शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही काट मारली, तर मी पण काट मारणार"; अजित पवारांनी माळेगावकरांना दाखवली अर्थमंत्रालयाची ताकद
2
पायलटचे नियंत्रण सुटले की ब्लॅकआउटमुळे अपघात झाला? संरक्षण तज्ञांनी तेजस अपघाताचे कारण सांगितले
3
५ वेळा डावलले, तरी 'एकनिष्ठ'; तिकीट न मिळाल्याने BJP च्या कार्यकर्त्याची बॅनरबाजी; सत्तेचा लोभ नसल्याचा दिला संदेश
4
Mumbai Local: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर आजपासून १२ दिवस विशेष रात्रकालीन ब्लॉक
5
"...त्यावर अमित शाहांना हसू आवरलं नाही"; जागा दाखवली म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेची शिंदेवर टीका
6
अदानी समूहानं तयार केल्या २ नव्या कंपन्या, काय करणार काम? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
7
'संगीत देवबाभळी' फेम अभिनेत्री घटस्फोटाच्या ३ महिन्यानंतर दुसऱ्यांदा बांधतेय लग्नगाठ, केळवणाचे फोटो केले शेअर
8
Maharashtra CET: सीईटीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर, कुठल्या दिवशी कोणता पेपर? वाचा
9
IND vs SA : बुमराहनं मार्करमसाठी जाळं विणलं; पण KL राहुलनं स्लिपमध्ये झोपा काढत त्यावर पाणी फेरलं!
10
श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत अडचणीत, २५२ कोटींच्या ड्रग्स केसप्रकरणी मुंबई पोलिसांनी पाठवलं समन्स'
11
विनायक चतुर्थी २०२५: मार्गशीर्ष विनायक चतुर्थी ठरणार खास, गणेशकृपेने ९ राशींची पूर्ण होणार आस!
12
धक्कादायक! मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केली, मृतदेह तलावात फेकून दिला
13
Tarot Card: लोभाला बळी पडू नका, मनाचा कौल घ्या; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
14
एअर शोचा व्हिडीओ पाहण्यासाठी वडील युट्यूबवर शोधत होते; अचानक विंग कमांडरांच्या मृत्यूची बातमी दिसली
15
पाकिस्तानच्या तुरुंगातील खलाशांना आणा, राज्य शासनाकडे मागणी; १८ मच्छीमार तुरुंगातच!
16
Mumbai: देवदर्शनाहून परत येताना मुलाचा ट्रेनमधून पडून मृत्यू; तब्बल १७ वर्षांनी पालकांना नुकसानभरपाई!
17
सूरज चव्हाणनंतर 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचं लग्न ठरलं, बॉयफ्रेंडसोबत मार्चमध्ये अडकणार विवाहबंधनात?
18
Maratha Reservation: मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची आवश्यकता तरी काय? उच्च न्यायालयात युक्तिवाद 
19
४९०, ५१० किंवा ५२० रुपयांचं पेट्रोल-डिझेल टाकल्यानं फरक पडतो का? फसवणुकीपासून वाचायचं असेल तर 'या' २ गोष्टींकडे लक्ष द्या
20
IND vs SA 2nd Test : पंतही ठरला कमनशिबी! टीम इंडिया 'या' दोन बदलासह उतरली मैदानात
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोनाबाधेवर मात केलेले म्हणताहेत, डर के आगे जीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 23:15 IST

डाॅक्टरांचा न घाबरण्याचा सल्ला : अन्य आजारांकडे लक्ष देण्याची गरज

सुनील घरतपारोळ : वसई तालुक्यात शहरी व ग्रामीण भागात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे, हा चिंतेचा विषय असून, कोरोनाबद्दलची भीती हेही काही रुग्णांच्या बाबतीत मृत्यूचे कारण ठरत आहे. कोरोनाबाबत असणारी भीती, त्यामुळे येणारे दडपण, यामुळे उपचारासाठी होणारा उशीर तसेच काही रुग्णांना असणारे दुर्धर आजार यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूचे प्रमाण वाढताना दिसत आहे. दरम्यान, डर के आगे जीत है, कोरोना बरा होतो, हेही बाधित होऊन बरे झालेल्या अनेक नागरिकांनी दाखवून दिले आहे.

कोरोनाची भीती बाळगण्यापेक्षा या आजाराचा सामना करण्याची आज रुग्णांना गरज आहे. यासाठी आरोग्य विभाग व सामाजिक संस्था यांनी पुढे येऊन नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. दरम्यान, वसई तालुक्याच्या शहरी भागात ३७ हजार ७१२ आणि ग्रामीण भागात १ हजार ४३४ रुग्णांनी कोरोनावर विजय मिळवल्याचे स्पष्ट झाले आहे. जर कोरोनाचा आपण धीटपणे सामना केला तर विजय आपलाच आहे, असे कोरोनामुक्त मनोज पाटील यांनी सांगितले.

आज वसई तालुक्यात कोरोना झाल्यानंतर त्यातून हजारो रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनाबाबत सरकारी व खासगी यंत्रणा अधिक गंभीर असून, रुग्णाच्या उपचारात कुठलीही कसर सोडली जात नाही; पण उपचारासाठी रुग्णही मानसिकदृष्ट्या समक्ष असला पाहिजे. रुग्णांनी या आजाराची भीती बाळगली नाही तर या आजारातून लवकर बरे होतील, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

कोरोनाची भीती हे कोरोना रुग्णाचे मृत्यूचे मोठे कारण मानले जात आहे. आपल्याला कोरोना झालाय याची प्रचंड भीती रुग्णाच्या मनात असते. त्यामुळे जगण्याचे मानसिक बळ कमी होत आहे. कोरोनाबद्दलच्या भीतीमुळे हृदयविकाराचा झटका येऊन अनेकांचे मृत्यू झाले आहेत. कोरोनाची भीती व मानसिक दडपण हे कोरोना उपचारात बाधा ठरत असले तरी आज कोरोनावर विजय मिळवणाऱ्यांची संख्या मोठी असून, भीती नसेल तर कोरोनावर विजय निश्चित आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे