शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

कसारा घाटातील अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 00:46 IST

नालासोपारा शहरातील आचोळे गावातील चौधरी कुुटुंबावर शुक्रवारी काळाने घाला घातला. त्यांच्या गाडीला कसारा घाटात झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण अत्यवस्थ आहेत.

वसई : नालासोपारा शहरातील आचोळे गावातील चौधरी कुुटुंबावर शुक्रवारी काळाने घाला घातला. त्यांच्या गाडीला कसारा घाटात झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण अत्यवस्थ आहेत. शुक्रवारी रात्री तिघांवर आचोळे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.आचोळे गावात राहणारे हेमंत चौधरी नाशिक येथे वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या मुलीला सोडण्यासाठी सहकुुटुंब गेले होते. परत येताना शुक्रवारी कसारा घाटानजीक उंबरमाळीजवळ कंटेनर आणि त्यांच्या कारमध्ये भीषण अपघात झाला. त्यात हेमंत चौधरी (४५) यांच्यासह त्यांच्या मोठ्या भावाचा मुलगा मनोज चौधरी (२२) आणि मित्र रमेश नाईक (५५) यांचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी मधुमती चौैधरी (३६), मुलगा धीरज चौधरी (२६) आणि मुलगी धनश्री चौधरी (२०) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर ठाणे येथील खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत.रात्री उशिरा तिघांचेही मृतदेह नाशिकहून आचोळे येथील घरी आणल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आपला मुलगा आणि नातू अपघातात मृत्युमुखी पडल्याचे समजताच आजारी असलेल्या काशिनाथ चौधरी यांचाही रात्री हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. चौधरी कुुटुंबावर झालेल्या आघातामुळे आचोळे गाव शोकसागरात बुडाले आहे.मुलगा, नातवाच्या निधनाने वडिलांनीही सोडले प्राणमुलगा आणि नातू अपघातात मृत्युमुखी पडल्याचे समजताच घरी अंथरुणावर खिळलेल्या काशिनाथ चौधरी यांचाही रात्री हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

टॅग्स :Accidentअपघात