शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Coronavirus: धरण उशाला, कोरड घशाला! आदिवासींवर कोरोनासोबतच पाणीटंचाईचे दुहेरी संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 07:19 IST

२१ गावे, ४७ पाड्यांना २१ टँकरद्वारे पाणीपुरवठा

रवींद्र साळवे 

मोखाडा : लॉकडाउनमुळे हातावर पोट असणाऱ्या आदिवासींना विविध समस्यांचा सामना करावा लागत असून रोजच्या उदरनिर्वाहासोबतच आता पाणीटंचाईचे संकटही त्यांना भेडसावते आहे. तालुक्यातील धामणी शास्त्रीनगर, स्वामीनगर, सातुर्ली अशी सात गावे आणि गोळ्याचा पाडा, नावळ्याचा पाडा, दापटी-१, दापटी- २, तुंगारवाडी, कुडवा, वारघडपाडा कुंडाचापाडा, हटीपाडा, पेंड्याचीपाडा, ठाकूरपाडा, पोºयाचापाडा, ठवळपाडा, डोंगरवाडी अशी २१ गावे आणि ४७ पाडे अशा एकूण ६८ गावपाड्यांना २१ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

तालुक्याची लोकसंख्या आता लाखांवर पोहोचली असून येथे खोच, पळसपाडा, मारुतीची वाडी, कारेगाव, मोरहंडा अशी पाच मोठी धरणे आहेत. तरीही ‘धरण उशाला, कोरड घशाला’, अशी परिस्थिती आहे. या धरणांवर कोट्यवधींचा खर्च होऊनही याचा काहीच फायदा येथील आदिवासी बांधवांना झालेला नाही.

येथील परिस्थिती बघता दरवर्षी फेब्रुवारीपासून पाणीटंचाईची समस्या त्रास देते. एप्रिल-मेमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न तीव्र होतो. त्यामुळे येथील टंचाईग्रस्त आदिवासींना हातातील कामे सोडून घोटभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. पाणीपुरवठा करणाºया विहिरींपासून टंचाईग्रस्त गाव-पाडे २० ते २५ कि.मी. अंतरावर असल्याने टँकर चालकांनाही चांगलीच कसरत करावी लागते.

प्रचंड पाऊस होऊनही शून्य नियोजनामुळे येथे दरवर्षी ही पाणीटंचाईची समस्या त्रास देते. कोचाळे येथील मध्य वैतरणा प्रकल्पातून १२० कि.मी. अंतरावर मुंबईला शासनाने पाणी पोहोचवले आहे; परंतु धरणालगतच्या ४ ते ५ कि.मी. अंतरावरील गावांना उन्हाळ्यात हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागते. येथील पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ग्रामपंचायत, ठक्कर बाप्पा योजना, लघु पाटबंधारे, नळपाणी पुरवठा आदी विभागांच्या माध्यमातून वर्षभरात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत बंधारे, विहिरीतील गाळ काढणे, शेततळे बांधणे, लघुपाटबंधारे, वनविभागाचे बंधारे, नळपाणी पुरवठा योजना, सिंचन विहिरी यांसह सेवाभावी संस्थांनी बांधलेले बंधारे यांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला आहे. याचबरोबर बºयाच ठिकाणी पाणी अडवण्यासाठी भूमिगत बंधारे तयार करण्यात आले. याचा फायदा नेमका किती झाला याचे उत्तरही प्रशासनाकडे नाही. महिलांची पाण्यासाठीची पायपीट काही कमी होताना दिसत नाही.महिलांची पायपीट थांबेनाप्रातिनिधिक स्वरूपात बघितल्यास डोल्हारा तसेच धारेचा पाडा येथील विहिरीजवळ बंधारा बांधण्यात आला. तरीही हे गाव पाणीटंचाईमध्ये प्रथम क्रमांकावर असून टँकरशिवाय पर्याय नाही. त्याचबरोबर टँकर अधिग्रहण करण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनास दिले असल्याने टँकर सुरू होण्यास विलंब होत असल्याचा प्रत्यय नुकताच टंचाईग्रस्त गावपाड्यांना आला आहे. पाणीटंचाईच्या नावाखाली आजतागायत पाण्यासारखा पैसा खर्च होऊनही महिलांची पाण्यासाठीची पायपीट कमी झालेली नाही. गेल्या वर्षीदेखील अशीच परिस्थिती होती. तेव्हा टंचाईग्रस्त गावपाड्यांनी शंभरी गाठली होती. त्याला ३० टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई