शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

धोडिया कंपनीच्या प्रदूषणामुळे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 05:29 IST

कंपनीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी : व्यवस्थापनाने मात्र सर्व आरोप फेटाळले

वाडा : या तालुक्यातील कुडूस ग्रामपंचायतीच्या हद्दीतील धोडिया या कंपनीच्या वायु व जल प्रदूषणामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याने कंपनी बंद करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया ( सेक्युलर) या पक्षाने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

या कंपनीत धाग्याच्या उत्पादना बरोबरच रासायनिक पावडरचे उत्पादन घेतले जाते. या कंपनीतील धूर हा दररोज सोडला जात असल्याने परिसरात वायु प्रदूषण होते. तसेच कंपनी तिचे रासायनिक सांडपाणी बाजूच्याच नाल्यात सोडत असल्याने व पर्यायाने भातशेतीत पसरत असल्याने तिचेही नुकसान होते आहे. नाल्यातील दूषित पाणी वडवली, मुसारणे, घोडविंदे पाडा, घोणसई व डाकिवली यामार्गे ते तानसा नदीत जाते. त्यामुळे नाला व नदीचे पाणी दूषित होऊन मानव व प्राण्यांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचा आरोप निवेदनात केला आहे. दुषित पाणी झिरपून विहीरी व कूपनलिकेत जात असल्याने त्यातीलही पाणी प्रदूषित झाले असावे असाही अंदाज त्यांनी वर्तवला आहे.कंपनीपासून होणारे वायू व जल प्रदूषणामुळे नागरिक व प्राण्यांच्या आरोग्यास कसा व कोणता धोका उत्पन्न झाला आहे याची पाहणी करून कंपनीवर कारवाई करून ती बंद करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तत्काळ कारवाई न केल्यास पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. आता प्रशासन यावर कोणती कारवाई करते याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.आमच्या कंपनीचे सांडपाणी नाल्यात सोडले जात नाही. कुठल्याही प्रकारचे प्रदूषण कंपनी पासून होत नाही. हे आरोप बिनबुडाचे आहेत.- उमाकांत पांडा, व्यवस्थापक,धोडीया कंपनी

टॅग्स :Vasai Virarवसई विरारWaterपाणी