शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
2
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
3
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
4
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
5
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
6
जगन्नाथ रथयात्रा: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
7
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
8
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
9
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना
10
जाम घाबरलेला रोहित शर्मा; किंग कोहलीच्या रुपात देवच पावला! टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील खास किस्सा
11
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
12
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
13
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
14
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
15
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
16
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
17
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
18
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
19
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
20
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!

कॉरिडॉरचा मार्ग आता उन्नत, वस्तीवर वरवंटा फिरणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 00:31 IST

विरार-आलिबाग कॉरिडॉरमुळे येथील औद्योगिक वसाहतीवर विस्थापित होण्याचे ढग आता निवळले असून, रेल्वेच्या बहुचर्चित विरार-आलिबाग कॉरिडॉरचा मार्ग आता बदलण्यात आला आहे.

वसई : विरार-आलिबाग कॉरिडॉरमुळे येथील औद्योगिक वसाहतीवर विस्थापित होण्याचे ढग आता निवळले असून, रेल्वेच्या बहुचर्चित विरार-आलिबाग कॉरिडॉरचा मार्ग आता बदलण्यात आला आहे. रेल्वेने पहिला नकाशा चुकीचा असल्याचे मान्य करून सुधारित नकाशा सादर केलाय नवीन नकाशानुसार हा कॉरिडॉर उन्नत मार्गाने जाणार असून एकही औद्योगिक कंपनी आणि निवासी घर विस्थापित होणार नाही. यामुळे वसईच्या औद्योगिक क्षेत्रात कमालीचा आनंद पसरला आहे.रेल्वे तर्फेविरार ते पनवेल दरम्यान १२६ किलोमीटरचा कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची किंमत सुमारे ७ हजार कोटी असून तो २०२२-२३ पर्यंत पूर्ण केला जाणार आहे. मात्र, या प्रकल्पाचा ९ किलोमीटरचा मार्ग वसई पूर्वेतून जाणार आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने या मार्गाचा नकाशा सादर करताना वसई पूर्वेतील भूमापन क्र मांक ३७ मधून हा मार्ग जाणार असल्याचे दाखवले होते. हा संपूर्ण पट्टा औद्योगिक क्षेत्राचा आहे. त्यामुळे येथील ७० टक्के उद्योग धंदे विस्थापित होण्याची भीती व्यक्त होत होती. या विरोधात तीव्र आंदोलन उभे राहू लागले होते. औद्योगिक वसाहतीत २५०० छोटे-मोठे उद्योग धंदे व ५०,००० कामगार काम करीत आहेत.शिवसेनेने या प्रकरणी आवाज उठवला होता. तसेच, आमदार हितेंद्र ठाकूर यांनीही प्रांताधिकारी दीपक क्षीरसागर यांना निवेदन देत औद्योगिक वसाहतीवर वरवंटा फिरवून हा प्रकल्प उभारू नये, म्हणून विनंती केली होती. वाढता जनक्षोभ पाहून वसईचे प्रांताधिकाऱ्यांनी सर्वेक्षणाच्या कामास तात्पुरती स्थगिती दिली होती. अखेर मुंबई रेल्वे विकास महामंडळास ही चूक लक्षात आल्यावर त्यांनी सुधारित नकाशा सादर केला आहे.>अशी जाणार मार्गिका: नवीन नकाशानुसार मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे उपमुख्य अभियंता खैरातीलाल पांचूराम मीना यांनी दिलेल्या माहितीनुसार विरार-पनवेल कॉरिडॉर भूमापन क्र मांक २४, २७ (ब), ६३ (अ), ३३, ३८ अ, ३३ आणि ३२ तसेच रेल्वेच्याच जागेतून जाणार आहे. हे सर्व भूमापन क्र मांक अवघ्या काही गुंठ्यांचे आहेत.>औद्योगिक वसाहतीत कमालीचा उत्साहविरार आलिबाग कॉरिडॉर आपल्या मार्गातून जाणार नसल्याचे समजताच वसईच्या औद्योगिक क्षेत्रात जल्लोष करण्यात आला. मिठाई वाटण्यात आली. विस्थापित होण्याची टांगती तलवार जी डोक्यावर होती, ती निघून गेल्याचे उद्योजकांनी सांगितले. आमची औद्योगिक वसाहत यापुढे सुरळीत राहणार आहे, असे वसई इंडस्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष अनिल अंबर्डेकर यांनी सांगितले. प्रकल्प राबविताना यापुढे शासनाने स्थानिकांचे हित लक्षात घेऊन आणि चर्चा करून निर्णय घ्यायला हवे, असेही त्यांनी सांगितले.