शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
2
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
3
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
4
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
5
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
6
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
7
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
8
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
9
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
10
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
11
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
14
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
15
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
16
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
17
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
18
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
19
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
20
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
Daily Top 2Weekly Top 5

डहाणू-विरार चौपदरीकरण प्रकल्प सापडला अडचणीत; २०२५ साल उजाडण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 01:36 IST

३२.७८ पैकी केवळ ०.३४ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण

हितेन नाईकपालघर : डहाणू-विरार पट्ट्यातील दैनंदिन प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण ठरणारा डहाणू-विरार मार्ग चौपदरीकरण प्रकल्प अडचणीत सापडला असून जिल्ह्यातील एकूण ३२.७८ हेक्टर जमिनीपैकी फक्त ०.३४ हेक्टर जमीनच भूसंपादन करण्यात प्रशासनाला यश आले आहे. यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास जाण्यास बहुदा २०२५ साल उजाडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

विरार-डहाणू मार्गादरम्यान एकाच मार्गिकेवर अप-डाऊन लोकल आणि मेल-एक्सप्रेस फेऱ्या एकत्रितपणे सुरू आहेत. त्यामुळे मेल, एक्सप्रेस गाड्यांना पुढे जाऊ देण्यासाठी डहाणू-विरार दरम्यानच्या लोकल, पॅसेंजर गाड्यांना साईडला ठेवण्यात येत असल्याचा मोठा फटका प्रवाशांना बसतो. या प्रकल्पपूर्तीनंतर लोकल आणि मेल-एक्सप्रेससाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाचा समावेश असलेल्या एमयूटीपी-३ प्रकल्पासाठी एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेने तब्बल ५० कोटी डॉलर्स म्हणजे सुमारे साडेतीन हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. मध्यंतरी निधी उभारणी आणि भूसंपादनातील अडचणींमुळे हा प्रकल्प काही काळासाठी खोळंबला होता.

मुंबई शहर परिवहन प्रकल्प-३ एमयूटीपी-३ अंतर्गत विरार-डहाणू मार्ग प्रकल्पाचा समावेश असून मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून हा प्रकल्प पूर्ण करण्यात येत आहे. भूसंपादन आणि निधीचा अडथळा दूर झाल्यानंतर या प्रकल्प उभारणीचा मार्ग मोकळा झाल्याची आवई उठविण्यात आली असली तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचा योग्य मोबदला न दिल्याने शेतकरी हक्क संघर्ष समितीने उभारलेल्या आंदोलनानंतर प्रशासनाला भूसंपादन करण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या. डिसेंबर २०१८ पर्यंत जिल्ह्यातील वसई ते डहाणू दरम्यानच्या ३० गावांतील ३२.७८ हेक्टर जमिनीचे भूसंपादन करणे अपेक्षित असताना २०२० पर्यंत प्रशासनाला फक्त ०.३४ हेक्टर जमिनीचेच भूसंपादन करणे शक्य झाले आहे. आता ही मुदत वाढवून २०२१ करण्यात आली आहे.

या प्रकल्पासाठी सुमारे ६४ कि.मी. लांबीचे रुळ टाकण्यात येणार असून प्रकल्पातील महत्त्वाचा भाग असलेल्या वैतरणा नदीवर पूल भरणे, त्या नदीवर ४२४ मीटर आणि ४७७ मीटरचे दोन पूल उभारण्याचे काम हाती घेण्यात आले होते, तसेच १६ मोठे पूल आणि संस्थेच्या लहान पूल असे एकूण ८५ पुलांची निर्मिती करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत होतो.उपनगरीय गाड्यांच्या कमतरतेमुळे दैनंदिन रेल्वे प्रवाशांचे होणारे हाल, लांब पल्ल्यांच्या गाड्यांना नव्याने थांबे मिळण्यास रेल्वे प्रशासनाकडून होणारी दिरंगाई याकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधून रेल्वे प्रशासनाकडून या चौपदरीकरणाच्या प्रकल्पाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. - हितेश सावे, जनसंपर्क अधिकारी, डहाणू-वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थाप्रवाशांना दिलासामुंबई शहर परिवहन प्रकल्प-३, एमयूटीपी-३ अंतर्गत विरार-डहाणू मार्ग प्रकल्पाचा समावेश असून मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून हा प्रकल्प पूर्ण करण्यात येत आहे. या प्रकल्पपूर्तीनंतर लोकल आणि मेल-एक्स्प्रेससाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होणार असल्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

टॅग्स :localलोकलVasai Virarवसई विरार