शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

आंदोलनामुळे डहाणू - बोर्डी प्रमुख राज्यमार्ग ठप्प, नागरिकांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 00:32 IST

स्थानिक शेतकरी, मजूर, युवक, विद्यार्थी आणि महिला यांचे विविध प्रश्न आणि मागण्या गतवर्षीच्या ठिय्या आंदोलनाद्वारे मांडल्यानंतर चर्चेद्वारे सोडविण्याचे आश्वासन स्थानिक प्रशासनाने पूर्ण न केल्याने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने सोमवार, २५ ते २६ नोव्हेंबर रोजी प्रांत कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले.

डहाणू/बोर्डी  - स्थानिक शेतकरी, मजूर, युवक, विद्यार्थी आणि महिला यांचे विविध प्रश्न आणि मागण्या गतवर्षीच्या ठिय्या आंदोलनाद्वारे मांडल्यानंतर चर्चेद्वारे सोडविण्याचे आश्वासन स्थानिक प्रशासनाने पूर्ण न केल्याने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने सोमवार, २५ ते २६ नोव्हेंबर रोजी प्रांत कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. डहाणू बोर्डी प्रमुख राज्य मार्गावर हजारो आंदोलक बसल्याने चोवीस तासांपेक्षा अधिक काळ हा मार्ग बंद राहून नागरिकांचे हाल झाले. दरम्यान, संबंधित खात्याने प्रलंबित मागण्यांसंदर्भात लेखी आश्वासन देण्याचे ठरल्यानंतर तसेच महसूल, वन, आरोग्य, वीज वितरण कंपनी, शिक्षण या खात्यांनी तशी हमी पत्रे, तहसीलदार राहूल सारंग यांच्या उपस्थितीत दिल्याने अखेर मंगळवारी दुपारी माकपने बेमुदत आंदोलन मागे घेतले.गतवर्षी २२ नोव्हेंबर रोजी या पक्षातर्फे प्रांतअधिकारी कार्यालयाबाहेर विविध प्रश्न सोडवण्यासाठी या पक्षाने ठिय्या आंदोलन केले होते. यावेळी स्थानिक प्रशासनाने आंदोलकांशी चर्चा करून विविध मुद्दे आणि समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. मात्र, वर्ष उलटूनही त्याची पूर्तता न झाल्याने आंदोलकांमध्ये असंतोष वाढला. अखेर २५ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता पारनाका ते प्रांत कार्यालय या दरम्यान सुमारे १० हजार आंदोलक धडकले. स्थानिक प्रशासनाने मागण्या मान्य करण्याचे पुन्हा तोंडी आश्वासन दिले. वेळ मारून नेण्याची ही खेळी असल्याने त्याला बळी न पडता लेखी आश्वासन दिल्याशिवाय बेमुदत हे आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला.त्यानंतर मागणी करूनही प्रांत कार्यालयाबाहेरील आवारात बसण्यास प्रशासनाने नकार कळविल्याने नाईलाजास्तव रस्त्यावर बसावे लागले. त्याला प्रशासन जबाबदार असून त्यांच्यामुळेच वाहतूक ठप्प होऊन सुमारे चोवीस तासांपेक्षा अधिक नागरिकांना त्रास सोसावा लागल्याचे किसान सभेचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत घोरखाना यांनी सांगितले. मंगळवारी आंदोलन अधिक आक्रमक झाल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त अधिक तैनात करण्यात आला होता. तसेच आरपीएफची तुकडीही तैनात करण्यात आली होती. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.दरम्यान, डहाणू शहरातून बोर्डी मार्गे गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांवर परिणाम जाणवला तर या मार्गावर पारनाका येथून उत्तरेला दोन कि.मी. अंतरावर उप जिल्हा रुग्णालय असून तेथे जाणाºया रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना त्रास सोसावा लागला असला तरी रु ग्णवाहिकेला रस्ता खुला करून देण्यात आला. डहाणू बस आगाराने तातडीने आगर गावातील पर्यायी मार्गाचे तत्काळ सर्व्हेक्षण करून डहाणू - बोर्डी फेºया त्या अंतर्गत मार्गाने सुरू करून प्रवाशांना दिलासा दिला. मंगळवारी दुपारी चार वाजल्यानंतर लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेतले आणि प्रमुख राज्य मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली. आॅटो रिक्षा व्यावसायिकांचे तसेच हिवाळी पर्यटनाकरिता बोर्डी पर्यटनस्थळी आलेल्या पर्यटकांचे हाल झाले. शिवाय आगर येथील प्रसिद्ध मच्छीबाजारावरही परिणाम दिसून आला.पारनाका मार्गावरून जाणा-या २० बस फे-या आगर गावातील पर्यायी मार्गावर वाळविल्याने प्रवाशांना त्यामुळे दिलासा मिळाला.-अनिल बेहेरे (डहाणू बस आगार व्यवस्थापक)या ठिय्या आंदोलनाकरिता प्रांत कार्यालयाच्या आवारातील जागा आंदोलकांना बसण्याकरिता देण्याची विनंती केली होती. मात्र प्रशासनाकडून ती ठोकरण्यात आली. त्यामुळेच नाईलाजास्तव रस्त्यावर बसावे लागून नागरिकांना त्रास झाला. त्याला प्रशासनच जबाबदार आहे.- चंद्रकांत घोरखाना, किसान सभा अध्यक्ष,डहाणू तालुका

टॅग्स :Vasai Virarवसई विरार