शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

Coronavirus : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचे पालन करणार, आर्च बिशप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 01:07 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालघर जिल्हाधिकारी तथा वसई-विरार महापालिकेचे प्रभारी आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केलेल्या आवाहनानुसार जवळपास सर्वच प्रार्थनास्थळे बंद करण्यात आली आहेत.

वसई : गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालघर जिल्हाधिकारी तथा वसई-विरार महापालिकेचे प्रभारी आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केलेल्या आवाहनानुसार जवळपास सर्वच प्रार्थनास्थळे बंद करण्यात आली आहेत. कोरोना या जीवघेण्या विषाणूची लागण शहरवासीयांना होऊ नये याकरिता पालघर जिल्हाधिकारी तथा आयुक्तांमार्फत राज्य शासनाच्या निर्णयाचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. यासाठी जनतेनेदेखील या विषाणूचा प्रादुर्भाव आपणांस होऊ नये, याकरिता सहकार्य करा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा असे जाहीर आवाहन केले आहे.वसई-विरार शहर परिसरातील सर्व चर्च खुले राहणार असल्याची बातमी काही वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. याबाबत पालघर जिल्हाधिकारी तथा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यानी वसईचे आर्च बिशप डॉ. फिलिक्स मच्याडो यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असून कोरोना विषाणूबाबत शासन करीत असलेल्या उपाययोजना व शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणीबाबतची माहिती त्यांनी दिली. त्यानुसार राज्य शासनाच्या व पालघर जिल्हाधिकारी यांनी वेळोवेळी जारी केलेल्या आदेशांचे तंतोतंत पालन व सहकार्य करणार असल्याचे आश्वासन डॉ. फिलिक्स मच्याडो, आर्च बिशप, वसई यांनी जिल्हाधिकारी तथा आयुक्त यांना दिल्याची माहिती महापौरांच्या स्विय सचिव दिगंबर पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.येत्या ४ एप्रिलपर्यंत होणार नाहीत प्रार्थनाशुक्रवारी मध्यरात्रीपासून ते येत्या ४ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत वसई परिसरातील कोणत्याही चर्चमध्ये प्रार्थना होणार नाहीत, असेही आर्च बिशप यांनी प्रसारित केलेल्या प्रसिद्धी पत्राद्वारे व व्हिडीओमध्ये म्हटले आहे. भाविकांनी यादरम्यान घरीच प्रार्थना करा, स्वत:चे रक्षण करा, असा संदेश देखील आर्च बिशप डॉ. मच्याडो यांनी दिला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसVasai Virarवसई विरार