शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

१२ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी, लाभार्थी शेतकऱ्यांमध्ये समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 00:56 IST

उद्धव ठाकरे सरकारच्या कार्यकाळात करण्यात येत असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्यातील १२,५७४ शेतक-यांना कर्जमाफी मिळणार आहे.

सुनील घरतपारोळ : उद्धव ठाकरे सरकारच्या कार्यकाळात करण्यात येत असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्यातील १२,५७४ शेतक-यांना कर्जमाफी मिळणार आहे. यापैकी सहा हजार शेतकºयांना लाभ मिळाला असून कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीसाठी ठाणे मध्यवर्ती बँकेने रविवारच्या सुट्टीच्या दिवशीही रात्री उशिरापर्यंत कामकाज सुरू ठेवले होते. दुसºया दिवशी म्हणजेच सोमवारीही आलेल्या प्रत्येक शेतकºयाची कर्जमाफी नोंदणी होईपर्यंत बँकेने कामकाज सुरु ठेवल्याने शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे.जिल्ह्यातील एकूण १२,५८४ शेतकºयांनी कर्जमाफीसाठी अर्ज केलेले असून या शेतकºयांना ७३ कोटी चार लाखांचा कर्जमाफी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पीक कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील सहकारी संस्थांनी शासनाकडे एकूण ७३ कोटी चार लाख रु पयांची मागणी केली आहे. यापैकी सहा हजार शेतकºयांना सोमवारपर्यंत कर्जमाफी दिली गेली आहे. यामुळे कर्जमाफी झालेल्या शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, जे शेतकरी घेतलेले पीककर्ज नियमित भरतात, त्यांना कुठलाही दिलासा न दिल्याने त्यांच्यामध्ये मोठ्या नाराजीचा सूर उमटत आहेत. सावकाराकडे जाण्याची पाळी येऊ नये म्हणून व सहकारी संस्था शेतकºयांच्या अडी-अडचणीत नेहमी उभ्या राहत असल्याने त्या सुरू राहाव्यात म्हणून आम्ही नियमित कर्ज भरतो. पण आम्हाला सरकारकडून कोणताच लाभ मिळत नसून जे कर्ज थकीत ठेवतात, त्यांना मात्र कर्जमाफीचा लाभ मिळतो. यामुळे घेतलेले कर्ज भरावे की नाईलाजाने थकवावे हा आमच्यापुढे प्रश्न असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.कर्जमाफीच्या घोषणेनंतर पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. तेव्हा असे सांगण्यात आले होते की, एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत ही कर्जमाफी पूर्ण होईल. मात्र २८ फेब्रुवारीला सरकारने दुसºया यादीमध्ये वसई तालुक्यातील ६४ शेतकºयांना लाभ मिळाला. आॅनलाईन प्रक्रियेत करण्यात येणाºया नोंदणीमध्ये प्रकरणे निकाली काढताना इंटरनेट सेवेची गती मंद असल्याने ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चांदीप शाखेने शेतकºयांच्या सोयीसाठी सेवा रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आली होती.>अशी असेल कर्जमाफीची योजनाडिसेंबर महिन्यात नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. ज्या शेतकºयांचे २ लाख रु पयांपर्यंतचे सप्टेंबर २०१९ पर्यंत थकीत आहे, तेकर्ज माफ करण्यात येईल. मार्च २०२० पासून ही योजना लागू होईल, असे जाहीर करण्यात आले होते. कर्जमाफीची रक्कम थेट शेतकºयाच्या खात्यात पोहोचवली जाणार आहे. या हंगामाचे जे कर्ज जूनमध्ये थकीत होईल त्याचेसुद्धा पुनर्गठन करण्यात येईल.>अगदी शेवटच्या शेतकºयाची माफी नोंदणी होईपर्यंत बँकेचे सर्व कर्मचारी आपल्या सेवेचा वेळ वाढवून कामे करण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत. सदर कर्जमाफी ही फक्त पीक कर्जासाठी असून इतर कर्जधारकांनी नियमित कर्ज भरणा करावयाचा आहे.- राजेंद्र पाटील, अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँक>शासनाच्या पीककर्ज माफी योजनेचा लाभ मिळावा म्हणून बँक व्यवस्थापनेने आमची चांगली सोय केल्याने शेतकºयांमार्फत बँकेचे आभार मानत आहे.-दशरथ मगन पाटील,लाभार्थी शेतकरी, गाव भिनार, वसई>शासनाने थकीत शेतकºयांच्या कर्जाची माफी केली आहे. मात्र आम्ही दरसाल नियमित कर्ज भरणा करत आलो असतानाही सरकार आमचा विचार करत नसल्याने आता घेतलेली कर्ज भरायची की नाही, हा आमच्यासमोर प्रश्न आहे.- विश्वनाथ कुडू, शेतकरी, खानिवडे