शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
4
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
5
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
6
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
7
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
8
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
9
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
10
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
11
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
12
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
13
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
14
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
15
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
16
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
17
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
18
घोडबंदर मार्गावर रस्त्यांची कामं सुरू; मुंबईत जाताना ठाण्यात वाहतूककाेंडीची ‘शिक्षा’
19
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
20
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?

Coronavirus: दुसऱ्या लाटेच्या भीतीने ट्रॅव्हल्सचे चाक पंक्चर?; मालक-चालकांमध्ये चिंता, व्यवसाय बुडण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 00:30 IST

कोरोनामुळे ट्रॅव्हल्सच्या वाहनांची चाके रुतली होती. एक पैशाचेही उत्पन्न मिळाले नाही, उलट खर्चाचा भार अधिक होत गेला. कर्जावर घेतलेल्या गाड्यांचे हप्ते थकले आहेत

सुनील घरत पारोळ : कोरोना काळात काही महिने बंद असलेला पर्यटन व्यवसाय काही प्रमाणात सुरू झाला. लोकही बाहेर पडू लागले. यामुळे आपले चाक आता रुळावर आले असे ट्रॅव्हल व्यावसायिकांनाही वाटू लागले. बंद असलेला व्यवसाय पुन्हा सुरू झाल्याने ट्रॅव्हल्स कंपन्यांनी सर्व बसेस डागडुजी करून सज्ज केल्या; पण कोरोनाची दुसरी लाट आल्याने ट्रॅव्हल्सचे चाक पुन्हा पंक्चर होण्याच्या मार्गावर आहे.

कोरोनामुळे ट्रॅव्हल्सच्या वाहनांची चाके रुतली होती. एक पैशाचेही उत्पन्न मिळाले नाही, उलट खर्चाचा भार अधिक होत गेला. कर्जावर घेतलेल्या गाड्यांचे हप्ते थकले आहेत. बॅटऱ्या, टायर खराब झाल्याने दुरुस्तीचा खर्चही डोक्यावर बसला आहे. शिवाय या व्यवसायावर अवलंबून असलेले अनेक हात रिकामे झाले आहेत. टाळेबंदी उठावी, गाडी रस्त्यावर यावी, अशी अपेक्षा ट्रॅव्हल्स चालक-मालकांना आहे. २२ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाला. तेव्हापासून ३०० ट्रॅव्हल्सची चाके थांबली. चालक, वाहक, बुकिंग करणारे, प्रवाशांना आणणारे अशा व्यक्ती ट्रॅव्हल्सवर काम करतात. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह ट्रॅव्हल्सवरच होता. आता ही सर्व कुटुंबे अडचणीत आली आहेत. वसई, विरार, नालासोपारामध्ये २० ट्रॅव्हल्स चालक आहेत. त्यावर उदरनिर्वाह करणारी हजारो कुटुंबे आहेत. या ट्रॅव्हल्सची किंमत ४० ते ५० लाख आहे. काहींनी कर्ज घेऊन हा व्यवसाय सुरू केला आहे. कर्जाचा किमान मासिक हप्ता सव्वा लाख रुपये आहे. अनेक ट्रॅव्हल्स मालकांना कर्जाच्या हप्त्याची परतफेड करता आली नाही. वसुलीसाठी बँकांचा तगादा सुरू आहे. सध्या हा कर माफ केला आहे. ट्रॅव्हल्स सुरू झाल्यास नवीन कर भरावा लागेल. यासाठीही त्यांच्याकडे पैसा कमी पडणार आहे. 

गाडी रुळावर येत होती; पण...वसई, विरार, नालासोपारा, मनवेलपाडा येथून कोकणात जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची संख्या मोठी आहे. खास करून गणपती, शिमगोत्सव यावेळी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. मध्यंतरी कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर काही प्रमाणात ट्रॅव्हल्स सुरू झाल्याने गाडी रुळावर येत होती; पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या भीतीने व्यवसाय पुढे हा व्यवसाय चालवायचा की नाही, असा प्रश्न अनेकांसमोर उभा ठाकला आहे.

कोरोनामुळे हा व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. गाड्यांना भाडे मिळत नसल्याने बस खरेदी करताना घेतलेल्या कर्जाचे हप्ते कसे भरायचे, हा प्रश्न आहे. -  दिपेश घरत, ट्रॅव्हल व्यावसायिक 

भीतीने बसमधील प्रवास टाळून लोकं स्वत:च्या वाहनाने प्रवास करतात. कोरोना प्रादुर्भावात पर्यटन व्यवसाय उभारी घेत नसल्याने आता पुढे काय करायचे, हा प्रश्न आहे. - शैलेश मराठे, टूर्स व्यावसायिक, विरार 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस