शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
3
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
4
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
5
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
6
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
7
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
8
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
9
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
10
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
11
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
12
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
13
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
14
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
15
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
16
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
17
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
18
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
19
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
20
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."

डहाणू-विरार चौपदरीकरण प्रकल्प सापडला अडचणीत; २०२५ साल उजाडण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 01:36 IST

३२.७८ पैकी केवळ ०.३४ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण

हितेन नाईकपालघर : डहाणू-विरार पट्ट्यातील दैनंदिन प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण ठरणारा डहाणू-विरार मार्ग चौपदरीकरण प्रकल्प अडचणीत सापडला असून जिल्ह्यातील एकूण ३२.७८ हेक्टर जमिनीपैकी फक्त ०.३४ हेक्टर जमीनच भूसंपादन करण्यात प्रशासनाला यश आले आहे. यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास जाण्यास बहुदा २०२५ साल उजाडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

विरार-डहाणू मार्गादरम्यान एकाच मार्गिकेवर अप-डाऊन लोकल आणि मेल-एक्सप्रेस फेऱ्या एकत्रितपणे सुरू आहेत. त्यामुळे मेल, एक्सप्रेस गाड्यांना पुढे जाऊ देण्यासाठी डहाणू-विरार दरम्यानच्या लोकल, पॅसेंजर गाड्यांना साईडला ठेवण्यात येत असल्याचा मोठा फटका प्रवाशांना बसतो. या प्रकल्पपूर्तीनंतर लोकल आणि मेल-एक्सप्रेससाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाचा समावेश असलेल्या एमयूटीपी-३ प्रकल्पासाठी एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेने तब्बल ५० कोटी डॉलर्स म्हणजे सुमारे साडेतीन हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. मध्यंतरी निधी उभारणी आणि भूसंपादनातील अडचणींमुळे हा प्रकल्प काही काळासाठी खोळंबला होता.

मुंबई शहर परिवहन प्रकल्प-३ एमयूटीपी-३ अंतर्गत विरार-डहाणू मार्ग प्रकल्पाचा समावेश असून मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून हा प्रकल्प पूर्ण करण्यात येत आहे. भूसंपादन आणि निधीचा अडथळा दूर झाल्यानंतर या प्रकल्प उभारणीचा मार्ग मोकळा झाल्याची आवई उठविण्यात आली असली तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचा योग्य मोबदला न दिल्याने शेतकरी हक्क संघर्ष समितीने उभारलेल्या आंदोलनानंतर प्रशासनाला भूसंपादन करण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या. डिसेंबर २०१८ पर्यंत जिल्ह्यातील वसई ते डहाणू दरम्यानच्या ३० गावांतील ३२.७८ हेक्टर जमिनीचे भूसंपादन करणे अपेक्षित असताना २०२० पर्यंत प्रशासनाला फक्त ०.३४ हेक्टर जमिनीचेच भूसंपादन करणे शक्य झाले आहे. आता ही मुदत वाढवून २०२१ करण्यात आली आहे.

या प्रकल्पासाठी सुमारे ६४ कि.मी. लांबीचे रुळ टाकण्यात येणार असून प्रकल्पातील महत्त्वाचा भाग असलेल्या वैतरणा नदीवर पूल भरणे, त्या नदीवर ४२४ मीटर आणि ४७७ मीटरचे दोन पूल उभारण्याचे काम हाती घेण्यात आले होते, तसेच १६ मोठे पूल आणि संस्थेच्या लहान पूल असे एकूण ८५ पुलांची निर्मिती करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत होतो.उपनगरीय गाड्यांच्या कमतरतेमुळे दैनंदिन रेल्वे प्रवाशांचे होणारे हाल, लांब पल्ल्यांच्या गाड्यांना नव्याने थांबे मिळण्यास रेल्वे प्रशासनाकडून होणारी दिरंगाई याकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधून रेल्वे प्रशासनाकडून या चौपदरीकरणाच्या प्रकल्पाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. - हितेश सावे, जनसंपर्क अधिकारी, डहाणू-वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थाप्रवाशांना दिलासामुंबई शहर परिवहन प्रकल्प-३, एमयूटीपी-३ अंतर्गत विरार-डहाणू मार्ग प्रकल्पाचा समावेश असून मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून हा प्रकल्प पूर्ण करण्यात येत आहे. या प्रकल्पपूर्तीनंतर लोकल आणि मेल-एक्स्प्रेससाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होणार असल्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

टॅग्स :localलोकलVasai Virarवसई विरार