शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
2
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी
3
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉचिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
4
'बुनयान उल मरसूस', तीन एअरबेसवर झालेल्या स्फोटांनंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध कारवाई सुरू करण्याची घोषणा केली
5
India Pakistan Tension Update: भारताने पाकिस्तानाच्या 'या' हवाई तळांवर डागल्या ६ बॅलेस्टिक मिसाईल्स, मोठे स्फोट
6
आजचे राशीभविष्य, १० मे २०२५: अनेक क्षेत्रात यश व कीर्ती लाभेल, आर्थिक लाभ होईल
7
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
8
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
9
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...
10
प्रवासी विमानांना ढाल बनवतोय पाक; कर्नल सोफियांनी पुढे आणला पाकचा चेहरा
11
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
12
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
13
महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉररूम’
14
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
15
Operation Sindoor Live Updates: थोड्याच वेळात परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद; पहाटे ५:४५ वाजता ऑपरेशन सिंदूर बद्दल माहिती देणार
16
रक्तसाठा मुबलक ठेवा; आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर; तातडीची बैठक : सचिवांच्या आरोग्य विभागाला सूचना
17
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
19
आयपीएल आठवडाभर स्थगित; बीसीसीआय : राष्ट्रहित सर्वांत महत्त्वाचे, नवे वेळापत्रक योग्य वेळी देणार
20
‘हॅलो, मुरली तुमचा कोण? अन् आईला भोवळ; शहीद नाईक यांचा ‘तो’ व्हिडीओ कॉल अखेरचा

डहाणूच्या किनाऱ्यांचे सौंदर्य नष्ट होणार?

By admin | Updated: August 30, 2015 21:35 IST

हिरवाईने नटलेल्या डहाणू तालुक्याच्या परिसराने आपले नैसर्गिक सौंदर्य आजवर अबाधित ठेवले होते. परंतु गेल्या दोन वर्षापासून चिंचणीपासून थेट बोर्डी पर्यंतच्या समुद्र

शौकत शेख, डहाणूहिरवाईने नटलेल्या डहाणू तालुक्याच्या परिसराने आपले नैसर्गिक सौंदर्य आजवर अबाधित ठेवले होते. परंतु गेल्या दोन वर्षापासून चिंचणीपासून थेट बोर्डी पर्यंतच्या समुद्र किनाऱ्याजवळ होणाऱ्या वाळूचा बेसुमार उपसा, सुरूच्या झाडांची कत्तल, भूमाफियांकडून होणारी राजरोस बेकायदा बांधकामे तसेच मेरी टाईम बोर्ड व पर्यटन विकास महामंडळाच्या उदासीन धोरणामुळे येथील निसर्गाचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे येथील समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्य हळूहळू नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.महाराष्ट्र राज्याला एकूण ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा आहे. त्यापैकी सुमारे ३२० कि.मी. लांबीचा किनारा हा एकट्या ठाणे जिल्ह्याला लाभलेला आहे. तर त्यातील जवळपास पन्नास कि.मी.पेक्षा अधिक समुद्रकिनारा डहाणू तालुक्यात येतो. या निसर्गरम्य किनारपट्टीत पश्चिमेकडील चिंचणी, वरोर, वाढवण, गुंगवाडा, तडियाळी, डहाणू, आगर, नरपड, चिखला, बोर्डी ते झाईपर्यंतच्या किनाऱ्याचा समावेश होतो. गर्द झाडी, केतकीची झुडपे, नारळ, सुरूची झाडे त्यातच अधूनमधून चिवचिवणारी पाखरे, सुसज्ज हॉटेल्स, मंदिरे याच्या सानिध्यात उसळणारा फेसाळ समुद्र, मुंबई, पुणे, कोल्हापूर, नासिक तसेच गुजरात राज्यातील हजारो पर्यटकांना आकर्षित करणारा आहे. त्यामुळे हिवाळा असतो की उन्हाळा येथे वर्षभर पर्यटक येत असतात. परंतु रात्रंदिवस सुरू असलेल्या रेती उपसामुळे या भागांतील समुद्रकिनारा उद्ध्वस्त झाला आहे.दरम्यान गेल्या दोन तीन वर्षांपासून खवळलेल्या समुद्रातील महाकाय लाटा किनाऱ्यावर आदळत असल्याने चिंचणीपासून बोर्डीपर्यंतच्या किनाऱ्याची प्रचंड धूप होऊन येथील तो पूर्णत: खचला आहे. ही परिस्थिती कायम राहिली तर येथील मच्छिमारांची घरे, सुरूची बागे तसेच येथील सौंदर्य नष्ट होण्याची भीती धा. डहाणूचे उपसरपंच वशिदास अभिंरे तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रकाश मदे यांनी व्यक्त केली. येथील समुद्राची धूप रोखण्यासाठी धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्याची गरज असतानाही वारंवार मागणी करून ही मेरी टाईम बोर्ड, तसेच पर्यटन विकास महामंडळ याकउे दुर्लक्ष करीत आहे. विशेष म्हणजे डहाणू, आगर, नरपड, चिखला, बोर्डी, गुंगवाडा, तडियाळी इत्यादी गावातील समुद्र किनाऱ्यावर हजारो सुरूची झाडे आहेत.