शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दीपोत्सवातून किल्ले संवर्धनाचा ध्यास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 01:17 IST

शिक्षक, ग्रामस्थांचा संकल्प, पर्यावरणाचे केले जतन

डहाणू/बोर्डी : फटाकेमुक्त दिवाळी आणि त्याला किल्ले उभारणीची जोड देऊन पर्यावरण तसेच गडकिल्ले संवर्धनाकरिता जनजागृती मोहीम जिल्हा परिषदेच्या शंकरपाडा शाळेने राबविला. हा प्रकल्प नव्हे तर उत्सवाच्या माध्यमातून पर्यावरणपूरक संकल्प असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली.

सध्या या उत्सवात हौसेकरिता फटाके न फोडता, यामाध्यमातून आर्थिक सधनतेचे प्रदर्शन आणि चंगळवाद फोफावत आहे. त्यामुळेच फटाकेमुक्त दिवाळी आणि शिववैभव किल्ले संवर्धनाचा संकल्प विद्यार्थी व शिक्षकांनी राबवला. त्यानुसार फटाक्यांना फाटा देत, ‘नको फटाक्यांचा अपघात किल्ले बांधू अंगणात’ ही संकल्पना घेऊन छत्रपती शिवरायांचे गडकिल्ले यांचे संवर्धन करणे काळची गरज आहे हा संदेश पोहचवण्यासाठी पर्यावरणस्नेही दिवाळी साजरी करण्याकसाठी जनजागृती मोहीम शाळेने हाती घेतली आहे.

शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देणारे सुंदर गडकिल्ले उभारायचे अशी संकल्पना शिक्षक विजय वाघमारे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली. विद्यार्थ्यांचाही या उपक्र माला प्रतिसाद देत परिसरातील माती, चिखल, शेण, दगड गोटे जमवून विविध किल्यांच्या प्रतिकृती उभारण्यास चालना मिळत आहे. किल्ल्यांचा पायाभरण ,तटबंदी, मोठे बुरूज, छोटे बुरूज, माची, मुख्य दरवाजा, चोर दरवाजा, चोरवाटा, भुयार, दरबार, धान्यांचे कोठारे, इत्यादी त्यावेळच्या वास्तूशिल्पाची माहिती विद्यार्थी आत्मसात करून संकल्पनेतून उतरवत आहेत.

गडकिल्यांना वाढत्या प्रदूषणाचा विळखा, त्यांची होणारी पडझड रोखण्यासाठी तसेच शिवकालीन ऐतिहासिक ठेवा , प्राचीन संस्कृती सवंर्धनासाठी व पर्यावरणस्नेही दिवाळी कार्यशाळा झाली. टाकाऊ वस्तूंचा वापर करून आकाशकंदील तयार केले. मुख्याध्यापक राजेंद्र आहिरे, शिक्षक जयवंत सावळा, लहू होळगीर, प्रतिमा वरठा यांनी मार्गदर्शन केले.

टॅग्स :Diwaliदिवाळी