शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

coronavirus: संसर्ग पसरवणाऱ्यांना कोण आवरणार? कोरोना वाटत फिरणाऱ्यांविषयी चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 02:37 IST

वसई-विरारसह पालघर जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. प्रशासनानेही कोरोनाला रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू केले आहेत.

- जगदीश भोवडपालघर : वसई-विरारसह पालघर जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. प्रशासनानेही कोरोनाला रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू केले आहेत. सरकारने निर्बंध जारी केलेले आहेत, तरीही अनेक लोक विनामास्क बाजारांत, रेल्वे प्रवासांत फिरताना दिसत असल्याने आणि त्यातीलच कुणी बाधित झाला तर त्याला तो आजारी पडत नाही तोपर्यंत माहिती पडत नाही; मात्र तोपर्यंत त्याने अनेकांना कोरोनाची भेट दिलेली असते. ही बाब लक्षात घेता प्रशासनाने विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे. पालघर जिल्ह्यामध्ये  १ ते २८ मार्चदरम्यान ३ हजार ६७७ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून, या कालावधीमध्ये १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी सांगितले. दरम्यान, पालघर ग्रामीण भागात बुधवारी ११४, तर वसई-विरार महापालिका हद्दीमध्ये  २१९ रुग्ण सापडले. यामुळे चिंता व्यक्त होत आहे. पालघर जिल्ह्यामध्ये आजवर बाधित रुग्णांचा आकडा ५० हजारपेक्षा अधिक झालेला आहे, तर बाराशेहून अधिक जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. दिवसेंदिवस वाढणारा आकडा पाहता नागरिकांनी स्वत:ची आणि आपल्या कुटुंबीयांची काळजी घेण्याची गरज आहे; परंतु तरीही अनेक लोक बेफिकीरी दाखवत असल्याचे दिसून येत आहे. अशा लोकांवर प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी अपेक्षा नियम पाळणाऱ्या नागरिकांकडून केली जात आहे. बाधित झालेली व्यक्ती ही मध्यंतरीच्या काळात अनेकांना भेटलेली असते. त्यामुळे त्या व्यक्तीच्या कुटुंबातील लोक तसेच मित्रमंडळी यांनाही कोरोनाची बाधा होण्याचा धोका असतो. यामुळे कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.  लोकलमध्ये वाढताहेत विनामास्क प्रवासी पालघर जिल्ह्यातील बरेच लोक मुंबई तसेच ठाणे येथे नोकरी-धंद्यानिमित्त जात-येत असतात. त्यांचे प्रवासाचे साधन लोकल रेल्वे तसेच एसटी बसेस हेच आहे. त्याचप्रमाणे काही लोक स्वत:च्या वाहनांद्वारे प्रवास करीत असतात; परंतु लोकल प्रवासामध्ये बहुसंख्य लोक कोरोना नियमांचे पालन करताना आढळत नाहीत. बरेच लोक मास्क हनुवटीच्या खाली ठेवून बसलेले असतात. त्यांना नियम पाळणारे काही प्रवासी मास्क वापरण्यास सांगतात, तेव्हा हमरीतुमरीचे प्रकारही घडताना दिसत आहेत. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस