शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
3
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
4
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
5
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
6
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
7
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
8
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
9
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
10
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
11
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
12
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
13
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
14
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
15
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
16
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
17
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
18
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
19
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
20
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...

CoronaVirus News: कोरोनामुळे घडी विस्कटली; आर्थिक संकटाची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 23:43 IST

अर्थकारण अक्षरश: कोलमडून गेल्याने जगायचे कसे, या चिंतेत उद्योजक, व्यावसायिक तसेच नोकरदार आहेत.

- पंकज राऊतबोईसर : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन झाल्यामुळे गेल्या अडीच-तीन महिन्यांत अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. त्याचा गंभीर परिणाम छोट्या-मोठ्या व्यावसायिकांबरोबरच उद्योगजगत, नोकरदार तसेच हातावर पोट भरणाऱ्यांवर होऊन या सर्वांचेच अर्थकारण अक्षरश: कोलमडून गेल्याने जगायचे कसे, या चिंतेत उद्योजक, व्यावसायिक तसेच नोकरदार आहेत.कोरोनाची साखळी तुटून त्याचा प्रसार व प्रभाव नियंत्रणात आणण्यासाठी तसेच देशातील करोडो नागरिकांच्या आरोग्याला धोका उद्भवून हाहाकार माजू नये म्हणून लॉकडाऊनशिवाय अन्य पर्याय नव्हता. हे वास्तव असले तरी त्याचा गंभीर परिणाम ग्रामपंचायतीपासून राज्य व केंद्राच्या तिजोरीवरही झाला आहे. परंतु, खरी आर्थिक झळ ही गरिबातील गरीब व श्रीमंतांनाही बसून मध्यमवर्गाची स्थिती दयनीय झाली आहे. एका बाजूला कोरोना तर दुसºया बाजूला आर्थिक संकट यामुळे विस्कळीत झालेली आर्थिक घडी सावरून पुन्हा कधी रुळांवर येईल, याबाबतही अनिश्चितता असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे.कोरोनाच्या संकटामुळे फक्त दूध, किराणा, भाजीपाला, औषधांची दुकाने, गॅस वितरण, दवाखाने व रुग्णालये या अत्यावश्यक सेवा चालू राहिल्या. याव्यतिरिक्त सर्व उद्योगधंदे बंदच राहिले. जवळपास तीन महिने बंदीत गेल्यामुळे उद्योग नगरी व दैनंदिन व्यवहार ठप्प झाल्याने व प्रत्येक धंदा-व्यवसायातून, कामातून पुरेसा रोजगार उपलब्ध होत नसल्याने कामगार, बिगारी, मोलकरणी, शेतकरी, शेतमजूर, मजूर, नोकरदार व हातावर पोट असणारे इत्यादी सर्वांना आज संघर्ष करावा लागत आहे. आज हजारोंच्या हाताला काम नाही. त्यामुळे उपासमारीची पाळी आली आहे. कोरोनासारख्या घातक विषाणूला रोखण्यासाठी आणि त्याचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी घरातच बसावे लागत आहे. त्यामुळे आज सर्व जण दुहेरी संकटात सापडले आहेत.उद्योग व कामगारांसमोर मोठे संकटसध्या उद्योगांना अनेक समस्या, अडचणी व संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यातच परप्रांतीय कामगार गावाला गेल्याने विशिष्ट ठिकाणी मॅनपॉवरचा तुटवडा जाणवतो, तर कच्च्या मालाचा पुरेसा व जलदपणे पुरवठा होत नसून आंतरराष्ट्रीय बाजारपेठही ठप्प झाल्याने उद्योगांना प्रचंड मोठा आर्थिक फटका बसणार आहे. कापड उद्योग उभारी घेण्यासाठी अवधी लागेल तर बल्क ड्रग्ज व फार्मास्युटिकल्स उद्योगांना चांगली संधी असली, तरी उद्योगांसमोर असलेल्या विविध अडचणींमुळे या उद्योगावर अवलंबून असलेला कामगार व जोडधंदा व व्यवसाय करणारे मात्र मेटाकुटीला येऊन कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या