शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
2
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
3
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
4
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
5
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
6
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
7
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
8
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
9
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
10
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
11
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
12
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
13
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
14
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
15
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
16
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
17
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
18
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
19
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
20
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले

१२ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी, लाभार्थी शेतकऱ्यांमध्ये समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 00:56 IST

उद्धव ठाकरे सरकारच्या कार्यकाळात करण्यात येत असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्यातील १२,५७४ शेतक-यांना कर्जमाफी मिळणार आहे.

सुनील घरतपारोळ : उद्धव ठाकरे सरकारच्या कार्यकाळात करण्यात येत असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्यातील १२,५७४ शेतक-यांना कर्जमाफी मिळणार आहे. यापैकी सहा हजार शेतकºयांना लाभ मिळाला असून कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीसाठी ठाणे मध्यवर्ती बँकेने रविवारच्या सुट्टीच्या दिवशीही रात्री उशिरापर्यंत कामकाज सुरू ठेवले होते. दुसºया दिवशी म्हणजेच सोमवारीही आलेल्या प्रत्येक शेतकºयाची कर्जमाफी नोंदणी होईपर्यंत बँकेने कामकाज सुरु ठेवल्याने शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे.जिल्ह्यातील एकूण १२,५८४ शेतकºयांनी कर्जमाफीसाठी अर्ज केलेले असून या शेतकºयांना ७३ कोटी चार लाखांचा कर्जमाफी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पीक कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील सहकारी संस्थांनी शासनाकडे एकूण ७३ कोटी चार लाख रु पयांची मागणी केली आहे. यापैकी सहा हजार शेतकºयांना सोमवारपर्यंत कर्जमाफी दिली गेली आहे. यामुळे कर्जमाफी झालेल्या शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, जे शेतकरी घेतलेले पीककर्ज नियमित भरतात, त्यांना कुठलाही दिलासा न दिल्याने त्यांच्यामध्ये मोठ्या नाराजीचा सूर उमटत आहेत. सावकाराकडे जाण्याची पाळी येऊ नये म्हणून व सहकारी संस्था शेतकºयांच्या अडी-अडचणीत नेहमी उभ्या राहत असल्याने त्या सुरू राहाव्यात म्हणून आम्ही नियमित कर्ज भरतो. पण आम्हाला सरकारकडून कोणताच लाभ मिळत नसून जे कर्ज थकीत ठेवतात, त्यांना मात्र कर्जमाफीचा लाभ मिळतो. यामुळे घेतलेले कर्ज भरावे की नाईलाजाने थकवावे हा आमच्यापुढे प्रश्न असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.कर्जमाफीच्या घोषणेनंतर पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. तेव्हा असे सांगण्यात आले होते की, एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत ही कर्जमाफी पूर्ण होईल. मात्र २८ फेब्रुवारीला सरकारने दुसºया यादीमध्ये वसई तालुक्यातील ६४ शेतकºयांना लाभ मिळाला. आॅनलाईन प्रक्रियेत करण्यात येणाºया नोंदणीमध्ये प्रकरणे निकाली काढताना इंटरनेट सेवेची गती मंद असल्याने ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चांदीप शाखेने शेतकºयांच्या सोयीसाठी सेवा रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आली होती.>अशी असेल कर्जमाफीची योजनाडिसेंबर महिन्यात नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. ज्या शेतकºयांचे २ लाख रु पयांपर्यंतचे सप्टेंबर २०१९ पर्यंत थकीत आहे, तेकर्ज माफ करण्यात येईल. मार्च २०२० पासून ही योजना लागू होईल, असे जाहीर करण्यात आले होते. कर्जमाफीची रक्कम थेट शेतकºयाच्या खात्यात पोहोचवली जाणार आहे. या हंगामाचे जे कर्ज जूनमध्ये थकीत होईल त्याचेसुद्धा पुनर्गठन करण्यात येईल.>अगदी शेवटच्या शेतकºयाची माफी नोंदणी होईपर्यंत बँकेचे सर्व कर्मचारी आपल्या सेवेचा वेळ वाढवून कामे करण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत. सदर कर्जमाफी ही फक्त पीक कर्जासाठी असून इतर कर्जधारकांनी नियमित कर्ज भरणा करावयाचा आहे.- राजेंद्र पाटील, अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँक>शासनाच्या पीककर्ज माफी योजनेचा लाभ मिळावा म्हणून बँक व्यवस्थापनेने आमची चांगली सोय केल्याने शेतकºयांमार्फत बँकेचे आभार मानत आहे.-दशरथ मगन पाटील,लाभार्थी शेतकरी, गाव भिनार, वसई>शासनाने थकीत शेतकºयांच्या कर्जाची माफी केली आहे. मात्र आम्ही दरसाल नियमित कर्ज भरणा करत आलो असतानाही सरकार आमचा विचार करत नसल्याने आता घेतलेली कर्ज भरायची की नाही, हा आमच्यासमोर प्रश्न आहे.- विश्वनाथ कुडू, शेतकरी, खानिवडे