शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

डहाणू किनारा चार तास अंधारात, असह्य उकाड्याने नागरिकांची वैतागवाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 02:57 IST

वाढत्या उष्म्यामुळे अंगाची लाहीलाही झाली असतांनाच शनिवारी (२ जून) पावणे आठ वाजताच्या सुमारास विजेचा कडकडाटासह वादळी वारे सुरू झाल्याने नेहमीप्रमाणे बोईसर येथील १३२ के.व्ही. मध्ये तांत्रिक बिघाड होऊन वीज पूरवठा खंडीत झाल्याने डहाणूच्या सागरी किनारपट्टीवरील गावे अंधारात बूडाले होते.

डहाणू : वाढत्या उष्म्यामुळे अंगाची लाहीलाही झाली असतांनाच शनिवारी (२ जून) पावणे आठ वाजताच्या सुमारास विजेचा कडकडाटासह वादळी वारे सुरू झाल्याने नेहमीप्रमाणे बोईसर येथील १३२ के.व्ही. मध्ये तांत्रिक बिघाड होऊन वीज पूरवठा खंडीत झाल्याने डहाणूच्या सागरी किनारपट्टीवरील गावे अंधारात बूडाले होते. त्यामुळे असहय उकाडयाने हैराण झालेल्या ग्रामस्थांना तब्बल चार तास रस्त्यावर काढण्याची वेळ आली.मान्सून पूर्व पावसाच्या सरींमुळे महावितरणाचा कारभार उघड्यावर पडला. यंदा ९७ टक्के पाऊस असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून जून-जुलैमध्ये पावसाचे प्रमाण जास्त असणार असल्याने येथील नागरिकांना पावसाळ्याच्या काळात कायम अंधारात राहवे लागणार का असा प्रश्न विचारला जात आहे.विशेष म्हणजे या परिसरामध्ये महावितरण कंपनीच्या प्रशासनामार्फत दर शुक्रवारी दिवसभर वीज पुरवठा खंडीत केला जातो. असे असताना दुसऱ्या दिवशी लगेचच वीज पुरवठा खंडीत होत असल्याने अदल्या दिवशी काय दुरुस्ती केली असा प्रश्न गावकºयांकडून विचारला जात आहे.डहाणूच्या पश्चिम किनारपट्टीवरील चिंचणी, वानगांव, वरोर, फिडर अंतर्गत चाळीस ते पन्नास गाव तसेच त्यांना जोडून असणारे पाडे येत असल्याने विजेचा लंपडाव त्रास दायक वाटत आहे. महावितरण कंपनी ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बील पाठवते या बाबत आतपर्यंत अनेक तक्रारी झाल्या आहेत. त्यातच सेवा देताना कंपनी अपयशी ठरत आहे.दरवर्षी पावसाळयाच्या काळात येथे विजेचा लपंडाव असतो. या भागामध्ये झपाटयाने वाढत असलेल्या लोकसंख्येचे प्रमाण पाहता येथे वीजेचा खांब, ट्रान्सफार्म, वीज वाहिन्या बदण्याची आवश्यकता असतांना तो बदल व दुरुस्त्या होत नसल्याने वारंवार वीज पूरवठा खंडित होत आहे.शनिवारी मेघ गर्जनेसह वादळी वारे सुरू झाले. मात्र, पावसाचा थेंब ही या परिसरातील गावांत पडला नसला तरी बोईसर येथे बिघाड होऊन चार तास नागरिकांना अंधारात राहावे लागले. या बाबत अनेकांनी दुरध्वनी करुन माहिती घेतली असता त्यांना कुणीही निटसे उत्तर दिले नाहीदरम्यान नुकत्याच पार पडलेल्या पालघर लोकसभा पोट निवडणूकीत विजयी झालेले नवनिर्वाचित खासदार राजेंद्र गावित यांनी चार वर्षापूर्वी येथील वीजेची समस्या सोडवून हा परिसर भारनियमन मुक्त केला होता. त्यामुळे त्यांनी शासन दरबारी येथील वीजेचा प्रश्न सेडवून डहाणूच्या सागरी किनारपट्टीवरील चाळीस ते पन्नास गावांत चोवीस तास वीज पूरवठा सुरळीत होईल या साठी प्रयत्न करण्याची मागणी येथील नागरिकांनी एका निवेदनाव्दारे केली होती.विजेचा खांब पडल्याने १७५ गावे रात्रभर अंधारातमनोर : संध्याकाळी वादळी वाºयामुळे टेन नाका येथे विजेचा खांब वाकून पुरवठा खंडीत झाला. त्यामुळे १७५ गाव पाडे रात्रभर अंधारात राहिले. या प्रकारामुळे वयोवृद्ध व लहान मुलांचे प्रचंड हाल झाले. महावितरणच्या ढिसाळ कारभारामूळे मनोर टेन, करलगाव, पोचाड,े दुर्वेस, सवरे, एमबुर, भोपोली, केव येथील विजेचे खांब गंजलेले आहेत.या प्रकरणी येथील अनेक गावातील गावकरी व सरपंच यांनी लेखी तक्रार करुनही महावितरणकडून साधी दखलही घेण्यात आलेली नाही. अनक वायर लोंबलेल्या आहेत.शनिवारी झालेल्या मान्सून पूर्व पावसामुळे वाडा-मनोर मार्गावरील दोन खांब वाकल्याने वायर्स लोबकळत होत्या. सुदैवाने त्याचा स्पर्श कुणासही न झाल्याने अपघात टळला. या वाहिन्यावर येथील शेकडो गावातील वीज पुरवठा आधारीत असल्याने महावितरण टिकेचे धनी झाले. येथील अस्लम शेख यानंी लोकांना जागृत केल्याने अपघात टळला.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार