शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

डहाणू किनारा चार तास अंधारात, असह्य उकाड्याने नागरिकांची वैतागवाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 02:57 IST

वाढत्या उष्म्यामुळे अंगाची लाहीलाही झाली असतांनाच शनिवारी (२ जून) पावणे आठ वाजताच्या सुमारास विजेचा कडकडाटासह वादळी वारे सुरू झाल्याने नेहमीप्रमाणे बोईसर येथील १३२ के.व्ही. मध्ये तांत्रिक बिघाड होऊन वीज पूरवठा खंडीत झाल्याने डहाणूच्या सागरी किनारपट्टीवरील गावे अंधारात बूडाले होते.

डहाणू : वाढत्या उष्म्यामुळे अंगाची लाहीलाही झाली असतांनाच शनिवारी (२ जून) पावणे आठ वाजताच्या सुमारास विजेचा कडकडाटासह वादळी वारे सुरू झाल्याने नेहमीप्रमाणे बोईसर येथील १३२ के.व्ही. मध्ये तांत्रिक बिघाड होऊन वीज पूरवठा खंडीत झाल्याने डहाणूच्या सागरी किनारपट्टीवरील गावे अंधारात बूडाले होते. त्यामुळे असहय उकाडयाने हैराण झालेल्या ग्रामस्थांना तब्बल चार तास रस्त्यावर काढण्याची वेळ आली.मान्सून पूर्व पावसाच्या सरींमुळे महावितरणाचा कारभार उघड्यावर पडला. यंदा ९७ टक्के पाऊस असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून जून-जुलैमध्ये पावसाचे प्रमाण जास्त असणार असल्याने येथील नागरिकांना पावसाळ्याच्या काळात कायम अंधारात राहवे लागणार का असा प्रश्न विचारला जात आहे.विशेष म्हणजे या परिसरामध्ये महावितरण कंपनीच्या प्रशासनामार्फत दर शुक्रवारी दिवसभर वीज पुरवठा खंडीत केला जातो. असे असताना दुसऱ्या दिवशी लगेचच वीज पुरवठा खंडीत होत असल्याने अदल्या दिवशी काय दुरुस्ती केली असा प्रश्न गावकºयांकडून विचारला जात आहे.डहाणूच्या पश्चिम किनारपट्टीवरील चिंचणी, वानगांव, वरोर, फिडर अंतर्गत चाळीस ते पन्नास गाव तसेच त्यांना जोडून असणारे पाडे येत असल्याने विजेचा लंपडाव त्रास दायक वाटत आहे. महावितरण कंपनी ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बील पाठवते या बाबत आतपर्यंत अनेक तक्रारी झाल्या आहेत. त्यातच सेवा देताना कंपनी अपयशी ठरत आहे.दरवर्षी पावसाळयाच्या काळात येथे विजेचा लपंडाव असतो. या भागामध्ये झपाटयाने वाढत असलेल्या लोकसंख्येचे प्रमाण पाहता येथे वीजेचा खांब, ट्रान्सफार्म, वीज वाहिन्या बदण्याची आवश्यकता असतांना तो बदल व दुरुस्त्या होत नसल्याने वारंवार वीज पूरवठा खंडित होत आहे.शनिवारी मेघ गर्जनेसह वादळी वारे सुरू झाले. मात्र, पावसाचा थेंब ही या परिसरातील गावांत पडला नसला तरी बोईसर येथे बिघाड होऊन चार तास नागरिकांना अंधारात राहावे लागले. या बाबत अनेकांनी दुरध्वनी करुन माहिती घेतली असता त्यांना कुणीही निटसे उत्तर दिले नाहीदरम्यान नुकत्याच पार पडलेल्या पालघर लोकसभा पोट निवडणूकीत विजयी झालेले नवनिर्वाचित खासदार राजेंद्र गावित यांनी चार वर्षापूर्वी येथील वीजेची समस्या सोडवून हा परिसर भारनियमन मुक्त केला होता. त्यामुळे त्यांनी शासन दरबारी येथील वीजेचा प्रश्न सेडवून डहाणूच्या सागरी किनारपट्टीवरील चाळीस ते पन्नास गावांत चोवीस तास वीज पूरवठा सुरळीत होईल या साठी प्रयत्न करण्याची मागणी येथील नागरिकांनी एका निवेदनाव्दारे केली होती.विजेचा खांब पडल्याने १७५ गावे रात्रभर अंधारातमनोर : संध्याकाळी वादळी वाºयामुळे टेन नाका येथे विजेचा खांब वाकून पुरवठा खंडीत झाला. त्यामुळे १७५ गाव पाडे रात्रभर अंधारात राहिले. या प्रकारामुळे वयोवृद्ध व लहान मुलांचे प्रचंड हाल झाले. महावितरणच्या ढिसाळ कारभारामूळे मनोर टेन, करलगाव, पोचाड,े दुर्वेस, सवरे, एमबुर, भोपोली, केव येथील विजेचे खांब गंजलेले आहेत.या प्रकरणी येथील अनेक गावातील गावकरी व सरपंच यांनी लेखी तक्रार करुनही महावितरणकडून साधी दखलही घेण्यात आलेली नाही. अनक वायर लोंबलेल्या आहेत.शनिवारी झालेल्या मान्सून पूर्व पावसामुळे वाडा-मनोर मार्गावरील दोन खांब वाकल्याने वायर्स लोबकळत होत्या. सुदैवाने त्याचा स्पर्श कुणासही न झाल्याने अपघात टळला. या वाहिन्यावर येथील शेकडो गावातील वीज पुरवठा आधारीत असल्याने महावितरण टिकेचे धनी झाले. येथील अस्लम शेख यानंी लोकांना जागृत केल्याने अपघात टळला.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार