शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
6
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
7
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
8
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
9
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
10
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
11
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
12
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
13
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
14
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
15
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
16
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
17
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
18
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
19
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
20
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास

coronavirus: मुंबई-ठाण्याने वाढवली चिंता, कोरोनाबाधित ५० हजाराहून जास्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 03:22 IST

coronavirus News : पालघर : जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून जिल्ह्यातील नागरिकांचा सातत्याने शेजारील मुंबई, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांशी संबंध येत असल्याने आणि हे तीनही जिल्हे सक्रिय जिल्ह्यांत समाविष्ट असल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.

- जगदीश भोवडपालघर : जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून जिल्ह्यातील नागरिकांचा सातत्याने शेजारील मुंबई, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांशी संबंध येत असल्याने आणि हे तीनही जिल्हे सक्रिय जिल्ह्यांत समाविष्ट असल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. दरम्यान, पालघर जिल्ह्यामध्ये मंगळवारी १६९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. पालघर जिल्हा हा ग्रामीण आणि शहरी स्वरूपाचा असून येथील नागरिक नोकरी तसेच कामधंद्यानिमित्त मुंबई, ठाणे तसेच नाशिक या जिल्ह्यांमध्ये सातत्याने जात-येत असतात. तसेच शेजारील गुजरात राज्यामध्येही सीमावर्ती भागातील नागरिक नोकरी-धंद्यानिमित्त जात असतात. महाराष्ट्राप्रमाणेच गुजरात राज्यामध्येही रुग्णसंख्या वाढत असल्याने तीन जिल्हे आणि एका राज्याशी पालघरमधील नागरिकांचा सातत्याने संपर्क होत असल्याने आगामी काळात कोरोना रुग्णांची संख्या आणखी वाढू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झाले आहे. स्वत: जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे तसेच प्रशासनातील अन्य घटक सजग झाले असून कोरोना नियम धुडकावणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी स्वत: पुढाकार घेताना दिसत आहेत. बाहेरगावाहून येणाऱ्यांची चाचणीच नाही पालघर जिल्ह्यामध्ये मुंबई, ठाणे तसेच नाशिक या तीन जिल्ह्यांसह शेजारील गुजरात राज्यातील नागरिकांची सतत ये-जा सुरू असते. तसेच जिल्ह्यातील नागरिकही कामाधंद्यानिमित्त शेजारील जिल्ह्यांमध्ये तसेच गुजरातमध्ये जात-येत असतात.  रेल्वे, एसटी, खाजगी वाहने यातून ही प्रवासी वाहतूक होत असते. मात्र अद्याप तरी कोणत्याही ठिकाणी चाचणी होत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. गुजरातमधून खाजगी वाहनांनी महाराष्ट्रात येणारे लोक मुंबई-अहमदाबाद महामार्गाचा अवलंब करीत असतात,  मात्र तलासरी तालुक्यातील चेकनाक्यावर त्यांची तपासणी केली जात नाही, परंतु गुजरातमध्ये प्रवेश करणाऱ्यांची तपासणी गुजरात पोलिसांनी सुरू केली असल्याचे दिसून आले आहे. nकोरोनाबाधित रुग्ण वाढत असल्याने प्रशासन सज्ज झाले असून नियम न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई सुरू करण्यात आली आहे.  दररोज शेकडो प्रवाशांची ये-जा एसटी बसपालघरमध्ये गुजरात राज्यासह मुंबई, ठाणे आणि नाशिक या तीन सक्रिय जिल्ह्यांमधून येणाऱ्यांची तसेच या ठिकाणी जाणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. शकडो प्रवासी एसटीतून येत-जात असतात. हे प्रवासी कोरोनाचे वाहक ठरू शकतात. मात्र अद्यापही प्रशासनाकडून पुरेशी काळजी घेतली जात असल्याचे दिसून येत नाही. ट्रॅव्हल्सजिल्ह्यात गुजरात, राजस्थान आदी राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. मात्र मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अजूनही पुरेशा प्रमाणात तपासणी केली जात नाही. त्यामुळे नियम पाळणाऱ्या नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. तर आदेश मिळताच तपासणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.  रेल्वेजिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने मुंबईला तसेच ठाणे येथे नोकरीसाठी जात असतात. अनेकांना रेल्वेसेवेचाच आधार घ्यावा लागतो. लोकलमध्ये होणाऱ्या गर्दीतून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. रेल्वेमध्ये अनेक प्रवासी मास्क वापरत नसल्याचेही दिसून येत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबईthaneठाणेpalgharपालघर