शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
7
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
8
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
9
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
10
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
11
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
12
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
13
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
14
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
15
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
16
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
17
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
18
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
19
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
20
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर

डहाणूच्या किनाऱ्यांचे सौंदर्य नष्ट होणार?

By admin | Updated: August 30, 2015 21:35 IST

हिरवाईने नटलेल्या डहाणू तालुक्याच्या परिसराने आपले नैसर्गिक सौंदर्य आजवर अबाधित ठेवले होते. परंतु गेल्या दोन वर्षापासून चिंचणीपासून थेट बोर्डी पर्यंतच्या समुद्र

शौकत शेख, डहाणूहिरवाईने नटलेल्या डहाणू तालुक्याच्या परिसराने आपले नैसर्गिक सौंदर्य आजवर अबाधित ठेवले होते. परंतु गेल्या दोन वर्षापासून चिंचणीपासून थेट बोर्डी पर्यंतच्या समुद्र किनाऱ्याजवळ होणाऱ्या वाळूचा बेसुमार उपसा, सुरूच्या झाडांची कत्तल, भूमाफियांकडून होणारी राजरोस बेकायदा बांधकामे तसेच मेरी टाईम बोर्ड व पर्यटन विकास महामंडळाच्या उदासीन धोरणामुळे येथील निसर्गाचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे येथील समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्य हळूहळू नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.महाराष्ट्र राज्याला एकूण ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा आहे. त्यापैकी सुमारे ३२० कि.मी. लांबीचा किनारा हा एकट्या ठाणे जिल्ह्याला लाभलेला आहे. तर त्यातील जवळपास पन्नास कि.मी.पेक्षा अधिक समुद्रकिनारा डहाणू तालुक्यात येतो. या निसर्गरम्य किनारपट्टीत पश्चिमेकडील चिंचणी, वरोर, वाढवण, गुंगवाडा, तडियाळी, डहाणू, आगर, नरपड, चिखला, बोर्डी ते झाईपर्यंतच्या किनाऱ्याचा समावेश होतो. गर्द झाडी, केतकीची झुडपे, नारळ, सुरूची झाडे त्यातच अधूनमधून चिवचिवणारी पाखरे, सुसज्ज हॉटेल्स, मंदिरे याच्या सानिध्यात उसळणारा फेसाळ समुद्र, मुंबई, पुणे, कोल्हापूर, नासिक तसेच गुजरात राज्यातील हजारो पर्यटकांना आकर्षित करणारा आहे. त्यामुळे हिवाळा असतो की उन्हाळा येथे वर्षभर पर्यटक येत असतात. परंतु रात्रंदिवस सुरू असलेल्या रेती उपसामुळे या भागांतील समुद्रकिनारा उद्ध्वस्त झाला आहे.दरम्यान गेल्या दोन तीन वर्षांपासून खवळलेल्या समुद्रातील महाकाय लाटा किनाऱ्यावर आदळत असल्याने चिंचणीपासून बोर्डीपर्यंतच्या किनाऱ्याची प्रचंड धूप होऊन येथील तो पूर्णत: खचला आहे. ही परिस्थिती कायम राहिली तर येथील मच्छिमारांची घरे, सुरूची बागे तसेच येथील सौंदर्य नष्ट होण्याची भीती धा. डहाणूचे उपसरपंच वशिदास अभिंरे तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रकाश मदे यांनी व्यक्त केली. येथील समुद्राची धूप रोखण्यासाठी धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्याची गरज असतानाही वारंवार मागणी करून ही मेरी टाईम बोर्ड, तसेच पर्यटन विकास महामंडळ याकउे दुर्लक्ष करीत आहे. विशेष म्हणजे डहाणू, आगर, नरपड, चिखला, बोर्डी, गुंगवाडा, तडियाळी इत्यादी गावातील समुद्र किनाऱ्यावर हजारो सुरूची झाडे आहेत.