शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

देहेर्जी प्रकल्प विस्थापितांचे भिजत घोंगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 23:44 IST

परिसरातील गाव-पाड्यांना दवर्षीप्रमाणे उन्हाळयाच्या सुरुवातीपासूनच मार्च, एप्रिल, मे महिन्यात सर्वत्र पाणीटंचाईची झळ बसत असते मात्र या पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी विक्रमगड जवळच

राहुल वाडेकरविक्रमगड : परिसरातील गाव-पाड्यांना दवर्षीप्रमाणे उन्हाळयाच्या सुरुवातीपासूनच मार्च, एप्रिल, मे महिन्यात सर्वत्र पाणीटंचाईची झळ बसत असते मात्र या पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी विक्रमगड जवळच साखरे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात देहरजी मध्यम प्रकल्प उभारण्यात येत आहे़ या प्रकल्पामुळे आदिवासीचा विकास होण्यास मदत होणार आहे़ या प्रकल्पामुळे मोठ मोठे उदयोगधंदे या ठिकाणी येऊन येथील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी त्यामुळे उपलब्ध होतील़ मात्र, मौजे साखरे व खुडेद बुडीत क्षेत्रात ५०० घरे येत असल्याने प्रकल्पाच्या पुनर्वसन अभावी ती मोडकळीस आली आहेत़ अधिसुचना घोषीत केल्याने येथील गरीब आदिवासींना बांधकाम करणे शक्य होत नाही़ मात्र या प्रल्पाचे कामास मध्ये बरीच वर्षे गेल्याने शेतकºयांनी नविन घरे बांधलेली आहेत़ त्याचे क्षेत्र देखील वाढलेले आहे़ त्यामुळे जुन्या सर्व्हे रद्द करुन नविन सर्व्हे करुन त्याप्रमाणे विस्थापितांचे पुर्नवसन करावे अशी मागणी आहे.परिसरातील गाव-पाड्यांना दवर्षीप्रमाणे उन्हाळयाच्या सुरुवातीपासूनच मार्च, एप्रिल, मे महिन्यात सर्वत्र पाणीटंचाईची झळ बसत असते मात्र या पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी विक्रमगड जवळच साखरे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात देहरजी मध्यम प्रकल्प उभारण्यात येत आहे़ या प्रकल्पाचा फायदा विक्रमगड व आसपासच्या परिसरातील गाव-खेडयापाडयांसही २२ गावांना होणार आहे़ मात्र या प्रकल्पाला निधीची तरतुद नसल्याने व वारंवार इतर अनेक अडचणी उद्भवत असल्याने प्रकल्पाचे काम लालफितीत अडकले होते़सध्या या प्रकल्पास निधीची तरतुद होत असल्याची माहिती हाती असून प्रकल्पाचे काम लवकच सुरु करण्यात येणार आहे़. मात्र, हा प्रकल्प गेल्या अनेक वर्षापासुन (२००५) पासून रखडेला असल्याने ज्यावेळेस याचा सर्वे करण्यात आला व त्यामध्ये जे बाधित शेतकरी आहेत़ त्याची यादी तयार झाली आहे़ त्याकालीवधीनंतर विस्थापितांच्या जमीनीमध्ये अनेक बदल झालेले आहेत़ तर काहींनी नविन घरे बांधलेली आहे़ त्याचे क्षेत्र वाढलेले आहे़ त्यामुळे यामध्ये जो काही बदल झालेलो़त्याचा आहे. त्याचा पुुन्हा सर्वे करुन यामध्ये विस्थापित होत असलेल्या बांधीत शेतकºयांना योग्य मोबदला व त्यांचे पुनर्वस व्हावे अशी मागणी बाधीत शेतकºयांनी केली आहे़ अन्यथा प्रकल्पाचे काम सुरु करु देणार नसल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.ह्या प्रकल्पाचे काम वर्ष २००५ पासून हाती घेण्यात आले आहे़ परंतु या प्रकल्पामध्ये शतकºयां समवेत वन विभागाची जमीनही संपादीत होत असल्याने प्रथम त्याचंी मान्यता मिळणे गरजेचे होते. त्यानंतर हिरवा कंदील मिळाल्यानंतर निधीची कमतरता व अनेक अडचणी येत असल्याने हया प्रकल्पाचे काम अध्यापही मार्गी लागण्यास विलंब झालेला आहे़ देहरजे मध्यम प्रकल्प जव्हार राज्य मार्गावर विक्रमगड गावापासुन आठ की़ मी अंतरावर असून, जांभा गावापासुन १़ ५० कि़ मी़ अंतरावर देहरजी नदीवर आहे़ हा प्रकल्प ठाणे व पालघर जिल्हयातील अतिदुर्गम व डोंगराळ आदिवासी भागात आहे़ या प्रकल्पाकरीता लागणाºया एकुण जमीनीपैकी ५३१़ १८६ हे वनजमीन व २७५़ ७४८ हे खाजगी जमीन अषी एकुण ८०६़ ९३४ हेक्टर जमीन आवश्यक आहे़या प्रकल्पास कोकण पाटबंधारे विकास महामंडळाने १५८२५़ १४ लक्ष इतक्या रक्कमेस प्रशासकीय मान्यता दिली आहे़ या प्रकल्पाची एकुण पाणी साठवण क्षमता ९५.६० द़ ल़ घ़ मी़ ८३़ ३८ टी़ एम़ सी़ असून पिण्यासाठी १५ टक्के प्रमाणे १३़९८६ द़ ल़ घ़ मी़ व औद्योगीक वापरासाठी १० टक्केप्रमाणे ९़ ३२४ द़ ल़ घ़ मी़ पाण्याची तरतुद करण्यांत आली आहे़ धरणाची महत्तम उंची ६६़८२ मी़ एवढी असून एकूण लांबी २़२५४ मी़ आहे़ डाव्या कालव्याची लांबी चार कि़ मी़ असून ३८१ हेक्टर एवढे क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे़ तसेच उजव्या कालव्याची लांबी २९ कि़ मी़ असून ३़ ८४९ हेक्टर एवढे क्षेत्र सिंचनाखाली येते एकुण ४़ २२० हेक्टर जमीनीचे क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. विक्रमगड तालुक्यातील २२ गावांना सिंचनासाठी व पिण्यासाठी यातील पाण्याचा लाभ होणार आहेदेहरजे मध्यम प्रकल्पाचे धरण, कालवा व आनुशंगिक कामांच्या निविदेता मंजुरी देण्यात आलेली असुन, संबंधीत कामे एऩ पी़ व्ही़ आऱ प्रोजेक्ट लि़ पुणे यांना देण्यात आले आहे़ या कामाच्या निविदेप्रमाणे कामाचा त्यावेळेचा अपेक्षित खर्च रक्कम रुपये १०३़ ३२ कोटी एवढा आहे.भूसंपादनया प्रकल्पाच्या खाजगी भुसंपादनाचे सविस्तर सर्वेक्षण,बुडीत क्षेत्रासाठी जांभे-६़२२३,साखरे-२४़ ६३८, खुडेद-१८९़ ६०९ एकुण-२२०़ ४७ हेक्टर याप्रमाणे बुडीत क्षेत्रासाइी अंदाजे २२०़ ४७ हेक्टर व कालव्यासाठी निष्चिती करण्यासाठी संयुक्त मोजणीचे काम सुरु करण्यांत आले होते़पुनर्वसनमौजे साखरे गावाअंतर्गत असलेल्या हनुमान पाडयामधील ११० कुटुंबे व ९० घरे तसेच पवारपाडयातील ११ कुटुंबे व १० घरे इत्यादी त्याचप्रमाणे खुडेद गावाच्या अंतर्गत कुंडाचा पाडयामधील १४३ कुटुंबे व १०३ घरे तसेच महालपाडयामधील ८ कुटुंबे व ७ घरे यांचे पुनर्वसन करावे लगणार आहे़त्याबाबतचा प्रस्ताव ठाणे जिल्हाधिकारी (पुनर्वसन) यांच्याकडे सादर केला आहे़वनजमीनप्रकल्पाकरीता लागणा-या वनजमीनीसाठी(बुडित क्षेत्र व कालवा) ५३१़ १८६ हेक्टर आवश्यक असून सदर जमीन बीड जिल्हयात उपलब्ध करुन घेण्यात आली आहे़ त्यानंतर सध्यस्थितीत फॉरेस्ट अ‍ॅडमिनिस्ट्र्ेटिव्ह कमिटीकडुन प्रस्ताव मंजुर होऊन केंद्रीय वनमंत्री यांच्याकडे निर्णयासाठी प्रलेबित आहे़हा प्रकल्प सिंचनासाठी असल्यास तालुक्यातील ४़ २३० हेक्टर ही जमीन ओली ताखाली येणार आहे़ येथील ग्रामस्थ दुबार भातशेती,भाजीपाला लागवड फलोत्पादन इत्यादी लागवड करुन आपल्या कुटुंबाचा उदर निर्वाह करु शकतील जेणेकरुन येथील स्थानिक आदिवासी ध्ांदयासाठी कामासाठी परगावी स्थंलांतरीत होणार नाहीत़ तसेच विक्रमगड व त्याअंतर्गत २२ गाव -पाडयांचा पाण्याचा सिंचनाचा, विकासाचा प्रश्न हा प्रकल्प मार्गी लागल्यावर सुटणार आहे़ करीता शासनाने तसेच येथील स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार, खासदार व मंत्राीमहोदयांनी लक्ष घालून या प्रकल्पासाठी येणाºया अडचणी सोडवून हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी येथील जनतेकडून होत आहे़