शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

पालघर जिल्ह्यात आंदोलनांनी गाजला दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 00:24 IST

मनसेचा वीजदरवाढीविरोधात राज्य सरकारविरुद्ध मोर्चा : माकपाचा केंद्र सरकारविरोधात रास्तारोको

पालघर : पालघर जिल्ह्यात विविध आंदोलनांमुळे गुरुवारचा दिवस गाजला. माक्सवादी कम्युनिस्ट पार्टीने केंद्र सरकारविरोधात विविध मागण्यांसाठी ठिकठिकाणी रास्तारोको आंदोलन केले, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वाढीव वीज बिले माफ करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारविरोधात रणशिंग फुंकले.

महावितरणने लॉकडाऊन काळात पाठवलेली वाढीव वीजबिले माफ करण्यास नकार दिल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुरुवारी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात राज्यभर आंदोलन करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर पालघर येथेदेखील मनसेच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महाविकास आघाडी सरकारविरोधात घोषणा देत सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. राज्य सरकारने वीजबिल माफ करावे, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.

वाढीव वीज दरवाढीविरोधात मनसेतर्फे पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारीत पालघर, सफाळे, बोईसर आदी भागात काही मनसे पदाधिकाऱ्यांना आंदोलनाआधीच ताब्यात घेतले. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यासाठी तयारीत असलेल्या जुना पालघर परिसरातील मनसेच्या कार्यालयाबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलेे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लाॅकडाऊन घोषित करण्यात आले. त्यानंतर वीज नियामक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार महावितरणने मीटर रीडिंग व वीज बिल वाटप केले. कोरोना काळात जनतेची आर्थिक गणिते कोलमडली असताना वाढीव वीज देयके म्हणजे जनतेच्या खिशावर भुर्दंड पडला आहे. एकीकडे जनता कोरोना संकटाचा सामना करीत असताना जनतेला आर्थिक दिलासा देण्याऐवजी आवाजवी वीज बिल देऊन त्यांची दिशाभूल करीत वीज दरवाढ करीत महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केला असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे.

लॉकडाऊन काळात राज्यातील नागरिकांना भरमसाट वीजबिले पाठवली गेली. याबाबत सवलत देण्याचे महाविकास आघाडी सरकारने जाहीर केले होते, पण ऊर्जामंत्र्यांनीच स्वतः वीज बिलाबाबत दिलासा देता येणार नाही व नागरिकांना ती भरावी लागतील, असे सांगितले आहे. तसेच या भरमसाट बिलांची वसुली करण्याचेही जाहीर केले आहे. महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केला असून जनतेने ही वाढीव बिले भरू नयेत, असे आवाहन मनसेने केले आहे. मनसेच्या आंदोलनात जयेंद्र पाटील, भावेश चुरी, समीर मोरे, सुनील इंभाड, संदेश पडवळे, दिनेश गवई, मंगेश घरत, प्रवीण भोईर आदी पदाधिकारी सहभागी झाले होते. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघर