शहरं
Join us  
Trending Stories
1
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
2
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
3
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
4
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
5
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
6
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
7
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
8
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
9
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
10
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
11
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
12
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
13
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
14
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
15
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
16
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
17
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
18
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
19
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
20
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी

जिल्ह्यातील नुकसानीचा प्रश्न थेट संसदेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 00:10 IST

राजेंद्र गावितांनी केली मोठ्या मदतीची मागणी; शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित

पालघर/बोर्डी : जिल्ह्यात झालेला परतीचा पाऊस आणि ‘क्यार’ व ‘महा’ चक्रीवादळसदृश परिस्थितीमुळे खरिपातील धान्य पिक, चिकू बागायती आणि मासेमारी व्यवसायाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांना चांगली नुकसानभरपाई देण्याची मागणी खा. राजेंद्र गावित यांनी सध्या सुरू असलेल्या लोकसभा अधिवेशनात केंद्रशासनाकडे केली आहे. त्यामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर २५ हजार तसेच चिकू बागायतदारांना ५० हजार भरपाई देतानाच मच्छीमारांचाही त्यात प्रामुख्याने विचार व्हावा असे त्यांनी सांगितले.यावर्षी पावसाचा हंगाम लांबला. शिवाय परतीच्या पावसासह ‘क्यार’ आणि ‘महा’ चक्रीवादळामुळे या जिल्ह्यातील खरिपातील प्रमुख पीक असलेल्या भातासह नागली, वरई या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भातपिकाच्या नुकसानीची आकडेवारी ४७ हजार हेक्टर इतकी असून त्याला प्रतीहेक्टरी ६ हजार रुपये इतकी तुटपुंजी मदत दिली जाणार आहे. ती खूपच तोकडी असून त्याएवजी प्रतीहेक्टरी २५ हजार रुपये भरपाई मिळणे आवश्यक आहे. मात्र राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असल्याने केंद्रशासनाने तातडीने नुकसान भरपाईच्या रकमेत वाढ करावी अशी त्यांनी मागणी केली. राज्यात डहाणूतील चिकू हे फळ प्रसिद्ध आहे. अतिपावसामुळे जिल्ह्यातील सुमारे साडेसात हजार हेक्टर क्षेत्रावरील उत्पादनक्षम बागायतीचे अतोनात नुकसान झाल्याने बागायतदार देशोधडीला लागला आहे. त्यामुळे या फळ पिकाला प्रतीहेक्टरी 18हजार रुपयांऐवजी ५० हजार रु पये भरपाई मिळाली पाहिजे असेही ते म्हणाले. त्याचप्रमाणे वसई आणि पालघर या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर फुलशेती केली जाते. पावसामुळे या पिकावरही परिणाम झाला असून फुलशेतकºयांना मदत देण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.जिल्ह्यातील वसई, पालघर, डहाणू आणि तलासरी या चार तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मासेमारी केली जाते. समुद्रात उसळलेले वादळीवारे आणि पावसामुळे मासेमारी पासून मच्छीमाराना वंचित राहावे लागले असून काही मच्छीमारांनी मासेमारी करून वाळत टाकलेले कोट्यवधी रुपयांचे मासे भिजून कुजून गेले. यामुळे मच्छीमारी व्यवसायावर मंदीचे सावट असल्याने शेतकरीवर्गाप्रमाणे मच्छीमारांना नुकसानभरपाई देताना विचार झाला पाहिजे असे त्यांनी सांगितले. राज्य शासनाच्या २०१५ च्या शासन निर्णयात शेतकºयांच्या उत्पादित मालाच्या नुकसानभरपाईचे प्रयोजन असताना मच्छीमारांच्या मत्स्य उत्पादनाच्या नुकसानभरपाई बाबत मात्र कुठलेही प्रयोजन करण्यात आले नसल्याने त्यात बदल करून मच्छीमारांच्याही भरपाईचे प्रयोजन करावे अशी मागणी आपण केल्याचे खासदारांनी सांगितले.