इंदर ला वळविण्यात आल्याने आणि पिंजाळचे पाणी मुंबईला नेण्यात येणार असल्याने भविष्यात सिंचनक्षेत्रा सह लोकांना हक्काच्या पाण्यापासून वंचित रहावे लागणार आहे.

पालघर: सूर्या प्रकल्पाचे ८० टक्क्याहून अधिक पाणी वसई-विरार, मिरा-भार्इंदर ला वळविण्यात आल्याने आणि पिंजाळचे पाणी मुंबईला नेण्यात येणार असल्याने भविष्यात सिंचनक्षेत्रा सह लोकांना हक्काच्या पाण्यापासून वंचित रहावे लागणार आहे. मोर्चे, बंद सारख्या लोकशाहीच्या मार्गाने आंदोलने करूनही सरकारला जाग येत नसल्याच्या निषेधार्थ सूर्या पाणी बचाव संघर्ष समितीच्यावतीने सोमवारपासून पालघरच्या हुतात्मा स्तंभाजवळ बेमुदत उपोषण आंदोलन करण्यात येणार आहे.सूर्या प्रकल्पांतर्गत धामणी व कवडास ह्या सिंचनासाठी उभारण्यात आलेल्या धरणाच्या पाण्याचा उपयोग जिल्ह्यातील पालघर, डहाणू व विक्र मगड ह्या तालुक्यातील १४ हजार ६९६ हेक्टर क्षेत्रातील जमिनीच्या सिंचनासाठी व गावागावातील, पाड्यापाड्यातील घराना पिण्यासाठी मिळणे अपेक्षित असतांना एमएमआरडीएला हाताशी धरून राजकीय मताच्या जोरावर ते वसई-विरार व मीरा-भार्इंदर कडे वळविण्यात काही लोकप्रतिनिधी यशस्वी झाले होते. भविष्यात त्याचा मोठा फटका तिन्ही तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांवर होणार असून लोकांच्या घरात पुरेसे पाणीच पोचणार नसल्याची परिस्थिती उद्भवणार आहे. तसेच पिंजाळ शेती सिंचन प्रकल्प गुंडाळून हे सर्व पाणी मुंबईला वळविण्यात येणार आहे.शासन सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करील असे आमचे मुख्यमंत्री व्यासपीठा वरून सांगत असताना मात्र सूर्या, पिंजाळ प्रकल्पाचे सिंचनासाठी, पिण्यासाठी आरिक्षत ठेवलेले पाणी बिगर सिंचन क्षेत्राकडे वळविण्यास त्यांचे सरकारच पाठिंबा देत असल्याचे दिसून येत आहे. ह्यामुळे पालघर मधील २६ गावे नळपाणीपुरावठा योजनेच्या पाणीपुरावठ्यावर मोठा परिणाम होणार आहे.आपले हक्काचे पाणी दुसरीकडे वळविण्यात येत असल्याने सर्व पक्षीय पाठिंबा असलेल्या सूर्या पाणी बचाव संघर्ष समितीने आयोजित केलेल्या १८ सप्टेंबर २०१७ रोजी आयोजित पालघर बंद ला जिल्ह्यातून उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला होता. तरीही जिल्हावासीयांच्या भावनांचा कुठलाही विचार हे सरकार करीत नसल्याने आता ह्या सारकरचया दुटप्पी धोरणा विरोधात आण िस्थानिकांच्या पाण्यासाठी उद्यापासून निकराची लढाई लढण्यात येणार असल्याची माहिती समन्वयक रमाकांत पाटील ह्यांनी दिली.>अनेक योजना ठप्प होणारपालघर मधील २६ गावे नळपाणीपुरावठा योजनेच्या पाणीपुरावठ्यावर मोठा परिणाम होणार आहे.पिंजाळ शेती सिंचन प्रकल्प गुंडाळून हे सर्व पाणी मुंबईला वळविण्यात येणार आहे.