शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

डहाणूची उद्योगबंदी विकासाला मारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 03:03 IST

आदिवासीबहुल असलेल्या तालुक्यात गेल्या २८ वर्षांपासून केंद्र शासनाने येथे उद्योगबंदी लादल्याने डहाणूचा विकास खुंटला आहे.

- शौकत शेख डहाणू : आदिवासीबहुल असलेल्या तालुक्यात गेल्या २८ वर्षांपासून केंद्र शासनाने येथे उद्योगबंदी लादल्याने डहाणूचा विकास खुंटला आहे. ग्रीन झोन जाहीर केल्यामुळे डहाणूत उद्योग विकसित होऊ शकले नाहीत. विशेष म्हणजे एका बाजूला उद्योगबंदी, दुसऱ्या बाजूला उत्खननबंदी, यामुळे मोलमजुरी करणाºया आदिवासींबरोबरच सुशिक्षित बेरोजगारांची मुस्कटदाबी झाली आहे.परिणामी, रोजगारासाठी दरवर्षी डहाणूतील हजारो आदिवासी कुटुंबांना मुंबई तसेच गुजरात राज्यात स्थलांतर करावे लागते. शिवाय, येथील उच्चशिक्षित तरुणवर्ग नोकरीसाठी मुंबई, बोईसर किंवा उमरगाव (गुजरात जीआयडीसी) येथे भटकत आहे. परंतु, जर केंद्र सरकारमुळेच वाढवणबंदर, मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस, बुलेट ट्रेन अशा विविध मोठमोठ्या प्रकल्पांमुळे डहाणूतील ग्रीन झोन बाधित होणार असेल, तर ग्रीन झोन नक्की कशासाठी सरकारने लागू केला, असा प्रश्न सर्वसामान्य डहाणूकर विचारू लागले आहेत.डहाणूत सन १९८९ ला ८२० हेक्टर खाजण जमिनीवर ५०० मेगावॅट वीजनिर्मिती करणारे थर्मल पॉवर स्टेशन आले. त्यानंतर, येथील पर्यावरणाचे संतुलन बिघडू नये, म्हणून केंद शासनाने सन १९९१ ला एका अधिसूचनेद्वारे डहाणूला ग्रीन झोन जाहीर केला. त्यात प्रदूषण करणाºया कारखान्यांना मज्जाव आहे.डहाणू तालुक्यात कोणताही नवीन उद्योग सुरू करायचा असेल किंवा विद्यमान कारखान्यात फेरबदल करायचा असेल, तर सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्रधिकरणाची मान्यता घ्यायला लागते. त्याच्या अटीशर्ती पाहता गेल्या २८ वर्षांत तालुक्यात साधी पिठाची गिरणीदेखील सुरू होऊ शकलेली नाही.शासन एका बाजूला तालुक्यात उद्योगबंदी लादून नवीन कारखान्यांना बंदी घालत आहे, तर दुसºया बाजूला पर्यटनाला चालना मिळावी व त्यातून रोजगार निर्माण होईल, त्यासाठीदेखील पावले उचलत नसल्याने डहाणूतील जनता इकडे आड तिकडे विहीर या चक्र व्यूहात सापडली आहे.दरम्यान, एकीकडे डोंगराळ प्रदेश आणि दुसरीकडे सागरकिनारा यामुळे तालुक्याला उत्तम नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे. चिंचणीपासून थेट बोर्डीपर्यंतच्या विशाल समुद्रकिनाºयावर अनेक ठिकाणी पिकनिक स्पॉट तयार झाले आहेत. व्हॅकेशन तसेच सणासुदीच्या दिवसांत केवळ जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातून आणि परराज्यांतूनही पर्यटक येथे येत असतात. येथे वॉटर स्पोर्ट्ससारख्या पर्यटकांना आकर्षित करणाºया सुविधा आणण्याची गरज आहे. ते पाहता डहाणूत पर्यटनाच्या माध्यमातून ही रोजगारनिर्मिती उपलब्ध होईल असे तज्ञांचे मत आहे.>गोव्याच्या धर्तीवर...शासनाने नैसर्गिक विविधता लाभलेल्या डहाणू तालुक्यात पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी गोव्याच्या धर्तीवर येथील पर्यटनस्थळांबरोबरच धार्मिक स्थळे, हेरिटेजचाही समावेश करून विकास करण्याची गरज आहे.