शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
4
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
5
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
6
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
7
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
8
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
9
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
10
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
11
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
12
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
13
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
14
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
15
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
16
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
17
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
18
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
19
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
20
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?

जिल्ह्यातील नुकसानीचा प्रश्न थेट संसदेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 00:10 IST

राजेंद्र गावितांनी केली मोठ्या मदतीची मागणी; शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित

पालघर/बोर्डी : जिल्ह्यात झालेला परतीचा पाऊस आणि ‘क्यार’ व ‘महा’ चक्रीवादळसदृश परिस्थितीमुळे खरिपातील धान्य पिक, चिकू बागायती आणि मासेमारी व्यवसायाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांना चांगली नुकसानभरपाई देण्याची मागणी खा. राजेंद्र गावित यांनी सध्या सुरू असलेल्या लोकसभा अधिवेशनात केंद्रशासनाकडे केली आहे. त्यामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर २५ हजार तसेच चिकू बागायतदारांना ५० हजार भरपाई देतानाच मच्छीमारांचाही त्यात प्रामुख्याने विचार व्हावा असे त्यांनी सांगितले.यावर्षी पावसाचा हंगाम लांबला. शिवाय परतीच्या पावसासह ‘क्यार’ आणि ‘महा’ चक्रीवादळामुळे या जिल्ह्यातील खरिपातील प्रमुख पीक असलेल्या भातासह नागली, वरई या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भातपिकाच्या नुकसानीची आकडेवारी ४७ हजार हेक्टर इतकी असून त्याला प्रतीहेक्टरी ६ हजार रुपये इतकी तुटपुंजी मदत दिली जाणार आहे. ती खूपच तोकडी असून त्याएवजी प्रतीहेक्टरी २५ हजार रुपये भरपाई मिळणे आवश्यक आहे. मात्र राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असल्याने केंद्रशासनाने तातडीने नुकसान भरपाईच्या रकमेत वाढ करावी अशी त्यांनी मागणी केली. राज्यात डहाणूतील चिकू हे फळ प्रसिद्ध आहे. अतिपावसामुळे जिल्ह्यातील सुमारे साडेसात हजार हेक्टर क्षेत्रावरील उत्पादनक्षम बागायतीचे अतोनात नुकसान झाल्याने बागायतदार देशोधडीला लागला आहे. त्यामुळे या फळ पिकाला प्रतीहेक्टरी 18हजार रुपयांऐवजी ५० हजार रु पये भरपाई मिळाली पाहिजे असेही ते म्हणाले. त्याचप्रमाणे वसई आणि पालघर या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर फुलशेती केली जाते. पावसामुळे या पिकावरही परिणाम झाला असून फुलशेतकºयांना मदत देण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.जिल्ह्यातील वसई, पालघर, डहाणू आणि तलासरी या चार तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मासेमारी केली जाते. समुद्रात उसळलेले वादळीवारे आणि पावसामुळे मासेमारी पासून मच्छीमाराना वंचित राहावे लागले असून काही मच्छीमारांनी मासेमारी करून वाळत टाकलेले कोट्यवधी रुपयांचे मासे भिजून कुजून गेले. यामुळे मच्छीमारी व्यवसायावर मंदीचे सावट असल्याने शेतकरीवर्गाप्रमाणे मच्छीमारांना नुकसानभरपाई देताना विचार झाला पाहिजे असे त्यांनी सांगितले. राज्य शासनाच्या २०१५ च्या शासन निर्णयात शेतकºयांच्या उत्पादित मालाच्या नुकसानभरपाईचे प्रयोजन असताना मच्छीमारांच्या मत्स्य उत्पादनाच्या नुकसानभरपाई बाबत मात्र कुठलेही प्रयोजन करण्यात आले नसल्याने त्यात बदल करून मच्छीमारांच्याही भरपाईचे प्रयोजन करावे अशी मागणी आपण केल्याचे खासदारांनी सांगितले.