शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

१२ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी, लाभार्थी शेतकऱ्यांमध्ये समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 00:56 IST

उद्धव ठाकरे सरकारच्या कार्यकाळात करण्यात येत असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्यातील १२,५७४ शेतक-यांना कर्जमाफी मिळणार आहे.

सुनील घरतपारोळ : उद्धव ठाकरे सरकारच्या कार्यकाळात करण्यात येत असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्यातील १२,५७४ शेतक-यांना कर्जमाफी मिळणार आहे. यापैकी सहा हजार शेतकºयांना लाभ मिळाला असून कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीसाठी ठाणे मध्यवर्ती बँकेने रविवारच्या सुट्टीच्या दिवशीही रात्री उशिरापर्यंत कामकाज सुरू ठेवले होते. दुसºया दिवशी म्हणजेच सोमवारीही आलेल्या प्रत्येक शेतकºयाची कर्जमाफी नोंदणी होईपर्यंत बँकेने कामकाज सुरु ठेवल्याने शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे.जिल्ह्यातील एकूण १२,५८४ शेतकºयांनी कर्जमाफीसाठी अर्ज केलेले असून या शेतकºयांना ७३ कोटी चार लाखांचा कर्जमाफी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पीक कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील सहकारी संस्थांनी शासनाकडे एकूण ७३ कोटी चार लाख रु पयांची मागणी केली आहे. यापैकी सहा हजार शेतकºयांना सोमवारपर्यंत कर्जमाफी दिली गेली आहे. यामुळे कर्जमाफी झालेल्या शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, जे शेतकरी घेतलेले पीककर्ज नियमित भरतात, त्यांना कुठलाही दिलासा न दिल्याने त्यांच्यामध्ये मोठ्या नाराजीचा सूर उमटत आहेत. सावकाराकडे जाण्याची पाळी येऊ नये म्हणून व सहकारी संस्था शेतकºयांच्या अडी-अडचणीत नेहमी उभ्या राहत असल्याने त्या सुरू राहाव्यात म्हणून आम्ही नियमित कर्ज भरतो. पण आम्हाला सरकारकडून कोणताच लाभ मिळत नसून जे कर्ज थकीत ठेवतात, त्यांना मात्र कर्जमाफीचा लाभ मिळतो. यामुळे घेतलेले कर्ज भरावे की नाईलाजाने थकवावे हा आमच्यापुढे प्रश्न असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.कर्जमाफीच्या घोषणेनंतर पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. तेव्हा असे सांगण्यात आले होते की, एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत ही कर्जमाफी पूर्ण होईल. मात्र २८ फेब्रुवारीला सरकारने दुसºया यादीमध्ये वसई तालुक्यातील ६४ शेतकºयांना लाभ मिळाला. आॅनलाईन प्रक्रियेत करण्यात येणाºया नोंदणीमध्ये प्रकरणे निकाली काढताना इंटरनेट सेवेची गती मंद असल्याने ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चांदीप शाखेने शेतकºयांच्या सोयीसाठी सेवा रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आली होती.>अशी असेल कर्जमाफीची योजनाडिसेंबर महिन्यात नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. ज्या शेतकºयांचे २ लाख रु पयांपर्यंतचे सप्टेंबर २०१९ पर्यंत थकीत आहे, तेकर्ज माफ करण्यात येईल. मार्च २०२० पासून ही योजना लागू होईल, असे जाहीर करण्यात आले होते. कर्जमाफीची रक्कम थेट शेतकºयाच्या खात्यात पोहोचवली जाणार आहे. या हंगामाचे जे कर्ज जूनमध्ये थकीत होईल त्याचेसुद्धा पुनर्गठन करण्यात येईल.>अगदी शेवटच्या शेतकºयाची माफी नोंदणी होईपर्यंत बँकेचे सर्व कर्मचारी आपल्या सेवेचा वेळ वाढवून कामे करण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत. सदर कर्जमाफी ही फक्त पीक कर्जासाठी असून इतर कर्जधारकांनी नियमित कर्ज भरणा करावयाचा आहे.- राजेंद्र पाटील, अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँक>शासनाच्या पीककर्ज माफी योजनेचा लाभ मिळावा म्हणून बँक व्यवस्थापनेने आमची चांगली सोय केल्याने शेतकºयांमार्फत बँकेचे आभार मानत आहे.-दशरथ मगन पाटील,लाभार्थी शेतकरी, गाव भिनार, वसई>शासनाने थकीत शेतकºयांच्या कर्जाची माफी केली आहे. मात्र आम्ही दरसाल नियमित कर्ज भरणा करत आलो असतानाही सरकार आमचा विचार करत नसल्याने आता घेतलेली कर्ज भरायची की नाही, हा आमच्यासमोर प्रश्न आहे.- विश्वनाथ कुडू, शेतकरी, खानिवडे