शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

धोडिया कंपनीच्या प्रदूषणामुळे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 05:29 IST

कंपनीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी : व्यवस्थापनाने मात्र सर्व आरोप फेटाळले

वाडा : या तालुक्यातील कुडूस ग्रामपंचायतीच्या हद्दीतील धोडिया या कंपनीच्या वायु व जल प्रदूषणामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याने कंपनी बंद करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया ( सेक्युलर) या पक्षाने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

या कंपनीत धाग्याच्या उत्पादना बरोबरच रासायनिक पावडरचे उत्पादन घेतले जाते. या कंपनीतील धूर हा दररोज सोडला जात असल्याने परिसरात वायु प्रदूषण होते. तसेच कंपनी तिचे रासायनिक सांडपाणी बाजूच्याच नाल्यात सोडत असल्याने व पर्यायाने भातशेतीत पसरत असल्याने तिचेही नुकसान होते आहे. नाल्यातील दूषित पाणी वडवली, मुसारणे, घोडविंदे पाडा, घोणसई व डाकिवली यामार्गे ते तानसा नदीत जाते. त्यामुळे नाला व नदीचे पाणी दूषित होऊन मानव व प्राण्यांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचा आरोप निवेदनात केला आहे. दुषित पाणी झिरपून विहीरी व कूपनलिकेत जात असल्याने त्यातीलही पाणी प्रदूषित झाले असावे असाही अंदाज त्यांनी वर्तवला आहे.कंपनीपासून होणारे वायू व जल प्रदूषणामुळे नागरिक व प्राण्यांच्या आरोग्यास कसा व कोणता धोका उत्पन्न झाला आहे याची पाहणी करून कंपनीवर कारवाई करून ती बंद करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तत्काळ कारवाई न केल्यास पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. आता प्रशासन यावर कोणती कारवाई करते याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.आमच्या कंपनीचे सांडपाणी नाल्यात सोडले जात नाही. कुठल्याही प्रकारचे प्रदूषण कंपनी पासून होत नाही. हे आरोप बिनबुडाचे आहेत.- उमाकांत पांडा, व्यवस्थापक,धोडीया कंपनी

टॅग्स :Vasai Virarवसई विरारWaterपाणी