शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

CoronaVirus News: मुंबईजवळच्या 'त्या' परिसरात कोरोनाची एंट्री; मिनी धारावीनं प्रशासनाची चिंता वाढवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 07:12 IST

वसई-विरारमधील ‘मिनी धारावी’ : हॉटस्पॉटमुळे नागरिकांमध्ये भीती

नालासोपारा : वसई-विरारमध्ये कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान माजवले असून आतापर्यंत कोरोनाचा आकडा दीड हजाराच्या वर गेला आहे. पालिका हद्दीत नालासोपारा शहर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले असून आढळणारी रुग्णसंख्या सर्वाधिक असून शहरातील जनजीवन भीतीच्या सावटाखाली आहे. त्याखालोखाल विरार आणि वसईचा क्रमांक लागतो. तिन्ही शहरांत कोरोना विषाणूने कहर माजवला आहे.नालासोपाऱ्याच्या मिनी धारावीत कोरोनाने एन्ट्री केल्याने समूह संसर्गाचा धोका वाढला आहे. त्यामुळे महापालिकेच्या चिंतेत वाढ झाली आहे. आधीच कोरोनाग्रस्तांचा आकडा दुपटीने वाढत असून त्यामुळे नागरिक धास्तावले आहेत. पावसाळ्यात आर्द्रता जास्त असल्याने कोरोनाचा धोका मोठा आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे नागरिकांनी याच काळात अधिकाधिक काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.वसई-विरारमधील रुग्णालयांतील खाटा फुल्ल झाल्या असल्याने रुग्णांची उपचाराविना परवड होत आहे. अशात समूह संसर्गाची चिंता महापालिका प्रशासनाला भेडसावत आहे. नालासोपारा शहर हे अत्यंत दाटीवाटीने गजबजलेले शहर आहे. येथील लोकवस्तीचा वेग प्रचंड आहे. रविवारी एकाच दिवसात पालिका हद्दीत ९२, तर सोमवारी ७६, तर मंगळवारी ९७ रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाचा धोका अजून वाढला आहे. नागरिकांनी आपत्ती काळाचा धोका पाहता विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.पोलीस, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना या विषाणूची लागण होत असल्याने अपुºया कर्मचाºयांवर आता ताण येऊ लागला आहे. वसई, विरारमधील नागरिकीकरणाचा वेग मोठा आहे. अनेक परप्रांतीय नागरिक आपापल्या गावी परतले आहेत. ‘अनलॉक’मध्ये नियम शिथिल केल्यानंतर मोठी गर्दी ठिकठिकाणी ओसंडून वाहताना दिसत आहे. साहजिकच त्याचा फटका कोरोना वाढीमध्ये बसत आहे. सध्या वसई- विरारमधील रुग्णांचा वाढता धोका आणि त्यातही नालासोपारासारख्या मिनी धारावीच्या दिशेने कोरोनाने केलेली एन्ट्री ही आणखी धोक्याची घंटा ठरली आहे. त्यामुळे समूह संसर्गाची भीती असून महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेचा ताण वाढला आहे.सर्वाधिक रुग्णांमुळे चिंतानालासोपारा पूर्वेकडील आणि पश्चिम परिसरात कोरोनाचा प्रसार वेगाने होत असून नालासोपारा शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात मंगळवारी रात्रीपर्यंत १,६८० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून नालासोपारा शहरात सर्वाधिक ८२५ रुग्ण आहेत. विरार शहरात ५०२ रुग्ण, वसई व नायगाव शहरात ३४९ रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत ६३ जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी नालासोपारा शहरात ४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या