शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

coronavirus: मुंबई-ठाण्याने वाढवली चिंता, कोरोनाबाधित ५० हजाराहून जास्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 03:22 IST

coronavirus News : पालघर : जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून जिल्ह्यातील नागरिकांचा सातत्याने शेजारील मुंबई, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांशी संबंध येत असल्याने आणि हे तीनही जिल्हे सक्रिय जिल्ह्यांत समाविष्ट असल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.

- जगदीश भोवडपालघर : जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून जिल्ह्यातील नागरिकांचा सातत्याने शेजारील मुंबई, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांशी संबंध येत असल्याने आणि हे तीनही जिल्हे सक्रिय जिल्ह्यांत समाविष्ट असल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. दरम्यान, पालघर जिल्ह्यामध्ये मंगळवारी १६९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. पालघर जिल्हा हा ग्रामीण आणि शहरी स्वरूपाचा असून येथील नागरिक नोकरी तसेच कामधंद्यानिमित्त मुंबई, ठाणे तसेच नाशिक या जिल्ह्यांमध्ये सातत्याने जात-येत असतात. तसेच शेजारील गुजरात राज्यामध्येही सीमावर्ती भागातील नागरिक नोकरी-धंद्यानिमित्त जात असतात. महाराष्ट्राप्रमाणेच गुजरात राज्यामध्येही रुग्णसंख्या वाढत असल्याने तीन जिल्हे आणि एका राज्याशी पालघरमधील नागरिकांचा सातत्याने संपर्क होत असल्याने आगामी काळात कोरोना रुग्णांची संख्या आणखी वाढू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झाले आहे. स्वत: जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे तसेच प्रशासनातील अन्य घटक सजग झाले असून कोरोना नियम धुडकावणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी स्वत: पुढाकार घेताना दिसत आहेत. बाहेरगावाहून येणाऱ्यांची चाचणीच नाही पालघर जिल्ह्यामध्ये मुंबई, ठाणे तसेच नाशिक या तीन जिल्ह्यांसह शेजारील गुजरात राज्यातील नागरिकांची सतत ये-जा सुरू असते. तसेच जिल्ह्यातील नागरिकही कामाधंद्यानिमित्त शेजारील जिल्ह्यांमध्ये तसेच गुजरातमध्ये जात-येत असतात.  रेल्वे, एसटी, खाजगी वाहने यातून ही प्रवासी वाहतूक होत असते. मात्र अद्याप तरी कोणत्याही ठिकाणी चाचणी होत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. गुजरातमधून खाजगी वाहनांनी महाराष्ट्रात येणारे लोक मुंबई-अहमदाबाद महामार्गाचा अवलंब करीत असतात,  मात्र तलासरी तालुक्यातील चेकनाक्यावर त्यांची तपासणी केली जात नाही, परंतु गुजरातमध्ये प्रवेश करणाऱ्यांची तपासणी गुजरात पोलिसांनी सुरू केली असल्याचे दिसून आले आहे. nकोरोनाबाधित रुग्ण वाढत असल्याने प्रशासन सज्ज झाले असून नियम न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई सुरू करण्यात आली आहे.  दररोज शेकडो प्रवाशांची ये-जा एसटी बसपालघरमध्ये गुजरात राज्यासह मुंबई, ठाणे आणि नाशिक या तीन सक्रिय जिल्ह्यांमधून येणाऱ्यांची तसेच या ठिकाणी जाणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. शकडो प्रवासी एसटीतून येत-जात असतात. हे प्रवासी कोरोनाचे वाहक ठरू शकतात. मात्र अद्यापही प्रशासनाकडून पुरेशी काळजी घेतली जात असल्याचे दिसून येत नाही. ट्रॅव्हल्सजिल्ह्यात गुजरात, राजस्थान आदी राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. मात्र मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अजूनही पुरेशा प्रमाणात तपासणी केली जात नाही. त्यामुळे नियम पाळणाऱ्या नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. तर आदेश मिळताच तपासणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.  रेल्वेजिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने मुंबईला तसेच ठाणे येथे नोकरीसाठी जात असतात. अनेकांना रेल्वेसेवेचाच आधार घ्यावा लागतो. लोकलमध्ये होणाऱ्या गर्दीतून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. रेल्वेमध्ये अनेक प्रवासी मास्क वापरत नसल्याचेही दिसून येत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबईthaneठाणेpalgharपालघर