शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

डहाणूत राष्ट्रवादीचा वरचष्मा; तर शिवसेनेची भरारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 00:12 IST

पालघर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत डहाणूत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जि.प. आणि पंचायत समिती या दोन्ही आघाडीवर लढताना दबदबा कायम राखत पहिला क्रमांक राखला.

अनिरुद्ध पाटील/शौकत शेख ।डहाणू/बोर्डी : पालघर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत डहाणूत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जि.प. आणि पंचायत समिती या दोन्ही आघाडीवर लढताना दबदबा कायम राखत पहिला क्रमांक राखला. शिवसेनेचा आलेख चढता तर भाजप आणि माकपला अपेक्षेप्रमाणे यश राखता आले नाही. बहुजन विकास आघाडीला दोन्हीही ठिकाणी खातेही उघडता न आल्याने ती भुईसपाट झाली. तालुक्यातील गटाच्या तेरा जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप प्रत्येकी $४, शिवसेना ३, काँग्रेस १ आणि अपक्ष १ असे उमेदवार निवडून आले. तर २६ गणांसाठी राष्ट्रवादी ९, शिवसेना ८, भाजप ७ आणि माकपला २ जागेवर विजय मिळविता आला.जिल्हा परिषदेच्या डहाणू गटात यावेळी एका गटाची वाढ होऊन ही संख्या १३ झाली. मागील निवडणुकीत गटात १२ पैकी भाजपचे सर्वाधिक ५ उमेदवार निवडून आले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस, माकप आणि बहुजन विकास आघाडीचे प्रत्येकी २ तर काँग्रेसचा १ उमेदवार निवडून आला होता. चौदाव्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपला एकटे पाडून काँग्रेस, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी आणि माकपने आघाडी करून माकपच्या आमदाराला निवडून आणले. महाआघाडीची ही खेळी राष्ट्रवादीने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून लढवित असल्याचा प्रत्यय या निवडणुकीत देत गटाच्या ४ आणि गणाच्या २६ पैकी सर्वाधिक ९ जागा निवडून आणल्या. हा केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचा विजय असून माकपने सहकार्य न करता विरुद्ध मतदान केले, तर काही ठिकाणी उमेदवार उभे करून एक प्रकारे बिघाडी केल्याची प्रतिक्रिया या जिल्हा परिषद सदस्य आणि सायवन गटाचे विजयी उमेदवार काशिनाथ चौधरी यांनी दिली.विधानसभा निवडणुकीप्रमाणेच भाजपची पकड यावेळीही ओसरताना दिसली. गतवेळेला त्यांच्या गटाच्या ५ जागा होत्या. आता गटात एकाने आणि गणात तीन जागांची घट झाली. काँग्रेसला पूर्वीसारखेच गटाकरिता एकच उमेदवार निवडता आला तर गणासाठी आताही खाते उघडता आले नाही. बहुजन विकास आघाडीला दोन्ही प्रकारात एकही उमेदवार निवडून आणता आला नाही. मागच्या निवडणुकीत गटातील २ आणि गणाच्या ४ जागा निवडून आणताना पंचायत समितीचे दुसऱ्या टर्मचे उपसभापती शैलेश करमोडा यांच्या रुपाने मिळवले होते. करमोडा यांनी जिल्हा परिषदेच्या ओसरविरा गटातून विजेतेपद मिळविले. माकपला अती आत्मविश्वास भोवताना दिसला. आमदारकी जिंकली असली तरी जिल्हा परिषदेची एकही जागा जिंकता आली नसून पंचायत समितीच्या मागच्या वेळेप्रमाणेच २ जागा राखता आल्या.दरम्यान, शिवसेनेचा चढता आलेख पहायला मिळाला. गेल्या निवडणुकीत जिल्हा परिषदेची एकही जागा त्यांच्या नावावर नव्हती तर पंचायत समितीच्या २ जागा होत्या. यावेळी गटाच्या ३ आणि गणाच्या ८ जागा निवडून आणत दुसºया क्र मांकाचा पक्ष ठरला आहे. धामणगाव गटात सतीश सीताराम करबट हा एकमेव उमेदवार निवडून आला.