शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोनामुळे घडी विस्कटली; आर्थिक संकटाची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 23:43 IST

अर्थकारण अक्षरश: कोलमडून गेल्याने जगायचे कसे, या चिंतेत उद्योजक, व्यावसायिक तसेच नोकरदार आहेत.

- पंकज राऊतबोईसर : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन झाल्यामुळे गेल्या अडीच-तीन महिन्यांत अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. त्याचा गंभीर परिणाम छोट्या-मोठ्या व्यावसायिकांबरोबरच उद्योगजगत, नोकरदार तसेच हातावर पोट भरणाऱ्यांवर होऊन या सर्वांचेच अर्थकारण अक्षरश: कोलमडून गेल्याने जगायचे कसे, या चिंतेत उद्योजक, व्यावसायिक तसेच नोकरदार आहेत.कोरोनाची साखळी तुटून त्याचा प्रसार व प्रभाव नियंत्रणात आणण्यासाठी तसेच देशातील करोडो नागरिकांच्या आरोग्याला धोका उद्भवून हाहाकार माजू नये म्हणून लॉकडाऊनशिवाय अन्य पर्याय नव्हता. हे वास्तव असले तरी त्याचा गंभीर परिणाम ग्रामपंचायतीपासून राज्य व केंद्राच्या तिजोरीवरही झाला आहे. परंतु, खरी आर्थिक झळ ही गरिबातील गरीब व श्रीमंतांनाही बसून मध्यमवर्गाची स्थिती दयनीय झाली आहे. एका बाजूला कोरोना तर दुसºया बाजूला आर्थिक संकट यामुळे विस्कळीत झालेली आर्थिक घडी सावरून पुन्हा कधी रुळांवर येईल, याबाबतही अनिश्चितता असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे.कोरोनाच्या संकटामुळे फक्त दूध, किराणा, भाजीपाला, औषधांची दुकाने, गॅस वितरण, दवाखाने व रुग्णालये या अत्यावश्यक सेवा चालू राहिल्या. याव्यतिरिक्त सर्व उद्योगधंदे बंदच राहिले. जवळपास तीन महिने बंदीत गेल्यामुळे उद्योग नगरी व दैनंदिन व्यवहार ठप्प झाल्याने व प्रत्येक धंदा-व्यवसायातून, कामातून पुरेसा रोजगार उपलब्ध होत नसल्याने कामगार, बिगारी, मोलकरणी, शेतकरी, शेतमजूर, मजूर, नोकरदार व हातावर पोट असणारे इत्यादी सर्वांना आज संघर्ष करावा लागत आहे. आज हजारोंच्या हाताला काम नाही. त्यामुळे उपासमारीची पाळी आली आहे. कोरोनासारख्या घातक विषाणूला रोखण्यासाठी आणि त्याचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी घरातच बसावे लागत आहे. त्यामुळे आज सर्व जण दुहेरी संकटात सापडले आहेत.उद्योग व कामगारांसमोर मोठे संकटसध्या उद्योगांना अनेक समस्या, अडचणी व संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यातच परप्रांतीय कामगार गावाला गेल्याने विशिष्ट ठिकाणी मॅनपॉवरचा तुटवडा जाणवतो, तर कच्च्या मालाचा पुरेसा व जलदपणे पुरवठा होत नसून आंतरराष्ट्रीय बाजारपेठही ठप्प झाल्याने उद्योगांना प्रचंड मोठा आर्थिक फटका बसणार आहे. कापड उद्योग उभारी घेण्यासाठी अवधी लागेल तर बल्क ड्रग्ज व फार्मास्युटिकल्स उद्योगांना चांगली संधी असली, तरी उद्योगांसमोर असलेल्या विविध अडचणींमुळे या उद्योगावर अवलंबून असलेला कामगार व जोडधंदा व व्यवसाय करणारे मात्र मेटाकुटीला येऊन कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या