शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

डहाणूत राष्ट्रवादीचा वरचष्मा; तर शिवसेनेची भरारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 00:12 IST

पालघर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत डहाणूत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जि.प. आणि पंचायत समिती या दोन्ही आघाडीवर लढताना दबदबा कायम राखत पहिला क्रमांक राखला.

अनिरुद्ध पाटील/शौकत शेख ।डहाणू/बोर्डी : पालघर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत डहाणूत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जि.प. आणि पंचायत समिती या दोन्ही आघाडीवर लढताना दबदबा कायम राखत पहिला क्रमांक राखला. शिवसेनेचा आलेख चढता तर भाजप आणि माकपला अपेक्षेप्रमाणे यश राखता आले नाही. बहुजन विकास आघाडीला दोन्हीही ठिकाणी खातेही उघडता न आल्याने ती भुईसपाट झाली. तालुक्यातील गटाच्या तेरा जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप प्रत्येकी $४, शिवसेना ३, काँग्रेस १ आणि अपक्ष १ असे उमेदवार निवडून आले. तर २६ गणांसाठी राष्ट्रवादी ९, शिवसेना ८, भाजप ७ आणि माकपला २ जागेवर विजय मिळविता आला.जिल्हा परिषदेच्या डहाणू गटात यावेळी एका गटाची वाढ होऊन ही संख्या १३ झाली. मागील निवडणुकीत गटात १२ पैकी भाजपचे सर्वाधिक ५ उमेदवार निवडून आले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस, माकप आणि बहुजन विकास आघाडीचे प्रत्येकी २ तर काँग्रेसचा १ उमेदवार निवडून आला होता. चौदाव्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपला एकटे पाडून काँग्रेस, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी आणि माकपने आघाडी करून माकपच्या आमदाराला निवडून आणले. महाआघाडीची ही खेळी राष्ट्रवादीने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून लढवित असल्याचा प्रत्यय या निवडणुकीत देत गटाच्या ४ आणि गणाच्या २६ पैकी सर्वाधिक ९ जागा निवडून आणल्या. हा केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचा विजय असून माकपने सहकार्य न करता विरुद्ध मतदान केले, तर काही ठिकाणी उमेदवार उभे करून एक प्रकारे बिघाडी केल्याची प्रतिक्रिया या जिल्हा परिषद सदस्य आणि सायवन गटाचे विजयी उमेदवार काशिनाथ चौधरी यांनी दिली.विधानसभा निवडणुकीप्रमाणेच भाजपची पकड यावेळीही ओसरताना दिसली. गतवेळेला त्यांच्या गटाच्या ५ जागा होत्या. आता गटात एकाने आणि गणात तीन जागांची घट झाली. काँग्रेसला पूर्वीसारखेच गटाकरिता एकच उमेदवार निवडता आला तर गणासाठी आताही खाते उघडता आले नाही. बहुजन विकास आघाडीला दोन्ही प्रकारात एकही उमेदवार निवडून आणता आला नाही. मागच्या निवडणुकीत गटातील २ आणि गणाच्या ४ जागा निवडून आणताना पंचायत समितीचे दुसऱ्या टर्मचे उपसभापती शैलेश करमोडा यांच्या रुपाने मिळवले होते. करमोडा यांनी जिल्हा परिषदेच्या ओसरविरा गटातून विजेतेपद मिळविले. माकपला अती आत्मविश्वास भोवताना दिसला. आमदारकी जिंकली असली तरी जिल्हा परिषदेची एकही जागा जिंकता आली नसून पंचायत समितीच्या मागच्या वेळेप्रमाणेच २ जागा राखता आल्या.दरम्यान, शिवसेनेचा चढता आलेख पहायला मिळाला. गेल्या निवडणुकीत जिल्हा परिषदेची एकही जागा त्यांच्या नावावर नव्हती तर पंचायत समितीच्या २ जागा होत्या. यावेळी गटाच्या ३ आणि गणाच्या ८ जागा निवडून आणत दुसºया क्र मांकाचा पक्ष ठरला आहे. धामणगाव गटात सतीश सीताराम करबट हा एकमेव उमेदवार निवडून आला.