शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

सूर्याच्या पाण्यासाठी आंदोलकांचे उपोषणास्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 03:04 IST

सूर्या प्रकल्पाचे ८० टक्क्याहून अधिक पाणी वसई-विरार, मिरा-भार्इंदर ला वळविण्यात आल्याने आणि पिंजाळचे पाणी मुंबईला नेण्यात येणार असल्याने भविष्यात सिंचनक्षेत्रा सह लोकांना हक्काच्या पाण्यापासून वंचित रहावे लागणार आहे.

पालघर: सूर्या प्रकल्पाचे ८० टक्क्याहून अधिक पाणी वसई-विरार, मिरा-भार्इंदर ला वळविण्यात आल्याने आणि पिंजाळचे पाणी मुंबईला नेण्यात येणार असल्याने भविष्यात सिंचनक्षेत्रा सह लोकांना हक्काच्या पाण्यापासून वंचित रहावे लागणार आहे. मोर्चे, बंद सारख्या लोकशाहीच्या मार्गाने आंदोलने करूनही सरकारला जाग येत नसल्याच्या निषेधार्थ सूर्या पाणी बचाव संघर्ष समितीच्यावतीने सोमवारपासून पालघरच्या हुतात्मा स्तंभाजवळ बेमुदत उपोषण आंदोलन करण्यात येणार आहे.सूर्या प्रकल्पांतर्गत धामणी व कवडास ह्या सिंचनासाठी उभारण्यात आलेल्या धरणाच्या पाण्याचा उपयोग जिल्ह्यातील पालघर, डहाणू व विक्र मगड ह्या तालुक्यातील १४ हजार ६९६ हेक्टर क्षेत्रातील जमिनीच्या सिंचनासाठी व गावागावातील, पाड्यापाड्यातील घराना पिण्यासाठी मिळणे अपेक्षित असतांना एमएमआरडीएला हाताशी धरून राजकीय मताच्या जोरावर ते वसई-विरार व मीरा-भार्इंदर कडे वळविण्यात काही लोकप्रतिनिधी यशस्वी झाले होते. भविष्यात त्याचा मोठा फटका तिन्ही तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांवर होणार असून लोकांच्या घरात पुरेसे पाणीच पोचणार नसल्याची परिस्थिती उद्भवणार आहे. तसेच पिंजाळ शेती सिंचन प्रकल्प गुंडाळून हे सर्व पाणी मुंबईला वळविण्यात येणार आहे.शासन सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करील असे आमचे मुख्यमंत्री व्यासपीठा वरून सांगत असताना मात्र सूर्या, पिंजाळ प्रकल्पाचे सिंचनासाठी, पिण्यासाठी आरिक्षत ठेवलेले पाणी बिगर सिंचन क्षेत्राकडे वळविण्यास त्यांचे सरकारच पाठिंबा देत असल्याचे दिसून येत आहे. ह्यामुळे पालघर मधील २६ गावे नळपाणीपुरावठा योजनेच्या पाणीपुरावठ्यावर मोठा परिणाम होणार आहे.आपले हक्काचे पाणी दुसरीकडे वळविण्यात येत असल्याने सर्व पक्षीय पाठिंबा असलेल्या सूर्या पाणी बचाव संघर्ष समितीने आयोजित केलेल्या १८ सप्टेंबर २०१७ रोजी आयोजित पालघर बंद ला जिल्ह्यातून उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला होता. तरीही जिल्हावासीयांच्या भावनांचा कुठलाही विचार हे सरकार करीत नसल्याने आता ह्या सारकरचया दुटप्पी धोरणा विरोधात आण िस्थानिकांच्या पाण्यासाठी उद्यापासून निकराची लढाई लढण्यात येणार असल्याची माहिती समन्वयक रमाकांत पाटील ह्यांनी दिली.>अनेक योजना ठप्प होणारपालघर मधील २६ गावे नळपाणीपुरावठा योजनेच्या पाणीपुरावठ्यावर मोठा परिणाम होणार आहे.पिंजाळ शेती सिंचन प्रकल्प गुंडाळून हे सर्व पाणी मुंबईला वळविण्यात येणार आहे.