शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

CoronaVirus News: नालासोपारात सामाजिक अंतराचे तीनतेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 01:01 IST

महानगरपालिकेची केवळ बघ्याची भूमिका : नागरिकांमध्ये बेफिकिरी कायम

नालासोपारा : मार्चपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने वसई-विरारमध्ये एन्ट्री घेत जनजीवन हादरवून सोडले आहे. रोजच्या रोज वाढणारे कोरोना रुग्णांचे आकडे पाहता राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. त्याचा परिणाम व्यवसाय आणि मानवी जीवनावर होत आहे. दुसरीकडे नालासोपारा-विरारमधील कोरोनाचा उद्रेक प्रचंड आहे, मात्र नागरिक कोरोनाला अजिबात गांभीर्याने वागत नसल्याने सामाजिक अंतराचे तीनतेरा उडत असून कोरोनाला आयतेच निमंत्रण मिळू लागले आहे.नालासोपारा पूर्व परिसरात तर सामाजिक अंतराचा पुरता फज्जा उडाल्याचे पाहायला मिळते. येथे भरणाऱ्या बाजारात नागरिकांची होणारी गर्दी कोरोनाच्या उद्रेकाला कारणीभूत ठरू शकते.वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील कोरोनाची स्थिती भयंकर झाली असून गुरुवारपर्यंतच्या आकडेवारीनुसार ४ हजार ४८२ रुग्ण उपचार घेत आहेत. मृतांचा आकडादेखील हळूहळू वाढू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र तरीही बहुसंख्य नागरिक बेफिकीरपणे वागत असल्याने चिंता वाढली आहे.मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाला मज्जाव करण्यासाठी कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडण्याची मुभा नव्हती. हळूहळू कोरोनाबाबतीतील भय नागरिकांमधून कमी होत गेल्याने कोरोनाला गांभीर्याने घेतले जात नाही. नालासोपाऱ्यात तर कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्यासारखेच नागरिक वागत आहेत. नालासोपाऱ्यातील सध्याची स्थिती अत्यंत भयावह आहे. नालासोपारा-विरार ही दोन्ही शहर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरली असताना नागरिक बेफिकीरपणे वागत असल्याने कोरोनाला निमंत्रण मिळत आहे.