शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

कॉरिडॉरचा मार्ग आता उन्नत, वस्तीवर वरवंटा फिरणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 00:31 IST

विरार-आलिबाग कॉरिडॉरमुळे येथील औद्योगिक वसाहतीवर विस्थापित होण्याचे ढग आता निवळले असून, रेल्वेच्या बहुचर्चित विरार-आलिबाग कॉरिडॉरचा मार्ग आता बदलण्यात आला आहे.

वसई : विरार-आलिबाग कॉरिडॉरमुळे येथील औद्योगिक वसाहतीवर विस्थापित होण्याचे ढग आता निवळले असून, रेल्वेच्या बहुचर्चित विरार-आलिबाग कॉरिडॉरचा मार्ग आता बदलण्यात आला आहे. रेल्वेने पहिला नकाशा चुकीचा असल्याचे मान्य करून सुधारित नकाशा सादर केलाय नवीन नकाशानुसार हा कॉरिडॉर उन्नत मार्गाने जाणार असून एकही औद्योगिक कंपनी आणि निवासी घर विस्थापित होणार नाही. यामुळे वसईच्या औद्योगिक क्षेत्रात कमालीचा आनंद पसरला आहे.रेल्वे तर्फेविरार ते पनवेल दरम्यान १२६ किलोमीटरचा कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची किंमत सुमारे ७ हजार कोटी असून तो २०२२-२३ पर्यंत पूर्ण केला जाणार आहे. मात्र, या प्रकल्पाचा ९ किलोमीटरचा मार्ग वसई पूर्वेतून जाणार आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने या मार्गाचा नकाशा सादर करताना वसई पूर्वेतील भूमापन क्र मांक ३७ मधून हा मार्ग जाणार असल्याचे दाखवले होते. हा संपूर्ण पट्टा औद्योगिक क्षेत्राचा आहे. त्यामुळे येथील ७० टक्के उद्योग धंदे विस्थापित होण्याची भीती व्यक्त होत होती. या विरोधात तीव्र आंदोलन उभे राहू लागले होते. औद्योगिक वसाहतीत २५०० छोटे-मोठे उद्योग धंदे व ५०,००० कामगार काम करीत आहेत.शिवसेनेने या प्रकरणी आवाज उठवला होता. तसेच, आमदार हितेंद्र ठाकूर यांनीही प्रांताधिकारी दीपक क्षीरसागर यांना निवेदन देत औद्योगिक वसाहतीवर वरवंटा फिरवून हा प्रकल्प उभारू नये, म्हणून विनंती केली होती. वाढता जनक्षोभ पाहून वसईचे प्रांताधिकाऱ्यांनी सर्वेक्षणाच्या कामास तात्पुरती स्थगिती दिली होती. अखेर मुंबई रेल्वे विकास महामंडळास ही चूक लक्षात आल्यावर त्यांनी सुधारित नकाशा सादर केला आहे.>अशी जाणार मार्गिका: नवीन नकाशानुसार मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे उपमुख्य अभियंता खैरातीलाल पांचूराम मीना यांनी दिलेल्या माहितीनुसार विरार-पनवेल कॉरिडॉर भूमापन क्र मांक २४, २७ (ब), ६३ (अ), ३३, ३८ अ, ३३ आणि ३२ तसेच रेल्वेच्याच जागेतून जाणार आहे. हे सर्व भूमापन क्र मांक अवघ्या काही गुंठ्यांचे आहेत.>औद्योगिक वसाहतीत कमालीचा उत्साहविरार आलिबाग कॉरिडॉर आपल्या मार्गातून जाणार नसल्याचे समजताच वसईच्या औद्योगिक क्षेत्रात जल्लोष करण्यात आला. मिठाई वाटण्यात आली. विस्थापित होण्याची टांगती तलवार जी डोक्यावर होती, ती निघून गेल्याचे उद्योजकांनी सांगितले. आमची औद्योगिक वसाहत यापुढे सुरळीत राहणार आहे, असे वसई इंडस्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष अनिल अंबर्डेकर यांनी सांगितले. प्रकल्प राबविताना यापुढे शासनाने स्थानिकांचे हित लक्षात घेऊन आणि चर्चा करून निर्णय घ्यायला हवे, असेही त्यांनी सांगितले.