शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

जिल्ह्यात आज दहीहंडीचा थरार; तरुणाईचा उत्साह शिगेला, वरुणराजाची आळवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 04:18 IST

रविवारची कृष्णजन्माष्टमी जिल्ह्यात उत्साहात पार पडली. परंतु सगळ्यांना ओढ लागली आहे ती सोमवारी रंगणाऱ्या दहीहंडीची. आगामी वर्षे निवडणुकांचे असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी व चमको नेत्यांनी ठिकठिकाणी दहीहंड्यांचे आयोजन केल्यामुळे त्यांची संख्या जशी वाढली आहे तसाच तरुणाईचा उत्साह देखील वाढला आहे.

पालघर : रविवारची कृष्णजन्माष्टमी जिल्ह्यात उत्साहात पार पडली. परंतु सगळ्यांना ओढ लागली आहे ती सोमवारी रंगणाऱ्या दहीहंडीची. आगामी वर्षे निवडणुकांचे असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी व चमको नेत्यांनी ठिकठिकाणी दहीहंड्यांचे आयोजन केल्यामुळे त्यांची संख्या जशी वाढली आहे तसाच तरुणाईचा उत्साह देखील वाढला आहे. घसघसीत रोख बक्षिसे, विम्याचे संरक्षण, उपचारांची सुविधा तसेच नाश्ता व भोजनाची सोय या बाबींमुळे स्त्री आणि पुरूष गोविंदा पथकांचा उत्साह यंदा प्रचंड वाढला आहे.बोर्डी : कृष्णजन्माष्टमी आणि दहीहंडी उत्सवाकरिता रविवार २ सप्टेंबर रोजी बाजारात लगबग दिसली. आगर गावच्या हनुमान मंदिरात श्री कृष्ण सप्ताहात १६८ तास अखंड कीर्तनाची परंपरा पंचाहत्तर वर्षापासून आजतागायत सुरु आहे.आगर गावातील हनुमान मंदिरात १९३९ पासून श्री कृष्ण सप्ताह साजरा केला जातो. यंदाचे ७५ वे वर्ष आहे. पंचक्र ोशीतील सर्वात जुना व मानाचा हा उत्सव समाजला जातो. स्थानिक मच्छीमार समाज या करिता नारळी पौर्णिमेच्या समाप्तीनंतर रात्री कीर्तनाला प्रारंभ करून, अष्टमीच्या रात्रीपर्यंत सुमारे १६८ तास अखंड सुरु ठेवतात.याकरिता गावातील श्री वैष्णव भजन मंडळी व श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ यांनी नियोजन करून कीर्तनाचा हा वारसा सुरु ठेवल्याची माहिती पुरोहित धनंजय पंडित यांनी दिली.डहाणू शहर, नरपड, चिखले, घोलवड, रामपूर, बोर्डी, झाई आणि लगतच्या गावांमध्ये विविध समाज व मंडळांकडून हा उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा केला जातो. अष्टमीच्या रात्री बारा वाजेनंतर बाळकृष्णाची मूर्ती फुलांनी सजवलेल्या पाळण्यात ठेऊन, पारंपरिक भजनं, गवळणी गाऊन साजरा होतो. गोपाळकाल्याला सार्वजनिक ठिकाणी दहीहंडी फोडण्याचा सामूहिक कार्यक्र म आयोजित करून, वाडी-वस्तीतून पालखी फिरवली जाणार आहे. त्यानंतर समुद्रकिनारी विसर्जनाने उत्सवाची सांगता होईल. सोमवारच्या दहीहंडीचीही जोरदार तयारी आहे.बोईसर : येथे ५५ सार्वजनिक ४५ खासगी दहीहंडी चे आयोजन करण्यात आले असून भारतीय जनता पार्टी व शिवसेने ची प्रत्येकी ७७७७७/- रुपये बक्षिसाची दहीहंडी असणंर आहे शिवसेनेचे या उत्सवाचे १० वे तर भाजपा चे हे पहिले वर्ष असून दोन्ही पक्षाची जोरात तयारी सुरू आहे.मनसे या वर्षी सामाजिक जाणिवेतून उत्सव साजरा न करता ५५ हजाराचा धनादेश केरळ पूरग्रस्तांना मदत म्हणून पालघर जिल्हाधिकार्याकडे सुपूर्द करणार असल्याचे मनसेचे उप जिल्हा प्रमुख समीर मोरे यांनी सांगितले. तर भाविकांची तारापूरच्या श्रीकृष्ण मंदिरात दर्शनास दिवसभर ये जा सुरू होती या मंदिरात रात्री १२ वाजता श्रीकृष्णजन्माचा कार्यक्र म आयोजित करण्यात आला होता.

टॅग्स :Dahi Handiदही हंडी