शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

मागण्यांसाठी महापालिकेवर आदिवासींची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 06:38 IST

विविध मागण्यांसाठी आदिवासी एकता परिषदेने वसई विरार महापालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा नेला होता. प्रधानमंत्री आवास योजना आणि झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला यावेळी जोरदार विरोध करण्यात आला.

जव्हार : विविध मागण्यांसाठी आदिवासी एकता परिषदेने वसई विरार महापालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा नेला होता. प्रधानमंत्री आवास योजना आणि झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला यावेळी जोरदार विरोध करण्यात आला. या योजनांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.महापालिका हद्दीतील आदिवासी पाड्यांचा झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये समावेश करू नये. तसेच पाड्यांसाठी प्रधानमंत्री आवास योजना राबवण्यात येई नये. त्याऐवजी ते रहात असलेल्या ठिकाणी त्यांचा विकास करण्यात यावा, अशी मागणी एकता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष काळूराम धोदडे यांनी यावेळी बोलताना केली. अन्यथा आदिवासी तीव्र आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला.पाड्यांची महापालिकेच्या नकाशावर नोंद करण्यात यावी. पाड्यांवर कुठल्याही प्रकारचे आरक्षण टाकण्यात येऊ नये. सरकारी जागेत तसेच मालकी जागेत झोपड्या बांधून रहात असलेल्या आदिवासींच्या घरांना घरपट्टया लावण्यात याव्यात. आदिवासींना पक्के घर बांधण्यासाठी मंजुरीची अटक रद्द करण्यात यावी. आदिवासींसाठी घरकुल योजना राबवण्यात यावी. जुन्या घरांच्या दुरुस्तीसाठी एक लाख रुपयांची मदत देण्यात यावी. महापालिकेच्या आस्थापनेवर आदिवासींना सामावून घेण्यात यावे. एमएमआरडीएच्या विकास आराखड्यातून आदिवासी पाडे वगळण्यात यावेत, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.एकता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजू पांढरा, दत्ता कळभाट, शशी सोनावणे, जिल्हाध्यक्ष दत्ता सांबरे, सचिव प्रकाश जाधव, उपाध्यक्षा वंदना जाधव यांच्या नेतृ्त्वाखाली निघालेल्या मोर्चात शेकडो आदिवासी सहभागी झाले होते.विकासाच्या नावाखाली आदिवासींना हद्दपार करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजना आणि पंतप्रधान आवास योजना राबवण्याचे कारस्थान आहे. त्याचबरोबर रस्ता रुंदीकरण, बुलेट ट्रेन, मुंबई-बडोदा एक्सप्रेस हायवे, मेट्रो ट्रेन, सागरी महामार्ग, रिंग रुट, स्मार्ट सिटी यामुळे आदिवासी विस्थापित होणार आहेत,असा आरोप प्रकाश जाधव यांनी यावेळी बोलताना केला. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार