शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
4
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
5
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
6
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
7
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
8
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
9
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
10
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
11
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
12
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
13
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
14
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
15
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
16
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
17
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
18
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
19
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
Daily Top 2Weekly Top 5

डहाणू-नाशिक ट्रेनची गरज असताना बुलेट ट्रेन कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 00:02 IST

उद्धव ठाकरे यांचा सवाल : वनगांच्या कुटुंबाला भाजपाने वाऱ्यावर सोडले

विक्रमगड : पालघर जिल्ह्यातील आदिवासींचा विकास करणाºया कल्याण-डहाणू-नाशिक रेल्वेची गरज असताना बुलेट ट्रेनचा हट्ट कशासाठी, असा संतप्त सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी येथील प्रचारसभेत केला.ज्या चिंतामण वनगा यांनी आयुष्यभर निष्ठेने भाजपा वाढविण्याचे काम केले, पालघरमध्ये मोठ्या प्रमाणात भाजपा वाढवली त्या वनगांच्या कुटुंबाला भाजपाने वाºयावर सोडले. त्यामुळे त्यांच्या अश्रूंना न्याय देण्यासाठी शिवसेना मैदानात उतरली आहे. आम्ही कुणाच्याही पाठीत वार केला नाही. भाजपाने वनगांच्या कुटुंबीयांपैकी कोणालाही तिकीट दिले असते तर आज मी युतीच्या प्रचारासाठी विक्रमगडमध्ये आलो असतो आणि तिला मोठ्या फरकाने निवडूनही आणले असते. त्यामुळे शिवसेनेवर कुणी बिनबुडाचे आरोप करू नये, असा टोला त्यांनी भाजपाला लगावला.या वेळी बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, खासदार राजन विचारे, आमदार शांताराम मोरे, उदय सावंत, उपजिल्हाप्रमुख राजाभाई जाधव, तालुकाप्रमुख सागर आळशी, उपतालुकाप्रमुख प्रमोद आळशी यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या सभेत भाजपा आणि इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला.फाफडा खायला गुजरातला जायचे आहे का?फाफडा खायला तुम्हाला गुजरातला जायचे आहे का... त्यापेक्षा आपली झुणका भाकर चांगली असेही ते म्हणाले. कर्नाटकच्या राजकारणाला हात घालत राज्यपालांवर तोफ डागत वाल्याचा वाल्मिकी झालाच नाही, असा उपरोधिक टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी कर्नाटकच्या राज्यपालांना लगावला.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनShiv Senaशिवसेना