शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
4
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
5
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
6
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
7
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
8
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
9
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
10
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
11
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
12
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
14
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
15
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
16
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
17
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
18
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
19
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
20
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."

विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 00:06 IST

पाण्यात पडलेल्या जिवंत वीज वाहिनीमुळे विजेचा जबरदस्त धक्का लागून एक महिला जागीच गतप्राण झाल्याची हृदयद्रावक घटना वसईतील मूळगाव येथे घडली आहे.

वसई/नालासोपारा : मुसळधार पावसामुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून वाट काढत जात असताना पाण्यात पडलेल्या जिवंत वीज वाहिनीमुळे विजेचा जबरदस्त धक्का लागून एक महिला जागीच गतप्राण झाल्याची हृदयद्रावक घटना वसईतील मूळगाव येथे घडली आहे. यामुळे महावितरण कंपनी विरोधात वसईत तीव्र संताप व्यक्त होत आहे. ज्योत्स्ना हिला दोन लहान मुले आहेत. अधिक माहितीनुसार, मूळगाव परिसरातील सातमा देवी परिसरातून जोत्स्ना अल्पेश परमार (२७) या तामतलावाच्या दिशेने जात होत्या. यावेळी मुसळधार पावसामुळे रस्त्यावर बऱ्यापैकी पाणीही साचले होते.या साचलेल्या पाण्यात वीज वाहिनीची जिवंत तार पडली होती. हे लक्षात न आल्याने पाण्यातून जात असताना ज्योत्स्नाला विजेचा जबरदस्त धक्का लागला. त्यावेळी रस्त्यावरील काही ग्रामस्थांनी लागलीच या महिलेला महापालिकेच्या सर डीएम पेटिट रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.या प्रकरणी वसई पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली आहे. तर दुसरीकडे या घटनेमुळे वसईतील जुनाट आणि जीर्ण वीज वितरण व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.>मूळगाव येथे घडलेली घटना दुर्देवी आहे, मात्र या एकूणच घटनेची सखोल चौकशी व तपासणी आपण विद्युत निरीक्षक तपासणी विभागाकडून करत आहोत, अन्य काही तांत्रिक चुका नेमक्या कोणी केल्या आहेत, यांच्या सखोल चौकशीनंतर दोषी आढळून येईल, त्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच वसई शहरात जुन्या डीपी अथवा जीर्ण झालेली वीज वितरण व्यवस्था बदलणे आदींचे काम सुरू आहे. पुढील आठ महिन्यात टप्याटप्याने ही सर्व कामे पूर्ण होतील.- दिनेश अगरवाल,अधीक्षक अभियंता, वसई सर्कल