शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

मागण्यांसाठी महापालिकेवर आदिवासींची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 06:38 IST

विविध मागण्यांसाठी आदिवासी एकता परिषदेने वसई विरार महापालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा नेला होता. प्रधानमंत्री आवास योजना आणि झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला यावेळी जोरदार विरोध करण्यात आला.

जव्हार : विविध मागण्यांसाठी आदिवासी एकता परिषदेने वसई विरार महापालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा नेला होता. प्रधानमंत्री आवास योजना आणि झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला यावेळी जोरदार विरोध करण्यात आला. या योजनांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.महापालिका हद्दीतील आदिवासी पाड्यांचा झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये समावेश करू नये. तसेच पाड्यांसाठी प्रधानमंत्री आवास योजना राबवण्यात येई नये. त्याऐवजी ते रहात असलेल्या ठिकाणी त्यांचा विकास करण्यात यावा, अशी मागणी एकता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष काळूराम धोदडे यांनी यावेळी बोलताना केली. अन्यथा आदिवासी तीव्र आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला.पाड्यांची महापालिकेच्या नकाशावर नोंद करण्यात यावी. पाड्यांवर कुठल्याही प्रकारचे आरक्षण टाकण्यात येऊ नये. सरकारी जागेत तसेच मालकी जागेत झोपड्या बांधून रहात असलेल्या आदिवासींच्या घरांना घरपट्टया लावण्यात याव्यात. आदिवासींना पक्के घर बांधण्यासाठी मंजुरीची अटक रद्द करण्यात यावी. आदिवासींसाठी घरकुल योजना राबवण्यात यावी. जुन्या घरांच्या दुरुस्तीसाठी एक लाख रुपयांची मदत देण्यात यावी. महापालिकेच्या आस्थापनेवर आदिवासींना सामावून घेण्यात यावे. एमएमआरडीएच्या विकास आराखड्यातून आदिवासी पाडे वगळण्यात यावेत, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.एकता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजू पांढरा, दत्ता कळभाट, शशी सोनावणे, जिल्हाध्यक्ष दत्ता सांबरे, सचिव प्रकाश जाधव, उपाध्यक्षा वंदना जाधव यांच्या नेतृ्त्वाखाली निघालेल्या मोर्चात शेकडो आदिवासी सहभागी झाले होते.विकासाच्या नावाखाली आदिवासींना हद्दपार करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजना आणि पंतप्रधान आवास योजना राबवण्याचे कारस्थान आहे. त्याचबरोबर रस्ता रुंदीकरण, बुलेट ट्रेन, मुंबई-बडोदा एक्सप्रेस हायवे, मेट्रो ट्रेन, सागरी महामार्ग, रिंग रुट, स्मार्ट सिटी यामुळे आदिवासी विस्थापित होणार आहेत,असा आरोप प्रकाश जाधव यांनी यावेळी बोलताना केला. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार