शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
2
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
3
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
4
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
5
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
6
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
7
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
8
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
9
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
10
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
11
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
12
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
13
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
14
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
15
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
16
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
17
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
18
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
19
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
20
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?

Coronavirus: धरण उशाला, कोरड घशाला! आदिवासींवर कोरोनासोबतच पाणीटंचाईचे दुहेरी संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 07:19 IST

२१ गावे, ४७ पाड्यांना २१ टँकरद्वारे पाणीपुरवठा

रवींद्र साळवे 

मोखाडा : लॉकडाउनमुळे हातावर पोट असणाऱ्या आदिवासींना विविध समस्यांचा सामना करावा लागत असून रोजच्या उदरनिर्वाहासोबतच आता पाणीटंचाईचे संकटही त्यांना भेडसावते आहे. तालुक्यातील धामणी शास्त्रीनगर, स्वामीनगर, सातुर्ली अशी सात गावे आणि गोळ्याचा पाडा, नावळ्याचा पाडा, दापटी-१, दापटी- २, तुंगारवाडी, कुडवा, वारघडपाडा कुंडाचापाडा, हटीपाडा, पेंड्याचीपाडा, ठाकूरपाडा, पोºयाचापाडा, ठवळपाडा, डोंगरवाडी अशी २१ गावे आणि ४७ पाडे अशा एकूण ६८ गावपाड्यांना २१ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

तालुक्याची लोकसंख्या आता लाखांवर पोहोचली असून येथे खोच, पळसपाडा, मारुतीची वाडी, कारेगाव, मोरहंडा अशी पाच मोठी धरणे आहेत. तरीही ‘धरण उशाला, कोरड घशाला’, अशी परिस्थिती आहे. या धरणांवर कोट्यवधींचा खर्च होऊनही याचा काहीच फायदा येथील आदिवासी बांधवांना झालेला नाही.

येथील परिस्थिती बघता दरवर्षी फेब्रुवारीपासून पाणीटंचाईची समस्या त्रास देते. एप्रिल-मेमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न तीव्र होतो. त्यामुळे येथील टंचाईग्रस्त आदिवासींना हातातील कामे सोडून घोटभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. पाणीपुरवठा करणाºया विहिरींपासून टंचाईग्रस्त गाव-पाडे २० ते २५ कि.मी. अंतरावर असल्याने टँकर चालकांनाही चांगलीच कसरत करावी लागते.

प्रचंड पाऊस होऊनही शून्य नियोजनामुळे येथे दरवर्षी ही पाणीटंचाईची समस्या त्रास देते. कोचाळे येथील मध्य वैतरणा प्रकल्पातून १२० कि.मी. अंतरावर मुंबईला शासनाने पाणी पोहोचवले आहे; परंतु धरणालगतच्या ४ ते ५ कि.मी. अंतरावरील गावांना उन्हाळ्यात हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागते. येथील पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ग्रामपंचायत, ठक्कर बाप्पा योजना, लघु पाटबंधारे, नळपाणी पुरवठा आदी विभागांच्या माध्यमातून वर्षभरात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत बंधारे, विहिरीतील गाळ काढणे, शेततळे बांधणे, लघुपाटबंधारे, वनविभागाचे बंधारे, नळपाणी पुरवठा योजना, सिंचन विहिरी यांसह सेवाभावी संस्थांनी बांधलेले बंधारे यांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला आहे. याचबरोबर बºयाच ठिकाणी पाणी अडवण्यासाठी भूमिगत बंधारे तयार करण्यात आले. याचा फायदा नेमका किती झाला याचे उत्तरही प्रशासनाकडे नाही. महिलांची पाण्यासाठीची पायपीट काही कमी होताना दिसत नाही.महिलांची पायपीट थांबेनाप्रातिनिधिक स्वरूपात बघितल्यास डोल्हारा तसेच धारेचा पाडा येथील विहिरीजवळ बंधारा बांधण्यात आला. तरीही हे गाव पाणीटंचाईमध्ये प्रथम क्रमांकावर असून टँकरशिवाय पर्याय नाही. त्याचबरोबर टँकर अधिग्रहण करण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनास दिले असल्याने टँकर सुरू होण्यास विलंब होत असल्याचा प्रत्यय नुकताच टंचाईग्रस्त गावपाड्यांना आला आहे. पाणीटंचाईच्या नावाखाली आजतागायत पाण्यासारखा पैसा खर्च होऊनही महिलांची पाण्यासाठीची पायपीट कमी झालेली नाही. गेल्या वर्षीदेखील अशीच परिस्थिती होती. तेव्हा टंचाईग्रस्त गावपाड्यांनी शंभरी गाठली होती. त्याला ३० टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई