शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

१२ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी, लाभार्थी शेतकऱ्यांमध्ये समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 00:56 IST

उद्धव ठाकरे सरकारच्या कार्यकाळात करण्यात येत असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्यातील १२,५७४ शेतक-यांना कर्जमाफी मिळणार आहे.

सुनील घरतपारोळ : उद्धव ठाकरे सरकारच्या कार्यकाळात करण्यात येत असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्यातील १२,५७४ शेतक-यांना कर्जमाफी मिळणार आहे. यापैकी सहा हजार शेतकºयांना लाभ मिळाला असून कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीसाठी ठाणे मध्यवर्ती बँकेने रविवारच्या सुट्टीच्या दिवशीही रात्री उशिरापर्यंत कामकाज सुरू ठेवले होते. दुसºया दिवशी म्हणजेच सोमवारीही आलेल्या प्रत्येक शेतकºयाची कर्जमाफी नोंदणी होईपर्यंत बँकेने कामकाज सुरु ठेवल्याने शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे.जिल्ह्यातील एकूण १२,५८४ शेतकºयांनी कर्जमाफीसाठी अर्ज केलेले असून या शेतकºयांना ७३ कोटी चार लाखांचा कर्जमाफी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पीक कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील सहकारी संस्थांनी शासनाकडे एकूण ७३ कोटी चार लाख रु पयांची मागणी केली आहे. यापैकी सहा हजार शेतकºयांना सोमवारपर्यंत कर्जमाफी दिली गेली आहे. यामुळे कर्जमाफी झालेल्या शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, जे शेतकरी घेतलेले पीककर्ज नियमित भरतात, त्यांना कुठलाही दिलासा न दिल्याने त्यांच्यामध्ये मोठ्या नाराजीचा सूर उमटत आहेत. सावकाराकडे जाण्याची पाळी येऊ नये म्हणून व सहकारी संस्था शेतकºयांच्या अडी-अडचणीत नेहमी उभ्या राहत असल्याने त्या सुरू राहाव्यात म्हणून आम्ही नियमित कर्ज भरतो. पण आम्हाला सरकारकडून कोणताच लाभ मिळत नसून जे कर्ज थकीत ठेवतात, त्यांना मात्र कर्जमाफीचा लाभ मिळतो. यामुळे घेतलेले कर्ज भरावे की नाईलाजाने थकवावे हा आमच्यापुढे प्रश्न असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.कर्जमाफीच्या घोषणेनंतर पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. तेव्हा असे सांगण्यात आले होते की, एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत ही कर्जमाफी पूर्ण होईल. मात्र २८ फेब्रुवारीला सरकारने दुसºया यादीमध्ये वसई तालुक्यातील ६४ शेतकºयांना लाभ मिळाला. आॅनलाईन प्रक्रियेत करण्यात येणाºया नोंदणीमध्ये प्रकरणे निकाली काढताना इंटरनेट सेवेची गती मंद असल्याने ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चांदीप शाखेने शेतकºयांच्या सोयीसाठी सेवा रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आली होती.>अशी असेल कर्जमाफीची योजनाडिसेंबर महिन्यात नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. ज्या शेतकºयांचे २ लाख रु पयांपर्यंतचे सप्टेंबर २०१९ पर्यंत थकीत आहे, तेकर्ज माफ करण्यात येईल. मार्च २०२० पासून ही योजना लागू होईल, असे जाहीर करण्यात आले होते. कर्जमाफीची रक्कम थेट शेतकºयाच्या खात्यात पोहोचवली जाणार आहे. या हंगामाचे जे कर्ज जूनमध्ये थकीत होईल त्याचेसुद्धा पुनर्गठन करण्यात येईल.>अगदी शेवटच्या शेतकºयाची माफी नोंदणी होईपर्यंत बँकेचे सर्व कर्मचारी आपल्या सेवेचा वेळ वाढवून कामे करण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत. सदर कर्जमाफी ही फक्त पीक कर्जासाठी असून इतर कर्जधारकांनी नियमित कर्ज भरणा करावयाचा आहे.- राजेंद्र पाटील, अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँक>शासनाच्या पीककर्ज माफी योजनेचा लाभ मिळावा म्हणून बँक व्यवस्थापनेने आमची चांगली सोय केल्याने शेतकºयांमार्फत बँकेचे आभार मानत आहे.-दशरथ मगन पाटील,लाभार्थी शेतकरी, गाव भिनार, वसई>शासनाने थकीत शेतकºयांच्या कर्जाची माफी केली आहे. मात्र आम्ही दरसाल नियमित कर्ज भरणा करत आलो असतानाही सरकार आमचा विचार करत नसल्याने आता घेतलेली कर्ज भरायची की नाही, हा आमच्यासमोर प्रश्न आहे.- विश्वनाथ कुडू, शेतकरी, खानिवडे