शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोना उच्चाटनासाठी सरकारने काय करायला हवे? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 01:01 IST

वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर, विविध संघटनांचे पदाधिकारी, विविध घटकांच्या प्रतिनिधींनी कोरोना रोखण्यासंदर्भात सरकारला काही सूचना केल्या आहेत.

कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधत मुख्यमंत्र्यांनी त्यांची मते जाणून घेतली, अनेक उपाययाेजनांचा आढावा घेतला. त्यानंतर राज्य सरकारने कठोर निर्बंधांसह अंशतः लॉकडाऊन जाहीर केला. त्यानंतरही वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर, विविध संघटनांचे पदाधिकारी, विविध घटकांच्या प्रतिनिधींनी कोरोना रोखण्यासंदर्भात सरकारला काही सूचना केल्या आहेत. या मतांचा सरकार नक्की विचार करेल. या सूचनांचा संक्षिप्त आढावा...कायद्याचा बडगा उगारला पाहिजेलाॅकडाऊन हा शेवटचा पर्याय आहे. वाढलेली प्रचंड लोकसंख्या व दाटीवाटीत राहत असलेल्या लोकवस्त्या याचा प्रचंड ताण आरोग्य यंत्रणेवर पडून शासनाच्या उपाययोजना कमी पडत असल्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यासाठी सरसकट सर्वांना लस उपलब्ध करून लसीकरणाचा वेग वाढला पाहिजे व सर्वसामान्य नागरिकांमध्ये कोरोना महामारीविषयी जनजागृती केली पाहिजे. गर्दीच्या ठिकाणी कायद्याचा बडगा उगारला गेला पाहिजे. कोरोना नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली तरच यावर नियंत्रण मिळवता येईल. -ॲड. दीपक भोईर, वाडाकडक लॉकडाऊन लावला पाहिजेज्याप्रमाणे महाराष्ट्रात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे, ते पाहता लोकांनी शिस्त बाळगली नाही, तर महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्याशिवाय पर्याय दिसत नाही. शासनाने लोकांची वागणूक दोन-चार दिवस पाहावी. लॉकडाऊन एक किंवा दोन आठवडे केल्याने काही होणार नाही. कमीत कमी २८ दिवसांचा कडक लॉकडाऊन लागला पाहिजे. जेणेकरून रुग्णवाढीची ही सायकल तुटली तरच महिन्याभराने रुग्णसंख्या कमी होईल. लोक बेशिस्तपणे वागत आहेत. शासनाने २८ दिवसांच्या लॉकडाऊनसाठी समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून रोज किंवा गरीब लोकांच्या रेशनपाण्याची सुविधा केली पाहिजे. आज जगात कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने सर्वांना वॅक्सिनची गरज आहे. - डॉ. ओमप्रकाश दुबे, चेअरमन, मेडिकल कॉलेज, नालासोपारा हातावर पोट असणाऱ्यांना फटका लॉकडाऊन हा सामान्य माणसासाठी कठीण काळ ठरू शकतो. यामुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. यात हातावर पोट असणाऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. तरी प्रशासनाने कोरोनाबाबत कडक निर्बंध घालावे तसेच लसीकरणाचा वेग वाढवावा. ग्रामीण भागातही लसीकरणाबाबत जनजागृती करावी.- राजेंद्र पाटील, अध्यक्ष,ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.हलगर्जीपणा केला तर प्रादुर्भाव वाढेलकोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यायला हवी. कोरोना रोखण्यासाठी नागरिकांनी सामाजिक अंतर, मास्क, वापरावे. तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. लग्न व इतर समारंभासाठी दिलेल्या अटी आणि नियमांचे पालन नागरिकांनी करावे. जर आपण हलगर्जीपणा केला तर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यासाठी मदत होईल. लॉकडाऊन हा अंतिम पर्याय नसून यामुळे सामान्य माणसाला फटका बसण्याची शक्यता आहे. सामान्य नागरिकांचा विचार करून सरकारने योग्य पाऊल उचलावे.- राजेश पाटील, आमदार, बोईसरकडक निर्बंध लागू करावेत लॉकडाऊन पुन्हा झाले तर मनोर परिसरातील सर्वसामान्य  नागरिक व मोलमजुरी करणारा आदिवासी समाज यांच्यावर उपासमारीची वेळ येईल. त्यापेक्षा निर्बंध कडक करावे, हे चालेल. नियमांचा पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, पण लॉकडाऊन नको.- ॲड. तक्की चिखलेकर, मनोरसर्वांनी नियमांचे पालन करूयापहिले लॉकडाऊन झाले होते, त्याचा परिणाम अजून जनता भोगतेय. पुन्हा ती पाळी आली तर भयानक परिस्थिती निर्माण होईल. तसेच आपण स्वतः आपली काळजी घेतली पाहिजे. नियमांचे पालन केले तर पुन्हा ती वेळ येणार नाही हेसुद्धा तितके महत्त्वाचे आहे. कोरोनाचा आपण स्वतः सामना करूया. नियमांचे पालन करूया. - मेहर निगार बेग, अध्यक्ष, मनोर लेडीज ट्रस्ट, मनोरकोरोनाची दुसरी लाट भयावह देशात कोरोनाची दुसरी लाट भयावह होत आहे. चिंचणी तारापूर शिक्षण संस्थेने शैक्षणिक कार्याबरोबरच गेल्या एप्रिल-२०२० पासून अनेक प्रकारचे सहकार्य नागरिकांना केले आहे. हे सर्व टाळण्याचा त्यातला त्यात परिणामकारक मार्ग म्हणजे सार्वत्रिक लसीकरण होय. - रजनीकांतभाई श्रॉफ, चेअरमन, चिंचणी तारापूर एज्युकेशन सोसायटी चिंचणी, ता डहाणू.गोरगरिबांचा विचार करायला हवाराज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन होणार, असे समजते. परंतु, गेल्या वर्षभराच्या लाॅकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या लोकांची आर्थिक स्थिती दयनीय झाली आहे. पुन्हा लाॅकडाऊन झाल्यास आदिवासी तसेच सर्वसामान्य लोकांवर उपासमारीची वेळ ओढवेल. सरकारने गोरगरीब माणूस उपाशी राहणार नाही, याची खबरदारी घेऊन योग्य निर्णय घ्यावा.- कल्पेश धोडी, सरपंच, ग्रामपंचायत चिंचणी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या